शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

भाजपकडून जळगावकरांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:38 IST

मिलिंद कुलकर्णी वर्षभरात विकास न करताही भाजपच्या आमदाराला पसंती, दोन वर्षे उलटूनही महापालिकेकडून आश्वासनांची पूर्तता नाही, कणखर, दमदार नेतृत्व ...

मिलिंद कुलकर्णीवर्षभरात विकास न करताही भाजपच्या आमदाराला पसंती, दोन वर्षे उलटूनही महापालिकेकडून आश्वासनांची पूर्तता नाही, कणखर, दमदार नेतृत्व नसल्याने जळगावची स्थिती भकास जळगाव पालिकेतील सुरेशदादा जैन यांची ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने संपूर्ण बहुमत मिळवत दोन वर्षांपूर्वी सतरा मजली इमारतीवर झेंडा फडकवला. हे मोठे यश मानले जाते. १७ वर्षांपूर्वी भाजपच्याच एकनाथराव खडसे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत डॉ.के.डी.पाटील यांना निवडून आणले होते. तोदेखील एक इतिहास आहे. पण नगराध्यक्ष भाजपचा आणि सभागृहात बहुमत सुरेशदादा जैन यांचे असे त्रांगडे त्यावेळी होते. म्हणून २०१८ मधील विजय हे संपूर्ण यश होते. संकटमोचक म्हणून नवीन ओळख लाभलेल्या गिरीश महाजन यांचा करिष्मा जळगावात चालला. सुरेशदादा जैन यांच्या आघाडीतील महापौर ललित कोल्हे, सदाशिराव ढेकळे यांच्यासारखे दिग्गज नगरसेवक भाजपने ओढून घेतले. केंद्र व राज्यातील सत्तेचा लाभ मिळवायचा असेल तर जळगाव विधानसभा मतदारसंघ नको, तर महापालिका पण द्या, असे आवाहन महाजन यांनी केले . एक वर्षात विकास करुन दाखवेल, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मते मागायला येणार नाही, या महाजन यांच्या प्रतिज्ञेवर जळगावकरांनी विश्वास ठेवला. आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर झाल्या. आमदार आणि महापौर एकाच कुटुंबातील असल्याने जळगावचा विकास वर्षभरात होईल, असे जळगावकरांना निश्चितच वाटले. मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यापूर्वी दिलेल्या २५ कोटींचा निधी पडून होता. वर्ष भरात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु झाले, समांतर रस्त्याविषयी मार्ग निघेल, असे चित्र निर्माण झाले, महापालिकेवरील कर्जाचा प्रश्न सोडविण्यात आला. चांगली सुरुवात आहे. महाजन म्हणाले, तरी वर्षभरात विकास होणे शक्य नाही, हे जळगावकरांनी ताडले आणि सुरेश भोळे यांना पुन्हा निवडून दिले. पण आक्रीत घडले. केंद्रात सत्ता, जळगावात सत्ता, पण राज्यातील सत्ता गेली. आता विकास कामे का झाली नाही, हे सांगायला भाजपला कारण मिळाले. राज्यात आमची सत्ता नाही. जसे गेल्यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आमचा होता, पण बहुमत नव्हते, म्हणून १६ महिन्यात काही झाले नाही, असा युक्तीवाद भाजपचे नेते अजूनही करतात. परंतु, केंद्र सरकारशी निगडीत अनेक कामेसुध्दा भाजपचे खासदार, आमदार व महापौर आणि पदाधिकारी या वर्षभरात करु शकलेले नाही, हे सत्य आहे. भोईटेनगर, असोदा रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाविषयी काहीही हालचाल नाही. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांसाठी १८ हजार घरकुले बांधण्याच्या आश्वासनाचा तर विसर पडलेला आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. महापालिकेने स्वत:च्या अधिकारात करण्याची कामे सुध्दा या दोन वर्षांत झालेली नाही. गाळेप्रश्न रखडलेला आहे. गाळ्यांची मुदत वाढवून करार करु, कायदा करु, असे निवडणुकीतील आश्वासन कधीच हवेत विरले. शहर बससेवा, महापालिकेच्या अत्याधुनिक शाळा, घनकचरा प्रकल्प ही कामे सुध्दा झालेली नाही. व्हीजन, प्लान, अ‍ॅक्शन, इम्प्लीमेंट, पॉवर ही पंचसुत्री वापरुन जळगावचा विकास करण्याचे आश्वासन देणाºया भाजपने दोन वर्षात काय केले हे जळगावकर अनुभवत आहे. रस्त्यातील खड्डे, पहाटे ४ वाजता येणारे पाणी, कचºयाचे ढिग अशा समस्यांची उजळणी करण्याची गरज नाही. महाजन हे निवडणूक जिंकून देऊ शकतात, पण विकास करु शकत नाही, हे मात्र जळगावकरांना कळून चुकले आहे. त्यामुळे कणखर, विकासाभिमुख व दमदार नेतृत्वाच्या प्रतिक्षेत जळगाव आता आहे. दिल्ली, मुंबईत सत्ता आहे, मात्र जळगाव महापालिकेत सत्ता नसल्याने ४३१ कोटी रुपयांचा निधी देऊनही शहराचा विकास होऊ शकला नाही; सत्ता द्या, एक वर्षात विकास करुन दाखवू. अन्यथा विधानसभेत मते मागायला येणार नाही.गिरीश महाजन यांचे दोन वर्षांपूर्वीचे हे वक्तव्य. संपूर्ण बहुमतासह भाजपला सत्ता देऊनदेखील गाळेप्रश्न, बससेवा, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, घनकचरा प्रकल्प, अमृत पाणीयोजना, रस्तेविकास, एमआयडीसीचा विस्तार हे प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. वर्षभरात विकास न होताही जळगावकरांनी भाजपच्या आमदाराला पुन्हा निवडून दिले. पण भाजपने विश्वासघाताशिवाय काय केले?
टॅग्स :Jalgaonजळगाव