शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

‘बीएचआर’चा धुराळा जामनेर टू पुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:26 IST

तळेगाव, ता.जामनेर येथे १९९६ मध्ये स्थापन झालेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था स्थापनेच्या आठ वर्षांनंतर क्रेडिट सोसायटी झाली ...

तळेगाव, ता.जामनेर येथे १९९६ मध्ये स्थापन झालेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी ग्रामीण

बिगरशेती पतसंस्था स्थापनेच्या आठ वर्षांनंतर क्रेडिट सोसायटी झाली व तिसऱ्या टप्प्यात

२००७ मध्ये मल्टिस्टेटचा दर्जा मिळवीत देश पातळीवर पोहोचली. ग्रामीण पतसंस्थांनी

मल्टिस्टेट दर्जा घेण्यामागील गौडबंगाल काय याची चर्चा नेहमीच होते. पतसंस्था मल्टिस्टेट

झाल्याने फायदा सभासदांना होण्यापेक्षा संचालक मंडळाचाच जास्त होतो. सहकार

खात्यातील स्थानिकांकडून चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी कदाचित ही पळवाट असावी,

असे बोलले जाते.

ठेवीदारांच्या पावत्या नाममात्र दरात घेऊन त्या पावत्यांचे सेटलमेंट करून कोटीने

घेतलेले कर्ज फेडणारे व मालमत्ता खरेदी करणारे राजकीय कार्यकर्ते तालुक्यातील आहे.

आरोप-प्रत्यारोपात त्यांचे चेहरे समाजासमोर येत असल्याने यात विविध राजकीय पक्षाशी

संबंधितांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

मल्टिस्टेटचा दर्जा मिळवून घेण्यासाठी जवळच्या राज्यात एखादी नामधारी शाखा

उघडून विस्तार केला जातो. राष्ट्रीयीकृत बँकांकडून सर्वसामान्यांना अर्थसहाय्य मिळण्यात होत

असलेली अडचण लक्षात घेऊन पतसंस्थांची उभारणी ग्रामीण भागात झाली. उद्देश चांगला

असला तरी काही ठिकाणी संचालक मंडळाकडून त्याला स्वार्थामुळे हरताळ फसला गेला.

सभासदांचे भागभांडवल व गरजूंनी विश्वासाने ठेवलेल्या ठेवीवर संचालक मंडळाने डल्ला

मारून हा पैसा आपल्या खासगी गुंतवणुकीत अडकवून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले.

नेमकी हीच पद्धत बीएचआरमध्ये वापरली गेल्याने गैरव्यवहार उघडकीस आले.

आजही अस्तित्वात असलेल्या व काही मल्टिस्टेट दर्जा असलेल्या पतसंस्थांकडून

ठेवीदारांच्या पैशातून आपसात कर्जे वाटून घेतली जात असल्याचे दिसून येते. याच

माध्यमातून संचालक मंडळाने स्वतःच्या मालकीच्या मोठ्या इमारती उभारल्या व संस्थेचा

पैसा यात गुंतविल्याचे दिसून येते.

बीएचआरच्या मालमत्तेचा धुराळा जामनेरपासून पुण्यापर्यंत पोहोचला. ठेवीदारांना

पावत्यांच्या मोबदल्यात नाममात्र रक्कम देऊन त्यांची सावकार, दलाल, राजकीय नेते व

पुढारी यांनी बोळवण केली. संचालकांनी केलेला गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर

ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी शासनाने ज्याची नेमणूक केली त्यांनीही गरीब गरजू

ठेवीदारांना लुबाडले. कुंपणानेच शेत खाल्ले अशी स्थिती झाली आहे.