शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘हमालपुरा ते कुलगुरू’ पुस्तकातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

फोटो - १६ सीटीआर ०२ आणखी एक फोटो आहे, पुस्तक प्रकाशनाचा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला ...

फोटो - १६ सीटीआर ०२

आणखी एक फोटो आहे, पुस्तक प्रकाशनाचा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला अन् तीच माझी पहिली भेट...हळूहळू त्यांना कार्यक्रमात बोलवू लागलो... मैत्री घट्ट होत गेली...आणि त्यातून समोर आला, त्यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अन् तो आपण ‘हमालपुरा ते कुलगुरू’ या पुस्तकातून सर्वांसमोर उलगडला. त्यांच्या या संघर्षमय जीवन प्रवासातून सर्वांनाच चांगली प्रेरणा मिळाल्याची भावना सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी व्यक्त करीत माजी कुलगुरू प्रा.डॉ. सुधीर मेश्राम यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सोमवारी नागपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.सुधीर मेश्राम यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यातच डॉ. मिलिंद बागुल यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सन २०११ मध्ये मेश्रामांनी कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला. तेव्हा स्वागताला गेलो ती त्यांच्या सोबतची आपली पहिली भेट. त्यानंतर एका पुस्तक प्रकाशनाला त्यांना बोलविले. हळूहळू ओळख वाढत गेली, मैत्री घट्ट होत गेली. एका दिवशी चर्चेतून त्यांनी संपूर्ण जीवन प्रवास आपल्याजवळ उलगडला अन् तो युवापिढीला प्रेरणा ठरणारा होता. म्हणून तो पुस्तकातून सर्वांसमोर यावा, हे आपण त्यांना सांगितले. वर्षभराच्या मेहनतीनंतर संपूर्ण ‘हमालपुरा ते कुलगुरू’ हा प्रा.डॉ. सुधीर मेश्रामांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडणारा पुस्तक लिहिले. सन २०१५ मध्ये त्यांच्याच हस्ते त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, तो क्षण अविस्मरणीय असल्याची भावना डॉ. मिलिंद बागुल यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. माजी कुलगुरू यांनी हमालपुरा या झोपडपट्टी भागात राहून घेतलेले शिक्षण...त्यांची ध्येय गाठण्याची जिद्द...प्राथमिक शिक्षणापासून ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण कसे घेतले... विद्यापीठात केलेले संशोधन, देशपातळीवर पोहोचलेले उपक्रम, सामंजस्य करार, अ श्रेणीसाठी नॅक समितीला दिलेले आव्हान...यासह शिस्तप्रिय कुलगुरुपर्यंतचा संपूर्ण प्रवास पुस्तकातून उलगडल्याचे डॉ. बागुल यांनी सांगितले. मेश्राम यांचा दोनशेपेक्षा अधिक संघटनांकडून गौरव झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राध्यापक असण्याबरोबरच ते संशोधक होते. विद्यापीठाचा विकास कसा साधता येईल, यासाठी त्यांच्या असणाऱ्या कारकिर्दीत प्रयत्नशील होते. त्यांच्या व्यक्तीश: असणाऱ्या संबंधांमुळे विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त झाले. एक स्वतंत्र ओळख म्हणून या विद्यापीठाला एक चांगला दर्जा प्राप्त झाला़ एक सच्चा शिक्षणतज्ज्ञ गमावल्याचे खूप मोठे दु:ख शिक्षण क्षेत्रावर कोसळले आहे. त्यांना विनम्र आदरांजली.

- डॉ. मिलिंद बागुल, जिल्हाध्यक्ष, सत्यशोधकी साहित्य परिषद