शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

भाजपा नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:15 IST

सुशील देवकर मनपात असलेल्या राक्षसी बहुमतानंतरही शहरातील समस्यांवर संवेदनील राहून तोडगा काढण्यात झालेले दुर्लक्ष, आपल्या वॉर्डातील कामे होत नसल्याने ...

सुशील देवकर

मनपात असलेल्या राक्षसी बहुमतानंतरही शहरातील समस्यांवर संवेदनील राहून तोडगा काढण्यात झालेले दुर्लक्ष, आपल्या वॉर्डातील कामे होत नसल्याने नाराजी व्यक्त करणाऱ्या नगरसेवकांकडे केलेले दुर्लक्ष किंबहुना त्यांना हिशेबात न धरण्याची केलेली चूकच भाजपाला भोवली असल्याचे मनपातील सत्तांतर नाट्यातून दिसून आले आहे. बंडखोर नगरसेवकांनी तर थेटपणे आमदार सुरेश भोळे यांचे नाव घेत नाराजी व्यक्त केली तर पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन यांनीही या नगरसेवकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचेही स्पष्ट केले. आमदार भोळे यांनी अगदी मुलाची शपथ घेत कुणालाही वाईट किंवा अरेरावीने बोललो नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचा स्वभाव बघता त्यात तथ्य आहे. मात्र निर्णय प्रक्रियेत नगरसेवकांना स्थान डावलण्याचा प्रकार आमदार भोळे व आमदार गिरीश महाजन यांच्याकडून झाला, हे स्पष्ट आहे. किंबहुना या नगरसेवकांना भाजपाने निवडून आणले, याच अभिमानात जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना दुर्लक्षित करण्याची चूक केली. या नगरसेवकांना मात्र कामे होत नसल्याने पुढील अडीच वर्षात तरी कामे करून पुढील निवडणुकीत जनतेला सामोरे जाता यावे, हाच उद्देश होता. तो जर भाजपाच्या नेतृत्वानेच त्यांच्या भावना समजून घेत सोडविला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. अर्थात हे अगदी वरवरचे झाले. प्रत्यक्षात निविदांचे, ठेक्यांचे घोळ, त्यावरून होत असलेले भेदभाव हे देखील या नाराजीच्या आगीत तेल ओतणारे ठरले असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक या नगरसेवकांना भाजपाने निवडून आणले अशा आविर्भावात भाजप नेते वावरत राहिले, अजूनही त्याच आविर्भावात आहेत. मात्र जर पक्षाच्याच बळावर निवडून आणले तर मग बाहेरच्या पक्षातील उमेदवारांची आयात करण्याची गरजच त्यावेळी भाजपला पडली नसती. त्यामुळे या बंडखोरांपैकी जे बाहेरून भाजपात आलेले होते, त्यांचे त्यांच्या प्रभागात थोडेफार तरी नाव होते. त्याला भाजपचे पाठबळ मिळाल्याने ते निवडून आले एवढे जरी समजून भाजप नेते वागले असते तर कदाचित ही वेळ आली नसतील. तसेच महापालिका निवडणुकीच्यावेळी १ वर्षात जळगाव शहराचा कायापालट करण्याचे जाहीर आश्वासनही माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र अडीच वर्ष उलटूनही शहराचा विकास होण्याऐवजी रखडलेल्या विकासकामांमुळे भकास झालेले, धुळीचे शहर असेच चित्र निर्माण झाले. मात्र अडीच वर्षात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घातलेले दिसून आले नाही. जनतेलाही गृहित धरण्याचा प्रकारच त्यातून झाला. त्यामुळे जनतेतही नाराजी व्यक्त होऊ लागली होती. त्याची जाणीव ज्या नगरसेवकांना झाली, त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेत सेनेच्या गोटात धाव घेतली. आधीची खान्देश विकास आघाडीच आता शिवसेनेच्या रूपाने सत्तेत आली आहे. त्यामुळे त्यांना मनपाच्या कारभाराच्या खाचाखोचा चांगल्याच ठावूक आहेत. त्या ज्ञानाचा उपयोग करीत लोकांना दिलासा देणारी कामे तातडीने होणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांना निवडणुकीत लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल, हे निश्चित.