शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बेवारस म्हणून दफन केलेल्या भादलीच्या तरुणाचा मृतदेह उकरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:17 IST

:रेल्वे अपघातात ठार झालेल्या तरुणावर बेवारस म्हणून दफनविधी केलेल्या तरुणाची १२ दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन पुरलेला मृतदेह उकरण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नातेवाईकांनी या तरुणावर सायंकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. नारायण राजाराम ठाकूर (वय ३०, रा.भादली, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

ठळक मुद्दे१२ दिवसानंतर पटली ओळखनातेवाईकांनी केले विधीवत अंत्यसंस्कारअन् नातेवाईकांनी जळगाव गाठले

१२ दिवसानंतर पटली ओळख : नातेवाईकांनी केले विधीवत अंत्यसंस्कार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१३ :

रेल्वे अपघातात ठार झालेल्या तरुणावर बेवारस म्हणून दफनविधी केलेल्या तरुणाची १२ दिवसानंतर ओळख पटली. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन पुरलेला मृतदेह उकरण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नातेवाईकांनी या तरुणावर सायंकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. नारायण राजाराम ठाकूर (वय ३०, रा.भादली, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेत मजुरी करणाºया नारायण ठाकूर या तरुणाचा ३० आॅगस्ट रोजी भादली स्टेशनजवळ रेल्वे अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने नशिराबाद पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शासकीय नियमानुसार तीन दिवसात त्याची ओळख न पटल्याने पोलिसांनी नेरी नाका स्मशानभूमीत या तरुणाचा दफनविधी केला. दुसरीकडे मुलगा घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. घरी येण्याची प्रतिक्षा संपल्याने वडील राजाराम दिपचंद ठाकूर, भादली विद्यालयात शिक्षक असलेले चुलत भाऊ एस.पी.ठाकूर व अन्य नातेवाईक सोमवारी नशिराबाद पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तेथे त्यांना एका तरुणाचा मृतदेह भादली रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याची माहिती मिळाली.अन् नातेवाईकांनी जळगाव गाठलेनारायण ठाकूर या तरुणाचा फोटो दाखविल्यानंतर पोलिसांनीही मयताला ओळखले. मंगळवारी तहसीलदारांची परवानगी घेऊन पोलिसांच्या समक्ष नेरी नाका परिसरात पुरलेला मृतदेह उकरण्यात आला. मृतदेह पाहताच आई, वडील व अन्य नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेची माहिती अन्य नातेवाईकांनी तातडीने कळविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता विधीवत पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नशिराबाद पोलीसही उपस्थित होते.पत्नी ठाण्याला पोलीस कॉन्स्टेबलनारायण ठाकुर या तरुणाकडे थोडीफार शेती आहे. त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. वडील राजाराम पाटील, आई हिराबाई हे दोन्ही शेती काम करायचे तर नारायण यांची पत्नी निशा या ठाणे ग्रामीणला पोलीस कॉन्स्टेबल आहे. सायंकाळी उशिरापर्यंत त्या जळगावमध्ये पोहचलेल्या नव्हत्या.