शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Budget 21 : अर्थसंकल्प सादर होताच चांदीत एक हजाराची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सुवर्ण बाजारात मोठा चढ-उतार होताना दिसून आला व एकाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सुवर्ण बाजारात मोठा चढ-उतार होताना दिसून आला व एकाच दिवसात तीन वेळा सोने-चांदीचे भाव बदलले. यात अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होताच भाववाढ झाली, तर अर्थसंकल्पादरम्यान आयात शुल्क कमी केल्याची घोषणा झाल्यानंतर सोने-चांदीचे भाव कमी झाले. दिवसभरातील या चढ-उतारानंतर चांदी ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर तर सोने ४९ हजार ९०० रुपयांवर स्थिरावले.

गेल्या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी होण्यासह प्राप्तीकर (इन्कम टॅक्स) कमी होण्याची अपेक्षा होती, मात्र तसे काहीही न झाल्याने सुवर्ण बाजारावरील भार कायम राहिला होता, तसेच सुवर्ण व्यवसायाबाबत काहीही घोषणा नसल्याने निराशा झाली होती. तसेच दोन वर्षांपूर्वी आयात शुल्कात अडीच टक्क्याने वाढ करण्यात आली होती. त्यामुळे दोन वर्षांपासून सुवर्ण व्यावसायिकांच्या पदरी निराशाच पडत होती. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने त्याचा व्यावसायिकांसह ग्राहकांनाही लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२०२० या वर्षात कोरोनामुळे असलेल्या लाॅकडाऊनच्या दरम्यान सुवर्ण बाजार बंद राहिला तरी सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर आता अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी केल्याने त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी जाणवू लागला आहे.

घोषणेनंतर घसरण

यंदाच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी तर सुवर्ण बाजारात मोठा चढ-उतार दिसून आला. सकाळी सुवर्ण बाजार उघडताच चांदी ७४ हजार रुपये तर सोने ५०० हजारावर होते. अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होताच चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७५ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. तसेच सकाळी सोने ५० हजारावर असताना अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली व त्यात ४०० रुपयांनी वाढ होऊन ते ५०० हजार ४०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर मात्र सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा झाली, त्यानंतर मात्र हे भाव पुन्हा कमी झाले. याच चांदीत एक हजाराने घसरण होऊन ती ७४ हजार रुपये प्रति किलोवर तर सोन्यात ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ४९ हजार ९०० रुपयांवर स्थिरावले. एकूणच एकाच दिवसात सोने-चांदीच्या भावात तीन वेळा बदल झाल्याचे यंदा दिसून आले.