शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर,चार दिवस पुरेल ऐवढाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याने, याचा शहरातील रक्तपेढीवर मोठा परिणाम झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याने, याचा शहरातील रक्तपेढीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या तर लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने रक्ताचा अधिकच तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रक्तपेढ्या ऑक्सिजनवर असून,चार दिवस पुरेल एवढाच साठा असल्याचे रक्तपेढ्यांतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जळगाव शहरात शासकीय रक्तपेढीसह तीन खाजगी रक्तपेढ्या आहेत. कोरोनापूर्वी या रक्तपेढ्यांमध्ये दर आठवड्याला १०० ते १२५ बाटल्यांचे रक्त संकलन केले जायचे. रक्त संकलनासाठी दर आठवड्याला विविध सामाजिक संस्थांतर्फे शिबिरे घेतली जात होती. यातून मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध होत होता. तसेच काही नागरिक स्वतः रक्तपेढीत जाऊन रक्तदान करत होते. त्यामुळे जिल्ह्याभरात कधीही रक्ताचा तुटवडा जाणवत नव्हता. मात्र, आता कोरोनामुळे रक्तपेढी चालकांना शिबिरे घेता येत नसल्याने आणि दुसरीकडे नागरिक कोरोनाच्या भीतीने रक्तदान करणे टाळत असल्यामुळे सध्या शहरातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये येत्या काही दिवसात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील शासकीय रक्तपेढीतही चारच दिवसांचा रक्तसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. रक्ताच्या या तुटवड्यामुळे थॅलेसिमिया आजारातील बालकांना रक्त पुरवठ्याबाबत मोठे आवाहन निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

रेड प्लस ब्लड बँकेत एका दिवसाचाच साठा

शहरातील रेड प्लस ब्लड बँकेतही कोरोनामुळे रक्त साठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे रक्त संकलनाचे प्रमाण तीस टक्क्यांवर आले असून, सध्या रेड प्लस बँकेत फक्त आठ बाटल्या रक्त शिल्लक आहे.त्यामुळे हा एक दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याचे डॉक्टर भरत गायकवाड यांनी सांगितले.

इन्फो :

माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी

या रक्तपेढीतही सध्या विविध ग्रुपच्या मोजक्याच रक्त पिशव्या शिल्लक आहेत. कोरोनापूर्वी दर आठवड्याला ५० ते ६० पिशव्या रक्त संकलन व्हायचे. येणाऱ्या प्रत्येकाला रक्त उपलब्ध करून दिले जायचे.मात्र, कोरोनामुळे रक्त संकलनाचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके झाले आहे. त्यामुळे सध्या २० पिशव्या रक्त साठा शिल्लक असून, हा रक्तसाठा दोनच दिवसांचा असल्याचे माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीतर्फे अर्जुन राठोड यांनी सांगितले.

रेडक्रॉस रक्तपेढी

रेडक्रॉस तर्फे कोरोना पूर्वी दर आठवड्याला विविध ठिकाणी होणाऱ्या शिबिरांमध्ये २०० ते २५० रक्त पिशव्यांचे रक्त संकलन व्हायचे. मात्र,आता कोरोनामुळे हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आले असल्याचे रेडक्रॉस रक्त पेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले. सध्या कोरोना काळात रेडक्रॉसकडे ३० टक्केच रक्तसाठा असून, लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे भविष्यात अधिकच रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहनही डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

इन्फो :

शासकीय रक्तपेढीतही चार दिवसांचा रक्तसाठा

येथील शासकीय रक्तपेढीतही कोरोनापूर्वी दर आठवड्याला १०० ते १२५ पिशव्यांचे रक्त संकलन व्हायचे. रक्त संकलनासाठी शाळा, महाविद्यालय व विविध सामाजिक संस्थातर्फे आयोजित कार्यक्रमात रक्त संकलनासाठी शिबिरे घेतली जायची.मात्र, आता कोरोनामुळे शिबिरे घेता येत नसल्याने,परिणामी रक्त संकलनावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या रक्त संकलनाचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांपर्यंत आले आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या या कठीण काळात शासकीय रक्तपेढीतही चार दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे डॉ. आकाश चौधरी यांनी सांगितले.

इन्फो :

लसीकरणा आधी करा रक्तदान

कोरोना पासून बचावासाठी शासनातर्फे कोरोना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मात्र, लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्त दात्यांना रक्तदान करता येणार नाही. तर लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही पुन्हा २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात रक्त पेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई अधिकच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन रक्त पेढी चालकांतर्फे करण्यात येत आहे.