शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अटलबिहारी वाजपेयींच्या कर्तृत्व गुणांना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:29 IST

चाळीसगावला शोकसभेत सर्वपक्षीयांतर्फे आदरांजली

चाळीसगाव, जि.जळगाव : माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देत सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भाजपातर्फे रविवारी सायंकाळी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत वाजपेयी यांची गुणवैशिष्ट्ये मांडत अनेकांनी भावना व्यक्त केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वयोवृद्ध नेते उदेसिंग पवार होते.याप्रसंगी आमदार उन्मेष पाटील यांनी आदरांजली वाहताना सांगितले की, प्रेरणादायी दीपस्तंभ म्हणून अटलजी नेहमी स्मरणात राहतील. त्यांनी नेहमीच उज्वल भारताची स्वप्ने बघितली. द्रष्टा विचारवंत, थोर साहित्यिक, समन्वयवादी भूमिकेचा आग्रह धरणारा निर्लेप राजकारणी अशा गुणांची त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वात बेरीज झाली होती.व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी त्यांच्या सर्वांना बरोबर घेऊन राजकारण करण्याचे कसब आणि भूमिका कौतुकास्पद ठरते, असे स्पष्ट केले. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे सुसंस्कृत कार्य विषद केले.माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे यांनीदेखील त्यांच्या चतु:रस्त्र व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेतला. पालिकेतील भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी यांनी त्यांच्या शालिन कर्तृत्वाला उजाळा दिला. शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व जि.प.चे राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी विरोधकांना सन्मानाने वागविणारे नेतृत्व म्हणून ते लक्षात राहतात, असे सांगितले.चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी व्यक्तीच्या मृत्यू पश्चात शब्द, कर्म आणि कार्य रुपाने अटलबिहारी वाजपेयी कसे कालातीत ठरतात यावर प्रकाश टाकला. योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, प्रतिमदास रावलानी, तुकाराम गवळी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या आठवणी जागविल्या.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम कोळी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक खलाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. रोहिदास पाटील, खादी ग्रामोद्योग संस्थेचे अध्यक्ष किसनराव जोर्वेकर, संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, काँग्रेसचे अ‍ॅड. ईश्वर जाधव, नगरसेवक आनंदा कोळी, संस्कार भारतीच्या सुनीता घाटे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, उद्धवराव महाजन, नगरसेविका संगीता गवळी, अ‍ॅड. आशा शिरसाट, डॉ. नरेश निकुंभ, अविनाश सूर्यवंशी, प्रफुल्ल साळुंखे, हाजी रफिक, विद्या भारतीचे रमेश पोतदार यांनीही आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.या वेळी बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, जि.प.चे माजी सभापती राजेंद्र राठोड, नगरसेवक श्यामलाल कुमावत, सुरेश स्वार, संजय रतनसिंग पाटील, विजया प्रकाश पवार, अरुण अहिरे, पं.स.चे उपसभापती संजय पाटील, डॉ. संजय देशमुख, दिनेश बोरसे यांच्यासह विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे यांनी केले.