शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या गावात मतदानावर बहिष्कार

By admin | Updated: February 17, 2017 00:33 IST

तामसवाडी : तब्बल सहा तास बहिष्कार, गारपीटग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई मिळण्याची होती मागणी

पारोळा/तामसवाडी : गारपीटग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या तामसवाडी गावातील 153 शेतकरी कुटुंबांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर सहा तास बहिष्कार टाकला होता. तसेच  ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले. निवडणूक निर्णय अधिकारी व आमदार डॉ. सतीश पाटील यांनी उपोषणकत्र्याची समजूत काढल्याने, त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. 5 मे 2016 रोजी तामसवाडी परिसरात वादळी वा:यासह गारपीट झाली होती. त्यात फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान भरपाईची मागणी करूनही त्याकडे शासनाने लक्ष दिलेले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक:यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. दिलेल्या इशा:यानुसार  आज शेतक:यांनी तब्बल सहा तास मतदानावर बहिष्कार टाकला.ग्रामस्थांच्या उपोषणाची व मतदानावर बहिष्काराची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. दुपारी दीड वाजता प्रांताधिकारी राजेंद्र कचवे मंडपात पोहचले. त्यांनी शासनाच्या वतीने शेतक:यांना  मतदान करा बहिष्कार मागे घ्या अशी विनंती केली. तसेच 23 फेब्रुवारीनंतर तुम्हाला शासनाकडून  नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळेतच आमदार डॉ. सतीश पाटील  मंडपात पोहचले. त्यांनी प्रांताधिका:यांकडून कशा पद्धतीने कार्यवाही सुरू आहे हे जाणून घेतले.त्यानंतर डॉ. सतीश पाटील म्हणाले की, शासनाला शेतक:यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालायला वेळ नाही.  शासकीय अधिका:यांकडून गारपीटग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचणी येत असतील, तर येणा:या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सर्व शेतक:यांचे प्रश्न मार्गी लावू. सगळ्यांनी बहिष्कार सोडा आणि मतदान करा. यावर सर्व शेतक:यांचे एकमत झाले. शेतक:यांनी उपोषण व बहिष्कार मागे घेतला. दुपारी दोन वाजेनंतर गारपीटग्रस्त शेतक:यांनी सहकुटुंब मतदान केले. बहिष्कार मंडपात शेतक:यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्यासाठी शिक्षकनेते ह.म. पवार, शिवसेना तालुकाध्यक्ष आर.बी. पाटील, पारोळ्याचे अॅड.अण्णासाहेब पवार, नगराध्यक्ष करण पवार आदींनी भेट दिली.या आंदोलनात मनोहर लिंगायत, प्रदीप लिंगायत, सोनू पवार, पवन पवार, रमेश माळी, संभाजी बेलदार, विजय सोनार, भानुदास पवार, आनंदा बिरारी, शिवाजी माळी, संजय बेडिस्कर, प्रकाश पवार, पी.पी.पवार, अण्णा पंडित, श्रीराम पिरन पाटील, शांताराम माळी, देवीदास वाघ, एकनाथ चौधरी, राजधर पवार, डॉ.प्रशांत बागुल, प्रशांत कुलकर्णी यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.    (वार्ताहर)जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी चार मतदान केंद्र होते. या ठिकाणी 4951 मतदार होते. नुकसानग्रस्त शेतक:यांव्यतिरिक्त इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.4गावात अगदी शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस कर्मचा:यांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारी या नुकसानग्रस्त शेतक:यांनाही आगामी काळात मदत मिळवून देण्याचे आश्वासन मिळाल्याने, त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.