शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

बहरलेली झेंडूची फुले, झाडे लॉकडाऊनमुळे उपटून फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:24 IST

लॉकडाऊनमुळे फुलांना खरेदीदार मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका ।कोरोनाचा फुल शेतीला मोठा फटकातोडणीस आलेल्या फुलांचे मोठे नुकसानखरेदीदार मिळेना

चंद्रमणी इंगळेहरताळा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा हरताळे शिवारात पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. फुलांची शेती चांगलीच बहरली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे फुलांना खरेदीदार मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या झेंडूची फुले, झाडेच उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.हरताळा शिवारातील गट नंबर ८०/१ मध्ये युवराज रामकृष्ण चोपडे यांनी एक एकर क्षेत्रात झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. चांगला पाऊस आणि योग्य संगोपन यामुळे झेंडूचे पीक चांगलेच बहरले. मात्र तोडणीच्या वेळी लॉकडाऊनचा फटका या शेतकºयाला बसला आहे. सध्या कुणीही खरेदीदार मिळत नसल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकºयाने सांगितले की, पाण्याची सुविधा असल्यामुळे फुल शेती यंदा चांगली बहरली. मात्र पहिल्यांदाच अशा परिस्थितीचा सामना करीत असल्याने झेंडूची शेती चांगली बहरल्याने तोडणी गरजेची आहे. पण कुणी खरेदी करण्यास तयार नसल्याने फुले, झाडे उन्हामुळे सुकत असून, झाडेही उपटून फेकण्याची वेळ आली आहे. सुकलेली फुलदाणी उपटून फेकली. विशेष म्हणजे कोणतेही संकट आले तरी फुलांची विक्री बंद होत नव्हती. मात्र यावेळी लॉकडाऊनमुळे श्रीक्षेत्र मुक्ताई मंदिर, हरताळे मंदिर, चांगदेव महाराज मंदिर तसेच संस्थांना विक्री होणारी तसेच तालुक्यावरील वितरकांची फुल विक्रीची बंदी यामुळे सगळीकडील मागणी बंद झालेली आहे.महत्वाचे म्हणजे भर उन्हाळ्यातील लग्न समारंभ, यात्रा, सत्यनारायण महापूजा, वास्तुशांती, जागरण गोंधळ, उद्घाटन, महापुरुष जयंती विशेष, सप्ताह आदी कार्यक्रम बंद आहेत. परिणामी फुले शेतातच खराब झाली. त्यामुळे सुरुवातीला खरीप व आता रब्बी हंगामापासूनही वंचित राहिल्याने व फुलशेतीनेही धोका दिल्याने चांगलीच कोंडी झाली आहे. यासाठी पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.लॉकडाऊनमुळे फुल विक्री बंद आहे. परिसरातील सर्वच शेतकºयांची फुले शेतात पडून आहे. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. फुल शेतीसाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. तसेच फुल शेतीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीत व रब्बीचा हंगाम गेल्याने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक लाभ मिळणे गरजेचे आहे.-युवराज रामकृष्ण चोपडे, शेतकरी, हरताळा, ता.मुक्ताईनगर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर