शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
3
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
4
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
6
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
7
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
8
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
9
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
10
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
11
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
12
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
13
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
14
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
15
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
16
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
17
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
18
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
19
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
20
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या करावर भाजप उदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:18 IST

सुशील देवकर शहरातील समस्या सोडविण्यासाठी मनपाकडे पैशांची चणचण असताना कर्जबाजारी मनपाच्या हद्दीत पाच गावांचा समावेश करण्याचा ठराव मनपातील ...

सुशील देवकर

शहरातील समस्या सोडविण्यासाठी मनपाकडे पैशांची चणचण असताना कर्जबाजारी मनपाच्या हद्दीत पाच गावांचा समावेश करण्याचा ठराव मनपातील सत्ताधारी भाजपने केला? आहे. हा ठराव नक्की कोणत्या उद्देशाने केला? याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. खुद्द भाजपातीलच काही नगरसेवक या ठरावाबाबत नाराजी असल्याचे खाजगीत बोलून दाखवित असताना हा ठराव आणण्याचा व विरोधानंतरही मंजुरीचा अट्टाहास का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हुडको कर्जाची तडजोड झालेली असली तरीही ती मनपाच्या दृष्टीने तोट्याचीच ठरली असून, मुद्दलापेक्षाही दुप्पट रक्कम फेड केलेली असतानाही मोठ्या रक्कमेची फेड मनपा हुडकोला करीत आहे. त्यामुळे मनपाकडे आजही शहरातील विकासकामांसाठीच काय नागरिकांच्या किरकोळ समस्या सोडविण्यासाठीदेखील पैसे नाहीत. मनपाच्या मालकीच्या मार्केटमधील गाळ्यांच्या लिलावाचा विषय २०१२ पासून प्रलंबित आहे. भाजपनेच हा विषय तेव्हापासून वारंवार अडथळे आणत व्यापाऱ्यांच्या हितासाठी लांबवित ठेवला आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयातही मनपाच्या बाजूने निकाल लागूनही केवळ राजकारणासाठी भाजपकडून मनपाचे व पर्यायाने शहरातील नागरिकांचे नुकसान केले जात आहे. कारण या गाळ्यांची मुदत संपूनही बेकायदेशीरपणे हे गाळे व्यापाऱ्यांच्याच ताब्यात आहेत. आमदार सुरेश भोळे यांनी निवडणुकीत हे गाळे मालकीहक्काने मिळवून देण्याचे अशक्यप्राय आश्वासन दिले होते. ते अंगाशी येत असल्याने वेळ मारून नेण्यासाठी हा विषय लांबविला जात आहे. मात्र त्यामुळे मनपाचे हक्काचे कोट्यवधींचे उत्पन्न मिळू शकलेले नाही. मनपाकडे पैसा नसल्याने प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना मात्र खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी, बंद पथदिवे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सध्या अमृत योजनेमुळे रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जलवाहिनी व भुयारी गटार या दोन्हींचे काम ज्या भागात झाले, तेथील रस्त्यांचे काम तरी सुरू करण्यास हरकत नाही. मात्र तेदेखील मनपाकडून सुरू झालेले नाही. अशी परिस्थिती असताना मनपाच्या हद्दीत आव्हाणे, कुसुंबा, मोहाडी, सावखेडा व मन्यारखेडा या गावांचा समावेश करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपकडून करण्यात आला. या ठरावास शिवसेना व एमआयएमने विरोध केला. तसेच भाजपतीलच काही नगरसेवकांनाही हा विषय मनापासून आवडला नाही. मात्र त्यांचा नाईलाज होता, असे खासगीत सांगितले, मग हा ठराव करण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे. यामागे जळगाव शहर मतदारसंघाचे भविष्यात होणारे विभाजन हे कारण आहे? की? अनेक नगरसेवकांचेच असलेले या गावांच्या शिवारातील ले-आउट हे कारण आहे? याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.