शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांचा यंदा बफर स्टाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST

चाळीसगाव : शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांची चिंता करु नये. यंदा राज्य शासनाच्या कृषी विभागाने युरियाचा दीड लाख मेट्रिक टन ...

चाळीसगाव : शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांची चिंता करु नये. यंदा राज्य शासनाच्या कृषी विभागाने युरियाचा दीड लाख मेट्रिक टन खतांचा बफर स्टाॅक केला आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देवळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.

शनिवारी सायंकाळी तालुका कृषी विभागामार्फत आयोजित शेतकरी अवजार बँकेचा शुभारंभ मंत्री भुसे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

देवळी येथील आत्माअंतर्गत स्थापित क्रांतिवीर रेशीम उत्पादक गटाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांची अवजार बँक सुरु करण्यात आली आहे. गटाच्या सदस्यांनी एकत्र येऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा अंतर्गत कमी अंतराच्या पिकांत व फळबागेत आंतरमशागतीस येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टर व त्यासोबत अवजारे स्वनिधीतून खरेदी केले व त्यासाठी शेड सुद्धा स्वनिधीतून बांधण्यात आले. यासाठी १८ लाख २२ हजार रुपयांचे कृषी अवजार सेवा केंद्राची स्थापना केली. गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी भुसे यांना माहिती दिली.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी यनवाड, पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, पल्लवी हिरवे, मंडळ कृषी अधिकारी संजय पगारे, तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार यांच्यासह देवळी, दडपिंप्री, आडगाव, पिंप्री, चिंचखेडे, डोणपिंप्री, भोरस आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांचे गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी आभार मानले.

......

चौकट

३१ लाख शेतकऱ्यांना २० हजार कोटीची कर्जमाफी

कृषिमंत्र्यांनी खुर्चीवर न बसता जमिनीवर बसून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. राज्यात कुठेही युरिया खताची टंचाई जाणवल्यास केवळ दोनच दिवसात त्याठिकाणी शासन युरिया उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कुठेही कृषी केंद्र चालकांकडून अडवणूक किंवा लुबाडणूक करण्यात येत असल्यास तत्काळ तक्रार करण्याचे व आपणास कळवण्याची सूचनादेखील दादा भुसे यांनी केली. ३१ लाख शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य शासनाने दिली आहे. उर्वरित वंचित शेतकऱ्यांनाही कोरोना संकटानंतर राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याबरोबर कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. जंगली श्वापदांपासून शेतीच्या संरक्षणासाठी सरकारने पोकरा अंतर्गत शेतीला कुंपणाच्या योजनेत समाविष्ट करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने पद्माकर पाटील यांनी यावेळी केली.

===Photopath===

300521\30jal_5_30052021_12.jpg

===Caption===

चाळीसगावः देवळी येथे जमिनीवर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी मंत्री दादा भुसे.