शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सुकी नदीवरील पूल ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:16 IST

उटखेडा, ता. रावेर : येथील चिनावल मार्गावरील सुकी नदीच्या पुलावरील खड्ड्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहनधारकांना ...

उटखेडा, ता. रावेर : येथील चिनावल मार्गावरील सुकी नदीच्या पुलावरील खड्ड्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना हे खड्डे चुकवत जावे लागते. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. हे खड्डे जीवघेणे होत असून, या ठिकाणी अपघात झाल्यास कोण जबाबदार राहील, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित होत आहे .

सुकी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधल्याने उटखेडा ते चिनावल ही गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे या परिसरातील जनतेचे दळणवळणाचे अंतर कमी झाले आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी सावदा येथे जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ सुकी नदीच्या पुलावरून वाढली आहे. त्याचप्रमाणे या परिसरात केळीने भरलेली अवजड वाहनेही याच पुलावरून ये-जा करतात. मात्र, सध्या या पुलावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली लोखंडी आसारीदेखील उघडी पडली असून, वर आली आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या खड्ड्यांना चुकवीत प्रवास करताना वाहनचालकांना तोरवरची कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कानाडोळा करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हे खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा या मार्गावरून जाणारे वाहनधारक करीत आहेत.