शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:15 IST

सुशील देवकर मनपात असलेल्या राक्षसी बहुमतानंतरही शहरातील समस्यांवर संवेदनील राहून तोडगा काढण्यात झालेले दुर्लक्ष, आपल्या वॉर्डातील कामे होत नसल्याने ...

सुशील देवकर

मनपात असलेल्या राक्षसी बहुमतानंतरही शहरातील समस्यांवर संवेदनील राहून तोडगा काढण्यात झालेले दुर्लक्ष, आपल्या वॉर्डातील कामे होत नसल्याने नाराजी व्यक्त करणाऱ्या नगरसेवकांकडे केलेले दुर्लक्ष किंबहुना त्यांना हिशेबात न धरण्याची केलेली चूकच भाजपाला भोवली असल्याचे मनपातील सत्तांतर नाट्यातून दिसून आले आहे. बंडखोर नगरसेवकांनी तर थेटपणे आमदार सुरेश भोळे यांचे नाव घेत नाराजी व्यक्त केली तर पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन यांनीही या नगरसेवकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचेही स्पष्ट केले. आमदार भोळे यांनी अगदी मुलाची शपथ घेत कुणालाही वाईट किंवा अरेरावीने बोललो नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचा स्वभाव बघता त्यात तथ्य आहे. मात्र निर्णय प्रक्रियेत नगरसेवकांना स्थान डावलण्याचा प्रकार आमदार भोळे व आमदार गिरीश महाजन यांच्याकडून झाला, हे स्पष्ट आहे. किंबहुना या नगरसेवकांना भाजपाने निवडून आणले, याच अभिमानात जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना दुर्लक्षित करण्याची चूक केली. या नगरसेवकांना मात्र कामे होत नसल्याने पुढील अडीच वर्षात तरी कामे करून पुढील निवडणुकीत जनतेला सामोरे जाता यावे, हाच उद्देश होता. तो जर भाजपाच्या नेतृत्वानेच त्यांच्या भावना समजून घेत सोडविला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. अर्थात हे अगदी वरवरचे झाले. प्रत्यक्षात निविदांचे, ठेक्यांचे घोळ, त्यावरून होत असलेले भेदभाव हे देखील या नाराजीच्या आगीत तेल ओतणारे ठरले असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक या नगरसेवकांना भाजपाने निवडून आणले अशा आविर्भावात भाजप नेते वावरत राहिले, अजूनही त्याच आविर्भावात आहेत. मात्र जर पक्षाच्याच बळावर निवडून आणले तर मग बाहेरच्या पक्षातील उमेदवारांची आयात करण्याची गरजच त्यावेळी भाजपला पडली नसती. त्यामुळे या बंडखोरांपैकी जे बाहेरून भाजपात आलेले होते, त्यांचे त्यांच्या प्रभागात थोडेफार तरी नाव होते. त्याला भाजपचे पाठबळ मिळाल्याने ते निवडून आले एवढे जरी समजून भाजप नेते वागले असते तर कदाचित ही वेळ आली नसतील. तसेच महापालिका निवडणुकीच्यावेळी १ वर्षात जळगाव शहराचा कायापालट करण्याचे जाहीर आश्वासनही माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र अडीच वर्ष उलटूनही शहराचा विकास होण्याऐवजी रखडलेल्या विकासकामांमुळे भकास झालेले, धुळीचे शहर असेच चित्र निर्माण झाले. मात्र अडीच वर्षात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घातलेले दिसून आले नाही. जनतेलाही गृहित धरण्याचा प्रकारच त्यातून झाला. त्यामुळे जनतेतही नाराजी व्यक्त होऊ लागली होती. त्याची जाणीव ज्या नगरसेवकांना झाली, त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेत सेनेच्या गोटात धाव घेतली. आधीची खान्देश विकास आघाडीच आता शिवसेनेच्या रूपाने सत्तेत आली आहे. त्यामुळे त्यांना मनपाच्या कारभाराच्या खाचाखोचा चांगल्याच ठावूक आहेत. त्या ज्ञानाचा उपयोग करीत लोकांना दिलासा देणारी कामे तातडीने होणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांना निवडणुकीत लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल, हे निश्चित.