शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

नियम न पाळल्यास आगामी काळात मोठा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

जळगाव : गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असून यापासून बचावासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ...

जळगाव : गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असून यापासून बचावासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्कचा वापर न करणे सॅनेटायझेशनमध्ये ढिलाई, यामुळे संसर्ग अधिक वाढत असून हे टाळत सर्वांनी नियमांचे पालन करा, अन्यथा आगामी काळात मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

‘पॉझिटिव्हिटी’ १० टक्क्यांपर्यंत पोहचली

कोरोनाचा धोका जिल्ह्यात वाढू लागला असून तीन टक्क्यांवर असलेले बाधितांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी) आता १० टक्क्यांपर्यंत पोहचले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने तयारी करण्यासह आरोग्यविषयक उपाययोजनादेखील केल्या जात असल्याचे सांगितले. रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन, औषधींचा तुटवडा भासणार नाही, यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

सर्व्हे वाढविणार

कोरोनाचा संसर्ग पाहता आता मोठ्या प्रमाणात सर्व्हे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यात गेल्या वर्षाप्रमाणे खाजगी डॉक्टर, लॅब, औषध विक्रेते यांचे सहकार्य घेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली जाईल व रुग्ण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

लग्नसमारंभावर विशेष लक्ष, विनाकारण प्रवास टाळागर्दी होणार नाही, यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मात्र तरीदेखील या विषयी गांभीर्य नसल्याने गर्दीच्या कार्यक्रमांवर त्यातल्या त्यात लग्नसमारंभांवर विशेष लक्ष राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले. ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा दिली असून त्याचे पालन करा, सर्व ठिकाणी पथकांची नजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनावश्यक प्रवास टाळा, कोठे आवश्यक असेल तर जा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

काय म्हणाले जिल्हाधिकारी

लक्षणे असल्यास तत्काळ तपासणी करा

यंत्रणा सज्ज आहे, आजार लपवू नका

मे-जूनमधील स्थिती पुन्हा येऊ देऊ नका

पॉझिटिव्ह असल्यास आयसोलेशनमध्ये रहा

दंड करण्याचा हेतू नाही, सामाजिक भान ठेवा

दुसऱ्या वेळी कोरोनाला हरवायचे आहे, सहकार्य करा