शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
4
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
5
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
6
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
7
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
8
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
9
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
10
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
12
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
13
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
14
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
15
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
16
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
17
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
18
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
19
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
20
Scam Alert: वाहन चालकांनो, ‘RTO’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
Daily Top 2Weekly Top 5

अटलबिहारी वाजपेयींच्या कर्तृत्व गुणांना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:29 IST

चाळीसगावला शोकसभेत सर्वपक्षीयांतर्फे आदरांजली

चाळीसगाव, जि.जळगाव : माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देत सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भाजपातर्फे रविवारी सायंकाळी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत वाजपेयी यांची गुणवैशिष्ट्ये मांडत अनेकांनी भावना व्यक्त केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वयोवृद्ध नेते उदेसिंग पवार होते.याप्रसंगी आमदार उन्मेष पाटील यांनी आदरांजली वाहताना सांगितले की, प्रेरणादायी दीपस्तंभ म्हणून अटलजी नेहमी स्मरणात राहतील. त्यांनी नेहमीच उज्वल भारताची स्वप्ने बघितली. द्रष्टा विचारवंत, थोर साहित्यिक, समन्वयवादी भूमिकेचा आग्रह धरणारा निर्लेप राजकारणी अशा गुणांची त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वात बेरीज झाली होती.व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी त्यांच्या सर्वांना बरोबर घेऊन राजकारण करण्याचे कसब आणि भूमिका कौतुकास्पद ठरते, असे स्पष्ट केले. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे सुसंस्कृत कार्य विषद केले.माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे यांनीदेखील त्यांच्या चतु:रस्त्र व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेतला. पालिकेतील भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी यांनी त्यांच्या शालिन कर्तृत्वाला उजाळा दिला. शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व जि.प.चे राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी विरोधकांना सन्मानाने वागविणारे नेतृत्व म्हणून ते लक्षात राहतात, असे सांगितले.चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी व्यक्तीच्या मृत्यू पश्चात शब्द, कर्म आणि कार्य रुपाने अटलबिहारी वाजपेयी कसे कालातीत ठरतात यावर प्रकाश टाकला. योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, प्रतिमदास रावलानी, तुकाराम गवळी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या आठवणी जागविल्या.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम कोळी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक खलाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. रोहिदास पाटील, खादी ग्रामोद्योग संस्थेचे अध्यक्ष किसनराव जोर्वेकर, संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, काँग्रेसचे अ‍ॅड. ईश्वर जाधव, नगरसेवक आनंदा कोळी, संस्कार भारतीच्या सुनीता घाटे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, उद्धवराव महाजन, नगरसेविका संगीता गवळी, अ‍ॅड. आशा शिरसाट, डॉ. नरेश निकुंभ, अविनाश सूर्यवंशी, प्रफुल्ल साळुंखे, हाजी रफिक, विद्या भारतीचे रमेश पोतदार यांनीही आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.या वेळी बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, जि.प.चे माजी सभापती राजेंद्र राठोड, नगरसेवक श्यामलाल कुमावत, सुरेश स्वार, संजय रतनसिंग पाटील, विजया प्रकाश पवार, अरुण अहिरे, पं.स.चे उपसभापती संजय पाटील, डॉ. संजय देशमुख, दिनेश बोरसे यांच्यासह विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे यांनी केले.