शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

‘फ्री वॉटर इंडिया मिशन’साठी चित्रपट सहदिग्दर्शकाची भारत भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 6:29 PM

झारखंडचे रहिवासी श्रीराम डल्टन दररोज करताहेत २५ ते ३० किलोमीटर पायी प्रवास

अमळनेर, जि.जळगाव : जल, जंगल, जमिनीवर मानवाचा हक्क आहे, असे सांगत ‘फ्री वॉटर इंडिया मिशन’साठी तब्बल १०० किलोचा दगड सायकलवर लोटत झारखंडचे रहिवासी तथा चित्रपट सृष्टीतील सहदिग्दर्शक श्रीराम डाल्टन आपल्या सहकाऱ्यांसोबत भारतभर पायी प्रवास करून जनजागृती करत आहेत.जल, जंगल, जमीन हा आपला मूलभूत हक्क आह,े हे संविधानापुरते मर्यादित राहिले आहे, पाणी विकत घ्यावे लागत आहे, सर्वांना पाणी मोफत मिळावे यासाठी फ्री वॉटर इंडिया मिशनअंतर्गत चित्रपट सहदिग्दर्शक श्रीराम डाल्टन यांनी १५ मेपासून मुंबई येथून पदयात्रा काढली आहे. एका सायकलवर त्यांनी निसर्गाचे प्रतीक म्हणून १०० किलोचा दगड, एक रोपटे व पाण्याचे भांडे ठेवले असून, ते लोटत भारत भ्रमण करीत आहेत. दर दोन ते तीन कि.मी.वर रस्त्यात लोकांची गर्दी जमली की त्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करतात. त्यांच्यासोबत बिहारचे विभू वत्स, विनीत चौधरी झारखंड, शशिकांत कुमार झारखंड हेदेखील सहकार्य करीत आहेत.मुंबई येथून निघाल्यानंतर विविध गावे करत सुमारे १००० कि.मी.चा प्रवास करत ते ५० व्या दिवशी अमळनेरात पोहचले. म.वा.मंडळाचे डॉ.अविनाश जोशी, रमेश पवार, संदीप घोरपडे, भारती गाला, नरेंद्र निकम, वसुंधरा लांडगे, जगदीश तावडे, भूमिका घोरपडे यांनी त्यांचे स्वागत केले.नाशिक येथील नीलेश धीरे यांनी खास शिल्पकला करून १०० किलोच्या दगडावर जल, जंगल व पाण्याचे प्रतीक कोरण्यात आले आहे, तर रमेश अय्यर यांनी रोपटे आणि पाण्याचे भांडे दिले आहे. कडक उन्हाळ्यातही ते रोपटे जिवंत ठेवून अखेर त्यांना झारखंडपर्यंत न्यायचे आहे.दररोज २५ ते ३० कि.मी.प्रवास करतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश परत महाराष्ट्र, तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड असा त्यांचा प्रवास राहणार आहे.