शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन बहुमताचा ठराव विखंडनासाठी भाजपच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्नावर महासभेत सत्ताधाऱ्यांनी मनपा प्रशासनाने दिलेला प्रस्ताव मंजूर केल्यानंतर, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्नावर महासभेत सत्ताधाऱ्यांनी मनपा प्रशासनाने दिलेला प्रस्ताव मंजूर केल्यानंतर, यावर आता गाळेधारक संघटनेकडून विरोध होत आहे. तसेच महासभेत घेण्यात आलेला निर्णय हा मतदानाने घेण्यात आलेला नसून, केवळ ५४ नगरसेवक उपस्थित असताना ४२ जणांचा पाठिंबा या प्रस्तावाला मिळू शकत नाही. असा दावा करत महासभेने केलेला ठराव विखंडन करण्यासाठी राज्य शासनाकडे जाण्याची तयारी भाजपने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच याबाबत आवश्यक माहितीसह सर्व तयारी करण्याची जबाबदारी भाजपने ॲड. शुचिता हाडा यांच्यावर सोपवली आहे. महासभेत भाजपने या प्रस्तावाला दिलेल्या मंजुरीवर आक्षेप घेतले होते. तसेच ऑनलाइन महासभेत ५४ नगरसेवक उपस्थित असल्याचे पाहावयास मिळत होते. त्यात देखील काही मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे नगरसेवकांची संख्या ही ५० पर्यंत असू शकते. मात्र, अशा परिस्थितीत या ठरावाला ४२ जणांचा पाठिंबा कसा मिळाला, असा प्रश्न ॲड. शुचिता हाडा यांनी उपस्थित केला होता. मात्र, महासभेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केल्यामुळे आता भाजपने या ठरावाविरोधात राज्य शासनाकडे जाण्याची तयारी केली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी मनपा फंडातून करण्यात येणाऱ्या ठराव या महासभेत रद्द करण्यात आला. याविरोधात देखील भाजपकडून हा ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

पाचपट दंड रद्द करण्याच्या ठरावाबाबत शासनाकडून मनपाला विचारणा

मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम न भरल्याने, मनपा प्रशासनाने थकीत गाळे भाड्यावर पाचपट दंड आकारणीच्या निर्णय घेतला होता. मात्र, तत्कालीन मनपातील सत्ताधारी भाजपने मनपा प्रशासनाचा हा निर्णय रद्द करण्याचा ठराव महासभेत मंजूर करून घेतला होता. मनपा आयुक्तांनी हा ठराव राज्य शासनाकडे पाठवला असून, शासनाने याबाबत संपूर्ण माहिती व प्रकरण जाणून घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच याबाबतचे पत्र महापालिकेला नुकतेच प्राप्त झाले असल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली आहे.