शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावच्या दोन्ही दिंड्यांचे यंदाही पंढरीकडे प्रस्थान नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

चाळीसगाव : वटपौर्णिमा झाली की, चाळीसगावच्या पंचक्रोशीतील समस्त वारकऱ्यांना दिंडीतून पंढरपूरकडे पायी वारीने मार्गस्थ होण्याचे वेध लागतात. यंदाही कोरोनाचा ...

चाळीसगाव : वटपौर्णिमा झाली की, चाळीसगावच्या पंचक्रोशीतील समस्त वारकऱ्यांना दिंडीतून पंढरपूरकडे पायी वारीने मार्गस्थ होण्याचे वेध लागतात. यंदाही कोरोनाचा विळखा घट्ट असल्याने सिद्धेश्वर आश्रमातून निघणारी ह.भ.प. ज्ञानेश्वर माउलींसह शिवाजी चौकातून निघणाऱ्या ह.भ.प. कृष्णा महाराज यांच्या दिंड्यांचे प्रस्थान यंदाही होणार नाही.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर माउलींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. चाळीसगावात पायी वारीची पताका ८० वर्षांपूर्वी ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी रोवली. आपल्या आठ ते दहा सहकाऱ्यांसह ते नित्यनेमाने दरवर्षी पांडुरंगाच्या भेटीला पायी वारीने जात. वटपौर्णिमेनंतर त्यांच्या दिंडीचे चाळीसगावातूनच प्रस्थान व्हायचे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र ह.भ.प. कृष्णा महाराज यांनी ही परंपरा पुढे नेली आहे.

कृष्णा महाराज गेल्या १५ वर्षांपासून दीडशे वारकऱ्यांसोबत मजल-दरमजल करीत पंढरपूरला जातात. वारीमार्गात विठू माउलीचा जयघोष करीत ते वैकुंठनगरी गाठतात. गेल्यावर्षी कोरोनामुळे त्यांच्या पायी वारीला प्रशासनाने परवानगी नाकारली. यंदाही कोरोनाचा उद्रेक पाहता त्यांच्या दिंडीचे प्रस्थान झालेले नाही.

सिद्धेश्वर आश्रमात दोन हजार वैष्णवांचा सहभाग

ज्ञानोबा माउली-तुकोबांचा गजर करीत बेलदारवाडीस्थित सिद्धेश्वर आश्रमातून गेल्या २७ वर्षांपासून ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली पायी दिंडी काढतात. गेल्यावर्षी कोरोनामुळे त्यांचीही दिंडी पंढरीकडे कूच करू शकली नाही. वारीच्या सुरुवातीलाच ८०० वारकरी सहभागी होतात. पुढे यात दोन हजारांहून अधिक वैष्णव सहभागी होऊन विठू माउलीचा गजर करीत पंढरी पाहण्याचे सुख अनुभवतात. गेल्या दोन वर्षांपासून या भक्ती सोहळ्यात कोरोनाने बाधा आणली आहे. यंदाही साथरोग पसरू नये. यासाठी दिंडी न काढण्याचा निर्णय ज्ञानेश्वर माउलींनी घेतला आहे.

कोरोना आटोक्यात आला असेल, तर आम्हाला दिंडीद्वारे पंढरपूरला जाऊ द्यावे. मात्र, संक्रमणाची स्थिती अजूनही सुधारत नसेल, तर आम्ही प्रशासनाला सहकार्य करू. वारीचा मूळ उद्देशच कुणालाही इजा न होता भक्तिभाव जोपासणे हा आहे.

-ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली

ह.भ.प. कृष्णा महाराज,

चाळीसगाव