शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर,चार दिवस पुरेल ऐवढाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याने, याचा शहरातील रक्तपेढीवर मोठा परिणाम झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याने, याचा शहरातील रक्तपेढीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या तर लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने रक्ताचा अधिकच तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रक्तपेढ्या ऑक्सिजनवर असून,चार दिवस पुरेल एवढाच साठा असल्याचे रक्तपेढ्यांतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जळगाव शहरात शासकीय रक्तपेढीसह तीन खाजगी रक्तपेढ्या आहेत. कोरोनापूर्वी या रक्तपेढ्यांमध्ये दर आठवड्याला १०० ते १२५ बाटल्यांचे रक्त संकलन केले जायचे. रक्त संकलनासाठी दर आठवड्याला विविध सामाजिक संस्थांतर्फे शिबिरे घेतली जात होती. यातून मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध होत होता. तसेच काही नागरिक स्वतः रक्तपेढीत जाऊन रक्तदान करत होते. त्यामुळे जिल्ह्याभरात कधीही रक्ताचा तुटवडा जाणवत नव्हता. मात्र, आता कोरोनामुळे रक्तपेढी चालकांना शिबिरे घेता येत नसल्याने आणि दुसरीकडे नागरिक कोरोनाच्या भीतीने रक्तदान करणे टाळत असल्यामुळे सध्या शहरातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये येत्या काही दिवसात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील शासकीय रक्तपेढीतही चारच दिवसांचा रक्तसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. रक्ताच्या या तुटवड्यामुळे थॅलेसिमिया आजारातील बालकांना रक्त पुरवठ्याबाबत मोठे आवाहन निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

रेड प्लस ब्लड बँकेत एका दिवसाचाच साठा

शहरातील रेड प्लस ब्लड बँकेतही कोरोनामुळे रक्त साठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे रक्त संकलनाचे प्रमाण तीस टक्क्यांवर आले असून, सध्या रेड प्लस बँकेत फक्त आठ बाटल्या रक्त शिल्लक आहे.त्यामुळे हा एक दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याचे डॉक्टर भरत गायकवाड यांनी सांगितले.

इन्फो :

माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी

या रक्तपेढीतही सध्या विविध ग्रुपच्या मोजक्याच रक्त पिशव्या शिल्लक आहेत. कोरोनापूर्वी दर आठवड्याला ५० ते ६० पिशव्या रक्त संकलन व्हायचे. येणाऱ्या प्रत्येकाला रक्त उपलब्ध करून दिले जायचे.मात्र, कोरोनामुळे रक्त संकलनाचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके झाले आहे. त्यामुळे सध्या २० पिशव्या रक्त साठा शिल्लक असून, हा रक्तसाठा दोनच दिवसांचा असल्याचे माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीतर्फे अर्जुन राठोड यांनी सांगितले.

रेडक्रॉस रक्तपेढी

रेडक्रॉस तर्फे कोरोना पूर्वी दर आठवड्याला विविध ठिकाणी होणाऱ्या शिबिरांमध्ये २०० ते २५० रक्त पिशव्यांचे रक्त संकलन व्हायचे. मात्र,आता कोरोनामुळे हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आले असल्याचे रेडक्रॉस रक्त पेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले. सध्या कोरोना काळात रेडक्रॉसकडे ३० टक्केच रक्तसाठा असून, लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे भविष्यात अधिकच रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहनही डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

इन्फो :

शासकीय रक्तपेढीतही चार दिवसांचा रक्तसाठा

येथील शासकीय रक्तपेढीतही कोरोनापूर्वी दर आठवड्याला १०० ते १२५ पिशव्यांचे रक्त संकलन व्हायचे. रक्त संकलनासाठी शाळा, महाविद्यालय व विविध सामाजिक संस्थातर्फे आयोजित कार्यक्रमात रक्त संकलनासाठी शिबिरे घेतली जायची.मात्र, आता कोरोनामुळे शिबिरे घेता येत नसल्याने,परिणामी रक्त संकलनावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या रक्त संकलनाचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांपर्यंत आले आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या या कठीण काळात शासकीय रक्तपेढीतही चार दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे डॉ. आकाश चौधरी यांनी सांगितले.

इन्फो :

लसीकरणा आधी करा रक्तदान

कोरोना पासून बचावासाठी शासनातर्फे कोरोना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मात्र, लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्त दात्यांना रक्तदान करता येणार नाही. तर लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही पुन्हा २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात रक्त पेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई अधिकच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन रक्त पेढी चालकांतर्फे करण्यात येत आहे.