शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

बुमराह कसोटीत मिळवू शकतो ४०० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:15 IST

मेलबर्न : ‘वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज कर्टली एम्ब्रोस यांच्या मते भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा अन्य गोलंदाजांपेक्षा खूपच ...

मेलबर्न : ‘वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज कर्टली एम्ब्रोस यांच्या मते भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा अन्य गोलंदाजांपेक्षा खूपच वेगळा आहे. आणि तो जर तंदुरुस्त राहिला तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी घेऊ शकतो.’ वेस्ट इंडिकडून ९८ कसोटी सामन्यात २०.९९च्या सरासरीने ४०५ बळी घेणाऱ्या एम्ब्रोस याने सांगितले की, सध्या भारतीय गोलंदाजांमध्ये त्यांना बुमराहने प्रभावित केले आहे.

एम्ब्रोस यांनी त्यांच्या कर्टली आणि करिश्मा शोमध्ये म्हटले की, ‘भारताकडे काही खूप चांगले गोलंदाज आहेत. मी बुमराहचा मोठा प्रशंसक आहे. मी त्याची गोलंदाजी पाहिली आहे. तो सर्वांपेक्षा खूपच वेगळा आहे. तो इतका प्रभावी आहे आणि मला त्याच्याकडून आशा आहे. तो खूप चांगला खेळ करेल.’

तो ४०० बळी घेऊ शकतो का, यावर एम्ब्रोस यांनी म्हटले की, ‘जर तो फिट राहिला आणि योग्य वेळेपर्यंत खेळला तर तो असे करू शकतो. तो सीम आणि स्विंग करू शकतो आणि यॉर्करही उत्तम टाकतो. त्याच्याकडे क्षमता आहे. तो बराच काळ खेळला तर मला आशा आहे की तो हे यश नक्कीच मिळवू शकतो.’

२०१८मध्ये कसोटीत पदार्पण करणाऱ्या बुमराहने फक्त १९ कसोटीत २२.१०च्या सरासरीने ८३ बळी घेतले आहेत. भारतीय संघाचा तो महत्त्वाचा भाग आहे.’

कर्टनी वॉल्श यांच्यासोबत कसोटी इतिहासातील सर्वात खतरनाक जोडींपैकी एक असणाऱ्या एम्ब्रोस यांच्या मते भारतीय गोलंदाज त्यांच्या छोट्या रन अपमुळे आपल्या शरीरावर अधिक दबाव टाकतात.’

त्यांनी सांगितले की, जलदगती ही लयीसोबत जोडली गेलेली असते. त्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला चांगली लय गरजेची असते.’

एम्ब्रोसने सांगितले की, बुमराहचा रनअप खूपच छोटा आहे. तो आपला रनअपमध्ये फक्त चालतो आणि चेंडू फेकण्याच्या आधी काही पावले जोरात येतो. त्यामुळे त्याच्या शरीरावर अधिक दबाव येतो. आणि जर तो मजबूत राहू शकत असेल तर मला वाटते की यात अडचण नाही.’

भारताला १८ जूनला साऊथम्पटनमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात आपला पहिला विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील सामना खेळणार आहे. आणि ॲम्ब्रोसच्या मते चांगले सलामीची जोडी ही विराटसाठी महत्त्वाची ठरेल. हे महत्त्वाचे आहे. कारण लवकर एक-दोन बळी गेले तर कर्णधार कोहली लवकरच गोलंदाजांच्या निशाण्यावर येतो. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजही अडचणीत येतात.’