शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजपकडून महापौर, उपमहापौरपदासाठी प्रत्येकी २-२ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला सत्तासंघर्ष अधिक रंजक होत चालला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला सत्तासंघर्ष अधिक रंजक होत चालला आहे. बुधवारी सकाळी महापौर व उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन व उपमहापौरपदासाठी कुुलभूषण पाटील या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर, दुपारी १ वाजेच्या सुमारास भाजपकडूनदेखील दोन्ही पदांसाठी प्रत्येक दोन-दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. महापौरपदासाठी भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांचे, तर उपमहापौरपदासाठी मयूर कापसे व सुरेश सोनवणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी कोणते उमेदवार निश्चित राहतील याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली चार नावे

महापौर व उपमहापौरपदासाठी कोणाला संधी द्यावी, याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जळगावातील जीएम फाउण्डेशनच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जमले होते. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काही नावे गिरीश महाजन यांच्याकडे पाठवण्यात आली आणि निर्णय महाजन यांच्यावर सोपविण्यात आला. महाजन यांनी महापौरपदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांनी, तर उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांनी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या चारही उमेदवारांनी दुपारी १ वाजता आपले अर्ज दाखल केले.

उद्यापर्यंत जो दहा नगरसेवक आणेल, त्याचे नाव फायनल?

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते गिरीश महाजन यांनी महापौर व उपमहापौरपद हव्या असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना एक अट घालून दिली आहे. २७ नगरसेवक फुटल्याने भाजप अल्पमतात आहे. सध्या भाजपकडे ३० नगरसेवक आहेत. पण त्यातूनही काही जण नॉट रिचेबल आहेत. अशा परिस्थितीत आवश्यक असलेला बहुमताचा ३८ हा आकडा गाठण्यासाठी भाजपला ८ नगरसेवक हवे आहेत. पण खबरदारी म्हणून पूर्ण १० नगरसेवक उद्यापर्यंत जो आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौरपदासाठी अंतिम असेल, अशी अट गिरीश महाजन यांनी घालून दिली आहे. एकंदरीतच भाजपची वाट बिकट मानली जात आहे.