शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यात एक लाख २४ हजार आठशे वृक्षांनी होणार हिरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 19:55 IST

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सर्वत्र वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे तालुक्यातील ३९ गावांसाठी प्रत्येकी ३ हजार २०० याप्रमाणे एक लाख २४ हजार ८०० वृक्षांची लागवड १ जुलै ते ३१ आॅगस्ट दरम्यान टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवृक्षारोपण ठरू नये केवळ फोटोसेशनवृक्षांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सर्वत्र वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे तालुक्यातील ३९ गावांसाठी प्रत्येकी ३ हजार २०० याप्रमाणे एक लाख २४ हजार ८०० वृक्षांची लागवड १ जुलै ते ३१ आॅगस्ट दरम्यान टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. यामुळे प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तालुका हिरवळ होईल, मात्र फक्त फोटोसेशन करण्यासाठी वृक्ष लागवड केल्यास त्याचा काही उपयोग होणार नाही, वृक्षांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे.राज्यभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे टारगेट देण्यात आले आहे. कागदावरील टारगेट प्रत्यक्षात साकार करणेही तेवढेच गरजेचे आहे. वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत भुसावळ तालुक्यातील ३९ गावांना प्रत्येकी ३ हजार २०० वृक्ष याप्रमाणे तब्बल एक लाख २४ हजार आठशे वृक्षांची लागवड होणे अपेक्षित आहे. अनेक गावांमध्ये वृक्ष पोहोचलेसुद्धा आहेत. वृक्ष लागवडाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तालुक्यात हिरवळ येईल व हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरामध्ये प्रभावीपणे वृक्ष लागवडीची अंमलबजावणी झाल्यास निश्चितच तापमानामध्ये घट होईल.पंचायत समितीमार्फत दिलेले वृक्ष अनेक ठिकाणी तसेच पडूनतालुक्यातील ३९ गावांपैकी बहुतांशी गावांमध्ये वृक्षारोपणाचे वाटप करण्यात आलेले आहे. तशी दप्तरी नोंदही करण्यात आलेली आहे. परंतु अनेक गावांमध्ये वृक्ष पोहोचले खरे मात्र ते एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी पडून आहे. वृक्षांचे संवर्धन तर दूर, अजून लागवडसुद्धा झालेली नाही. शासनाला दाखवण्यापुरता एखादा वृक्ष लावून दहा-बारा मंडळी वृक्षाच्या अवती भोवती उभे राहून फोटो काढला जातो. गावात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला याचा गाजावाजा करण्यात येतो.वृक्ष लागवड पाहण्यासाठी पथक तयारगावामध्ये शासकीय उपक्रम असल्यामुळे वृक्ष आणली जातात. मात्र त्यांची स्थिती काय? किती ठिकाणी झाडे लावण्यात आली. त्याच्या संवर्धनाचा कसे करता येईल या सर्व बाबी तपासण्याकरिता पंचायत समिती मार्फत सहा सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. याद्वारे ते गावागावात भेटी देऊन वृक्ष लागवड झाली किंवा नाही याबाबत तपासणी करणार आहे. गोपनीय अहवाल प्रशासनाला सादर करणार आहे कर्तव्यात कसूर करणाºया ग्रामपंचायतींवर प्रसंगी कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.अनेक गावात खड्डा तोच रोप मात्र नव्हेअनेक गावांमध्ये मागच्याच वर्षाचे खड्डे चालू चालू उकरून त्याच खड्ड््यांमध्ये वृक्ष लागवडीची औपचारिकता करण्यात येत आहे, तर अनेक ठिकाणी पाठवलेले वृक्षांच्या फक्त पिशव्या पोहोचले आहे. त्यातील रोपटे गायब झाले असल्याची स्थिती आहे. एकूणच या उपक्रमाला औपचारिकता म्हणून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.भविष्यामध्ये तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी व समाधानकारक पावसासाठी वृक्ष लागवड अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाने जबाबदारीने वृक्षलागवड केली पाहिजे. हेच वृष्टी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.भुसावळ तालुक्यात वृक्ष लागवडीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. १ जुलै ते ३१ आॅगस्ट दरम्यान झाडे लावण्याचे उद्दिष्ट असले तरी जुलै शेवटपर्यंत पूर्ण तालुक्यात झाडे लावण्यात येतील. पथकाद्वारे ठिकाणी भेटी देऊन वृक्ष लागवडीची पाहणी करण्यात येईल.- विलास भाटकर, गटविकास अधिकारी, भुसावळ