शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

बेवारस म्हणून दफन केलेल्या भादलीच्या तरुणाचा मृतदेह उकरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:17 IST

:रेल्वे अपघातात ठार झालेल्या तरुणावर बेवारस म्हणून दफनविधी केलेल्या तरुणाची १२ दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन पुरलेला मृतदेह उकरण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नातेवाईकांनी या तरुणावर सायंकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. नारायण राजाराम ठाकूर (वय ३०, रा.भादली, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

ठळक मुद्दे१२ दिवसानंतर पटली ओळखनातेवाईकांनी केले विधीवत अंत्यसंस्कारअन् नातेवाईकांनी जळगाव गाठले

१२ दिवसानंतर पटली ओळख : नातेवाईकांनी केले विधीवत अंत्यसंस्कार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१३ :

रेल्वे अपघातात ठार झालेल्या तरुणावर बेवारस म्हणून दफनविधी केलेल्या तरुणाची १२ दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन पुरलेला मृतदेह उकरण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नातेवाईकांनी या तरुणावर सायंकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. नारायण राजाराम ठाकूर (वय ३०, रा.भादली, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेत मजुरी करणाºया नारायण ठाकूर या तरुणाचा ३० आॅगस्ट रोजी भादली स्टेशनजवळ रेल्वे अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने नशिराबाद पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शासकीय नियमानुसार तीन दिवसात त्याची ओळख न पटल्याने पोलिसांनी नेरी नाका स्मशानभूमीत या तरुणाचा दफनविधी केला. दुसरीकडे मुलगा घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. घरी येण्याची प्रतिक्षा संपल्याने वडील राजाराम दिपचंद ठाकूर, भादली विद्यालयात शिक्षक असलेले चुलत भाऊ एस.पी.ठाकूर व अन्य नातेवाईक सोमवारी नशिराबाद पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तेथे त्यांना एका तरुणाचा मृतदेह भादली रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याची माहिती मिळाली.अन् नातेवाईकांनी जळगाव गाठलेनारायण ठाकूर या तरुणाचा फोटो दाखविल्यानंतर पोलिसांनीही मयताला ओळखले. मंगळवारी तहसीलदारांची परवानगी घेऊन पोलिसांच्या समक्ष नेरी नाका परिसरात पुरलेला मृतदेह उकरण्यात आला. मृतदेह पाहताच आई, वडील व अन्य नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेची माहिती अन्य नातेवाईकांनी तातडीने कळविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता विधीवत पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नशिराबाद पोलीसही उपस्थित होते.पत्नी ठाण्याला पोलीस कॉन्स्टेबलनारायण ठाकुर या तरुणाकडे थोडीफार शेती आहे. त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. वडील राजाराम पाटील, आई हिराबाई हे दोन्ही शेती काम करायचे तर नारायण यांची पत्नी निशा या ठाणे ग्रामीणला पोलीस कॉन्स्टेबल आहे. सायंकाळी उशिरापर्यंत त्या जळगावमध्ये पोहचलेल्या नव्हत्या.