शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

जळगाव : भ्रष्टाचार कमी व्हावा किंवा बंदच व्हावा असे सर्वसामान्य नागरिकांना कितीही वाटत असले तरी बहुतांश यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली ...

जळगाव : भ्रष्टाचार कमी व्हावा किंवा बंदच व्हावा असे सर्वसामान्य नागरिकांना कितीही वाटत असले तरी बहुतांश यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली आहे. बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी, कर्मचारी प्रामाणिपणे कार्य करून भ्रष्टाचारापासून चार हात लांब राहतात. यात सर्वात जास्त नुकसान व बळी पडतो तो सर्वसामान्य माणूस. आधी नोटाबंदी आणि आता कोरोना काळातील संचारबंदी या काळातदेखील लाचखोरी कमी झाली नाही.

नोटाबंदीच्या काळात तब्बल ४० सरकारी बाबू एसीबीच्या जाळ्यात अडकले तर आता कोरोनाच्या संचारबंदीतही दीड वर्षात ४१ जण जाळ्यात अडकले. क्लास वनपासून तर क्लास फोरपर्यंत महिलांपासून तर पुरुषांपर्यंत सर्वच यात अडकले आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी असलेल्या महिलादेखील लाच घेत आहेत. २०१६ ते जुलै २०२१ या काळात तब्बल १६८ सरकारी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले, तर कोरोना व नोटाबंदीच्या काळात ८१ जण पकडले गेले आहेत. अवैध मार्गाने येणाऱ्या पैशांवर हौस, मौज व अनावश्यक उधळपट्टी होऊ लागली.

वर्ष लाच प्रकरणे

२०१६- ४०

२०१७- २६

२०१८- ३०

२०१९- ३१

२०२०- २०

२०२१ (जुलैपर्यंत)-२१

महसूल विभाग सर्वात पुढे

- लाचखोरीत सर्वाधिक महसूल विभाग पुढे आहे. त्याखालोखाल पोलीस विभागाचा नंबर लागतो. गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर पोलीस आणि महसूल या दोनच विभागात स्पर्धा दिसून येत आहे.

- गेल्या वर्षीच जळगावात कोरोना काळात महिला प्रांताधिकाऱ्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षात सर्वात मोठी कारवाई ती होती. क्लास वनपासून तर क्लास फोरपर्यंत सर्वच संवर्गातील अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले.

- कोरोना काळात कारवायांची संख्या गेल्या वर्षी घटली होती, यंदा मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. नोटाबंदीच्या काळात ४० जण एसीबीच्या जाळ्यात अडकले होते.

लाच दोनशेपासून चार लाखांपर्यंत

वाहन सोडण्यासाठी दोनशेची लाच...

महामार्गावर अडवलेले वाहन सोडविण्यासाठी वाहतूक नशिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत चंद्रकांत पाटील व लक्ष्मण पाटील या दोन पोलिसांनी दोनशे रुपयांची लाच घेतली होती. २०१७ मध्ये ही कारवाई झाली होती. त्याशिवाय कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ येथील तलाठी प्रवीण मेश्राम याने वारस दाखला देण्याच्या मोबदल्यात २०० रुपयाची लाच घेतली होती.

शेतकऱ्यांना भूसंपादन रक्कम देण्यासाठी चार लाखांची लाच

अमळनेर तालुक्यातील पाडळसरे लाभ क्षेत्रासाठी संपादित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून ११० शेतकऱ्यांना रक्कम मंजूर झाली होती. ती देण्याच्या मोबादल्यात तापी पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता सुरेश सावंत याने ४ लाख २५ हजार रुपयांची लाच घेतली होती. ही कारवाईदेखील २०१७ मध्येच झाली होती.

कोट...

सरकारी काम करून देण्यासाठी कोणताही अधिकारी, कर्मचारी लाच मागत असेल तर नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव कधीही समोर येत नाही. त्याशिवाय त्याचे अडलेले काम पूर्ण होतेच. लाचेची रक्कमदेखील परत मिळते. नि:संकोचपणे नागरिकांनी पुढे यावे.

- शशिकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग