शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

भुसावळ पालिकेच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:01 IST

पालिकेला मिळालेला पुरस्कार ‘मॅनेज’ करून मिळाल्याचा ‘जनाधार’चा आरोप

ठळक मुद्देशासनाच्या समितीवरच घेतला विरोधी गटातील सदस्यांनी संशयहतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने तूर्त पाणी गढूळ येत असल्याचे नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण

भुसावळ, जि.जळगाव : येथील पालिकेला स्वच्छता अभियानाचा मिळालेला पुरस्कार हा मॅनेज करून मिळवला असल्याचा आरोप जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी केल्यामुळे पालिकेच्या सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे अवघ्या सात मिनिटात २१ विषयांना सत्ताधारी गटाने आवाजी मताने मंजुरी देऊन सभा संपल्याचे जाहीर केले.दरम्यान, विरोधकांना सध्या शहरात सुरू असलेली विकास कामे पाहवली जात नाही. यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठले असल्याची टीका नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केली आहे.पालिकेच्या सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता सभेस प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, उपमुख्याधिकारी एस. जे. देशपांडे, गटनेते मुन्ना तेली उपस्थित होते.एक ते चार विषयांना सभागृहाने सर्वानुुमते मंजुरी दिल्यानंतर स्वच्छता महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेला मिळालेला पुरस्कार मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठेवण्याबाबत विचारविनिमय करणे या पाचव्या विषयाचे वाचन सुरू असताना जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी हा पुरस्कार मॅनेज करून मिळवला असल्याचा आरोप केला. त्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ निर्माण झाला. सत्ताधारी गटाचे नगरसेवक व विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच हमरी- तुमरी झाली. सत्ताधारी गटाचे नगरसेवक विरोधकांवर चांगलेच तोडून पडले. प्रसंगी सभागृहातील वातावरण पाहून नगराध्यक्ष भोळे यांनी १ ते २१ विषयांना आवाजी मताने मंजुरी देऊन सभा संपल्याचे जाहीर केले .दरम्यान, जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी गढूळ पाण्याची एक बाटली भरून आणली होती. यावेळी नगराध्यक्ष भोळे यांनी हे पाणी गढूळ असले तरीसुद्धा शुद्ध असल्याचे सांगितले. हतनूर धरणाचे नुकतेच ३६ दरवाजे उघडण्यात आले होते. यावेळी तापी नदीला गढूळ पाणी आले होते. आपल्या पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र हे अतिशय जुने आहे. यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करण्यात येते. मात्र पाण्याचा रंग बदलविण्यात येत नसल्याची माहिती नगराध्यक्ष भोळे यांनी दिली. त्यामुळे पाणी गढूळ असले तरी शुद्ध असते, असा दावा त्यांनी केला, तर अमृत योजनेमध्ये गढूळ पाणी शुद्ध करण्यात येणार असल्याची सुविधा असल्याचे भोळे यांनी सांगितले.दरम्यान, राज्य शासनाने दिलेला पुरस्कार हा एक समिती नेमून दिलेला असतो. त्यामुळे या पुरस्कारांसाठी निवड ही काटेकोरपणे केली जाते. मात्र पुरस्कारच मॅनेज करून मिळाला असल्याचा आरोप म्हणजे राज्य शासनाच्या त्या समितीवर संशय घेण्यासारखे असल्याची टीका नगराध्यक्ष भोळे यांनी केली.तसेच शहरात अमृत योजना, एल.ई.डी. लाईट, नपा दवाखान्यातील सुविधा यासह अनेक कामे सुरू आहे. ही कामे विरोधकांना सहन होत नाही. यामुळे त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन सर्वसाधारण सभेत गदारोळ केला असल्याचा आरोपही केला आहे.सभेस नगरसेवक मनोज बियाणी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक निर्मल कोठारी, राजेंद्र नाटकर, मेघा वाणी, रमेश नागराणी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, अमोल इंगळे, प्रा.दिनेश राठी, प्रमोद नेमाडे, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, जनाधार पार्टीच्या नगरसेविका पुष्पा सोनवणे, कविता चौधरी यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ