शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

संतांचे भारुड म्हणजे प्रबोधनात्मक लोकसाहित्य - भारुडकार चंदाताई तिवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:51 IST

संतांचे विचार जनमानसापर्यंत पोहचविणार

चुडामण बोरसेजळगाव : भारुड म्हणजे संतांची कूट रुपके होय. पूर्वी ती गूढ होती. संत एकनाथ महाराजांनी सामाजिकतेवर भाष्य केले. संतांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम या भारुडाने केले आहे. भारुड म्हणजे प्रबोधनात्मक लोकसाहित्य होय, असे प्रतिपादन प्रख्यात भारुडकार चंदाताई तिवाडी यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी जळगावात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांच्याशी झालेला हा संवाद.प्रश्न : भारुड म्हणजे नेमके काय?उत्तर : संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ महाराज यांच्या गाथेत या रचना सापडतात. पूर्वी भारुडे ही गूढ होती. नाट्य, अभिनय, नृत्य आणि गायन अशा विविधतेने नटलेल्या लोककलेचा समावेश या भारुडात आहे. या सर्व कलांना एकत्रित आणून बहुरुढीचे दर्शन घडविणारे भारुड हे जणू एकपात्री प्रयोगासारखेच आहे.प्रश्न : भारुडाचे प्रकार किती... ?उत्तर : भारुडाचे तीन प्रकार आहेत. पहिले भजनी, दुसरे सोंगी आणि तिसरे बोली भारुड होय. भजनी म्हणजे भजनात सांगितले जाते ते भारुड, सोंगी म्हणजे अनेक वाद्ये आणि त्याला अनुसरुन केलेले सोंग होय. तिसरे बोली भारुड हे कीर्तन आणि प्रवचनातून म्हटले जाते.प्रश्न : पूर्वी भारुड हे पात्र पुरुषच सादर करीत.. मग महिला कशा याकडे वळल्या.उत्तर : तमाशाचेही स्वरुप बदलले. तसे भारुडाचेही काही ठिकाणी विडंबन होत गेले. पंढरपूरात आम्ही महिला व बालिकांसाठी प्रबोधनात्मक शिबिर घ्यायचो. यातून मग महिलांच्या सामाजिक उणीवांची जाणीव होऊन भारुडाकडे वळले आणि इथपर्यंत पोहचले आहे.संतांच्या पारंपरिक रचना साभिनय सादर करीत त्या एड्स, पल्स पोलीओ, गुटखा, कुटुंब नियोजन, दारूबंदी, स्त्रीभृणहत्या, प्राणीप्रश्न, महिला सबलीकरण राष्ट्रीय एकात्मता या विषयी आत्मीयतेने दृष्टांत देतात.चंदाताई तिवाडी ह्या भारूडातून समाजप्रबोधन करत असताना समाज कार्यातही व्यस्त आहेत. त्यांनी पंढरपूरनजीक गोपाळपूर येथे खडकाळ माळरानावर तळागाळातील दीडशे गरजूंना वीज-पाणी आदी सोयींसकट घरे बांधून दिली. या वस्तीतील मुलंच्या शिक्षणासाठी गोपालपूर येथे श्रीगोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय सुरू केले.पांडुरंगच आपल्याकडून ते करुन घेत असल्याचे त्या म्हणाल्या.प्रभावी वत्कृत्व, अभिनय शैली, नृत्याची जोड याद्वारे उपदेशाचे चिमटे काढत तर कधी विनादी शैलीतून भारुड सादर होत असते. - चंदाताई तिवाडी

टॅग्स :Jalgaonजळगाव