शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

भाजपाची उमेदवारी मिळाली आता एकीसाठी होणार कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:23 IST

स्मिता वाघ यांच्यापुढे आव्हान

ठळक मुद्दे ‘भाऊंशी दुरावा’; ‘संकटमोचक’ नाराज

चंद्रशेखर जोशी।जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाची उमेदवारी कुणाला? याचीे उत्सुकता शिगेला पाहोचली असताना पक्षनेतृत्वाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करून पक्षातील बड्या नेत्यांना धक्का दिला. उमेदवारी मिळाली आता मात्र पक्षांतर्गत दुरावा दूर करून ‘संकटमोचकां’चीही मदतीसाठी आरती ओवाळावी लागणार आहे.जळगाव लोकसभा मतदार संघात २००९ व त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा ए.टी. पाटील यांनी बाजी मारली. २०१४ मध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती. शिवसेनेने बंड पुकारल्याची स्थिती होती. मात्र ए.टी. पाटील ‘मोदी’ लाटेने तरले. केवळ तरलेच नाही तर राज्यात सर्वाधिक मते मिळविण्यात ते दुसऱ्या स्थानी होते.उमेदवारीसाठी सर्वाचीच कसरतया मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून चार जणांमध्ये स्पर्धा होती. यात खासदार ए.टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार व बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक सल्लागार व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती प्रकाश पाटील यांचा समावेश होता.सरळ दोन गटया मतदार संघातील उमेदवारीसाठी सरळ दोन गट दिसून आले. ते म्हणजे स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्वत: अनुकुल होते.मात्र जबाबदारी माझ्यावर टाकता मग उमेदवारी मी सांगेल त्यालाच द्या असे सांगत गिरीश महाजन यांनी प्रकाश पाटील यांचे नाव लावून धरले होते. थेट दिल्लीपर्यंत त्यांनी प्रयत्नही केले. मात्र यावेळी त्यांना अपयशच आले. याची काहीशी नाराजी महाजन यांची असल्याचेच त्यांच्या काही कृतीतून दिसून आले.का मिळाली उमेदवारी ?स्मिता वाघ यांना उमेदवारीच्या काही ठळक बाबी आहेत. त्यात त्यांचे संघटनात्मक योगदान निश्चितच पक्षाच्याही नजरेत भरेल असेच आहे. विद्यार्थी दशेपासून त्या विद्यार्थी परिषद आंदोलनांमध्ये वेळोवेळी सहभागी झाल्या आहेत. महिला जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्षा, प्रदेश चिटणीस, महिला प्रदेशाध्यक्षा अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. याबरोबरच संघ परिवाराशी असलेली जवळीक व सोपविण्यात आलेल्या जबाबदारीला न्याय देण्यात त्या यशस्वी ठरल्या. ही बाब लक्षात घेऊनच पक्षाने त्यांना संधी दिली हे नाकारून चालणार नाही.या बाबी ठरू शकतात त्रासदायकस्मिता वाघ यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यात त्यांनी बाजी मारली हे कोणीही नाकारू शकणार नाही. थेट महाजनांची ‘महाजनकी’ देखील कामी येऊ शकलेली नाही. पूर्वी ते खडसे समर्थक म्हणून परिचित होते. आता माजी मंत्री एकनाथराव खडसे त्यांच्यावर नाराज आहेत. आता महाजनांशीही काहीसे ताणले गेले हे गेल्या काही दिवसातील घटनांवरून समोर येत आहे. त्यातच जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक जण दुखावलेही आहेत. वाद टाळण्यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वेळोवेळी भेटी घेतल्या त्याचप्रमाणे ‘मुक्ताईनगर’ वारी करून दोघांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आता पक्षांतर्गत एकी साधण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.तीन महिला उमेदवार... दुसरी बाब म्हणजे ए.टी. पाटील यांच्या कथित वादाच्या मुद्यावर विरोधकांनी भांडवल करू नये खान्देशातील चार पैकी तीन लोकसभा मतदार संघात भाजपाने महिला उमेदवारांना संधी दिली आहे. यात नंदुरबारमधून डॉ. हीना गावीत, जळगावातून आमदार स्मिता वाघ व रावेरमधून खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण