शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

‘हमालपुरा ते कुलगुरू’ पुस्तकातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

फोटो - १६ सीटीआर ०२ आणखी एक फोटो आहे, पुस्तक प्रकाशनाचा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला ...

फोटो - १६ सीटीआर ०२

आणखी एक फोटो आहे, पुस्तक प्रकाशनाचा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला अन् तीच माझी पहिली भेट...हळूहळू त्यांना कार्यक्रमात बोलवू लागलो... मैत्री घट्ट होत गेली...आणि त्यातून समोर आला, त्यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अन् तो आपण ‘हमालपुरा ते कुलगुरू’ या पुस्तकातून सर्वांसमोर उलगडला. त्यांच्या या संघर्षमय जीवन प्रवासातून सर्वांनाच चांगली प्रेरणा मिळाल्याची भावना सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी व्यक्त करीत माजी कुलगुरू प्रा.डॉ. सुधीर मेश्राम यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सोमवारी नागपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.सुधीर मेश्राम यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यातच डॉ. मिलिंद बागुल यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सन २०११ मध्ये मेश्रामांनी कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला. तेव्हा स्वागताला गेलो ती त्यांच्या सोबतची आपली पहिली भेट. त्यानंतर एका पुस्तक प्रकाशनाला त्यांना बोलविले. हळूहळू ओळख वाढत गेली, मैत्री घट्ट होत गेली. एका दिवशी चर्चेतून त्यांनी संपूर्ण जीवन प्रवास आपल्याजवळ उलगडला अन् तो युवापिढीला प्रेरणा ठरणारा होता. म्हणून तो पुस्तकातून सर्वांसमोर यावा, हे आपण त्यांना सांगितले. वर्षभराच्या मेहनतीनंतर संपूर्ण ‘हमालपुरा ते कुलगुरू’ हा प्रा.डॉ. सुधीर मेश्रामांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडणारा पुस्तक लिहिले. सन २०१५ मध्ये त्यांच्याच हस्ते त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, तो क्षण अविस्मरणीय असल्याची भावना डॉ. मिलिंद बागुल यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. माजी कुलगुरू यांनी हमालपुरा या झोपडपट्टी भागात राहून घेतलेले शिक्षण...त्यांची ध्येय गाठण्याची जिद्द...प्राथमिक शिक्षणापासून ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण कसे घेतले... विद्यापीठात केलेले संशोधन, देशपातळीवर पोहोचलेले उपक्रम, सामंजस्य करार, अ श्रेणीसाठी नॅक समितीला दिलेले आव्हान...यासह शिस्तप्रिय कुलगुरुपर्यंतचा संपूर्ण प्रवास पुस्तकातून उलगडल्याचे डॉ. बागुल यांनी सांगितले. मेश्राम यांचा दोनशेपेक्षा अधिक संघटनांकडून गौरव झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राध्यापक असण्याबरोबरच ते संशोधक होते. विद्यापीठाचा विकास कसा साधता येईल, यासाठी त्यांच्या असणाऱ्या कारकिर्दीत प्रयत्नशील होते. त्यांच्या व्यक्तीश: असणाऱ्या संबंधांमुळे विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त झाले. एक स्वतंत्र ओळख म्हणून या विद्यापीठाला एक चांगला दर्जा प्राप्त झाला़ एक सच्चा शिक्षणतज्ज्ञ गमावल्याचे खूप मोठे दु:ख शिक्षण क्षेत्रावर कोसळले आहे. त्यांना विनम्र आदरांजली.

- डॉ. मिलिंद बागुल, जिल्हाध्यक्ष, सत्यशोधकी साहित्य परिषद