शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएचआर’चा धुराळा जामनेर टू पुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:26 IST

तळेगाव, ता.जामनेर येथे १९९६ मध्ये स्थापन झालेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था स्थापनेच्या आठ वर्षांनंतर क्रेडिट सोसायटी झाली ...

तळेगाव, ता.जामनेर येथे १९९६ मध्ये स्थापन झालेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी ग्रामीण

बिगरशेती पतसंस्था स्थापनेच्या आठ वर्षांनंतर क्रेडिट सोसायटी झाली व तिसऱ्या टप्प्यात

२००७ मध्ये मल्टिस्टेटचा दर्जा मिळवीत देश पातळीवर पोहोचली. ग्रामीण पतसंस्थांनी

मल्टिस्टेट दर्जा घेण्यामागील गौडबंगाल काय याची चर्चा नेहमीच होते. पतसंस्था मल्टिस्टेट

झाल्याने फायदा सभासदांना होण्यापेक्षा संचालक मंडळाचाच जास्त होतो. सहकार

खात्यातील स्थानिकांकडून चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी कदाचित ही पळवाट असावी,

असे बोलले जाते.

ठेवीदारांच्या पावत्या नाममात्र दरात घेऊन त्या पावत्यांचे सेटलमेंट करून कोटीने

घेतलेले कर्ज फेडणारे व मालमत्ता खरेदी करणारे राजकीय कार्यकर्ते तालुक्यातील आहे.

आरोप-प्रत्यारोपात त्यांचे चेहरे समाजासमोर येत असल्याने यात विविध राजकीय पक्षाशी

संबंधितांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

मल्टिस्टेटचा दर्जा मिळवून घेण्यासाठी जवळच्या राज्यात एखादी नामधारी शाखा

उघडून विस्तार केला जातो. राष्ट्रीयीकृत बँकांकडून सर्वसामान्यांना अर्थसहाय्य मिळण्यात होत

असलेली अडचण लक्षात घेऊन पतसंस्थांची उभारणी ग्रामीण भागात झाली. उद्देश चांगला

असला तरी काही ठिकाणी संचालक मंडळाकडून त्याला स्वार्थामुळे हरताळ फसला गेला.

सभासदांचे भागभांडवल व गरजूंनी विश्वासाने ठेवलेल्या ठेवीवर संचालक मंडळाने डल्ला

मारून हा पैसा आपल्या खासगी गुंतवणुकीत अडकवून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले.

नेमकी हीच पद्धत बीएचआरमध्ये वापरली गेल्याने गैरव्यवहार उघडकीस आले.

आजही अस्तित्वात असलेल्या व काही मल्टिस्टेट दर्जा असलेल्या पतसंस्थांकडून

ठेवीदारांच्या पैशातून आपसात कर्जे वाटून घेतली जात असल्याचे दिसून येते. याच

माध्यमातून संचालक मंडळाने स्वतःच्या मालकीच्या मोठ्या इमारती उभारल्या व संस्थेचा

पैसा यात गुंतविल्याचे दिसून येते.

बीएचआरच्या मालमत्तेचा धुराळा जामनेरपासून पुण्यापर्यंत पोहोचला. ठेवीदारांना

पावत्यांच्या मोबदल्यात नाममात्र रक्कम देऊन त्यांची सावकार, दलाल, राजकीय नेते व

पुढारी यांनी बोळवण केली. संचालकांनी केलेला गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर

ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी शासनाने ज्याची नेमणूक केली त्यांनीही गरीब गरजू

ठेवीदारांना लुबाडले. कुंपणानेच शेत खाल्ले अशी स्थिती झाली आहे.