शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भाजपकडून जळगावकरांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:38 IST

मिलिंद कुलकर्णी वर्षभरात विकास न करताही भाजपच्या आमदाराला पसंती, दोन वर्षे उलटूनही महापालिकेकडून आश्वासनांची पूर्तता नाही, कणखर, दमदार नेतृत्व ...

मिलिंद कुलकर्णीवर्षभरात विकास न करताही भाजपच्या आमदाराला पसंती, दोन वर्षे उलटूनही महापालिकेकडून आश्वासनांची पूर्तता नाही, कणखर, दमदार नेतृत्व नसल्याने जळगावची स्थिती भकास जळगाव पालिकेतील सुरेशदादा जैन यांची ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने संपूर्ण बहुमत मिळवत दोन वर्षांपूर्वी सतरा मजली इमारतीवर झेंडा फडकवला. हे मोठे यश मानले जाते. १७ वर्षांपूर्वी भाजपच्याच एकनाथराव खडसे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत डॉ.के.डी.पाटील यांना निवडून आणले होते. तोदेखील एक इतिहास आहे. पण नगराध्यक्ष भाजपचा आणि सभागृहात बहुमत सुरेशदादा जैन यांचे असे त्रांगडे त्यावेळी होते. म्हणून २०१८ मधील विजय हे संपूर्ण यश होते. संकटमोचक म्हणून नवीन ओळख लाभलेल्या गिरीश महाजन यांचा करिष्मा जळगावात चालला. सुरेशदादा जैन यांच्या आघाडीतील महापौर ललित कोल्हे, सदाशिराव ढेकळे यांच्यासारखे दिग्गज नगरसेवक भाजपने ओढून घेतले. केंद्र व राज्यातील सत्तेचा लाभ मिळवायचा असेल तर जळगाव विधानसभा मतदारसंघ नको, तर महापालिका पण द्या, असे आवाहन महाजन यांनी केले . एक वर्षात विकास करुन दाखवेल, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मते मागायला येणार नाही, या महाजन यांच्या प्रतिज्ञेवर जळगावकरांनी विश्वास ठेवला. आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर झाल्या. आमदार आणि महापौर एकाच कुटुंबातील असल्याने जळगावचा विकास वर्षभरात होईल, असे जळगावकरांना निश्चितच वाटले. मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यापूर्वी दिलेल्या २५ कोटींचा निधी पडून होता. वर्ष भरात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु झाले, समांतर रस्त्याविषयी मार्ग निघेल, असे चित्र निर्माण झाले, महापालिकेवरील कर्जाचा प्रश्न सोडविण्यात आला. चांगली सुरुवात आहे. महाजन म्हणाले, तरी वर्षभरात विकास होणे शक्य नाही, हे जळगावकरांनी ताडले आणि सुरेश भोळे यांना पुन्हा निवडून दिले. पण आक्रीत घडले. केंद्रात सत्ता, जळगावात सत्ता, पण राज्यातील सत्ता गेली. आता विकास कामे का झाली नाही, हे सांगायला भाजपला कारण मिळाले. राज्यात आमची सत्ता नाही. जसे गेल्यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आमचा होता, पण बहुमत नव्हते, म्हणून १६ महिन्यात काही झाले नाही, असा युक्तीवाद भाजपचे नेते अजूनही करतात. परंतु, केंद्र सरकारशी निगडीत अनेक कामेसुध्दा भाजपचे खासदार, आमदार व महापौर आणि पदाधिकारी या वर्षभरात करु शकलेले नाही, हे सत्य आहे. भोईटेनगर, असोदा रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाविषयी काहीही हालचाल नाही. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांसाठी १८ हजार घरकुले बांधण्याच्या आश्वासनाचा तर विसर पडलेला आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. महापालिकेने स्वत:च्या अधिकारात करण्याची कामे सुध्दा या दोन वर्षांत झालेली नाही. गाळेप्रश्न रखडलेला आहे. गाळ्यांची मुदत वाढवून करार करु, कायदा करु, असे निवडणुकीतील आश्वासन कधीच हवेत विरले. शहर बससेवा, महापालिकेच्या अत्याधुनिक शाळा, घनकचरा प्रकल्प ही कामे सुध्दा झालेली नाही. व्हीजन, प्लान, अ‍ॅक्शन, इम्प्लीमेंट, पॉवर ही पंचसुत्री वापरुन जळगावचा विकास करण्याचे आश्वासन देणाºया भाजपने दोन वर्षात काय केले हे जळगावकर अनुभवत आहे. रस्त्यातील खड्डे, पहाटे ४ वाजता येणारे पाणी, कचºयाचे ढिग अशा समस्यांची उजळणी करण्याची गरज नाही. महाजन हे निवडणूक जिंकून देऊ शकतात, पण विकास करु शकत नाही, हे मात्र जळगावकरांना कळून चुकले आहे. त्यामुळे कणखर, विकासाभिमुख व दमदार नेतृत्वाच्या प्रतिक्षेत जळगाव आता आहे. दिल्ली, मुंबईत सत्ता आहे, मात्र जळगाव महापालिकेत सत्ता नसल्याने ४३१ कोटी रुपयांचा निधी देऊनही शहराचा विकास होऊ शकला नाही; सत्ता द्या, एक वर्षात विकास करुन दाखवू. अन्यथा विधानसभेत मते मागायला येणार नाही.गिरीश महाजन यांचे दोन वर्षांपूर्वीचे हे वक्तव्य. संपूर्ण बहुमतासह भाजपला सत्ता देऊनदेखील गाळेप्रश्न, बससेवा, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, घनकचरा प्रकल्प, अमृत पाणीयोजना, रस्तेविकास, एमआयडीसीचा विस्तार हे प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. वर्षभरात विकास न होताही जळगावकरांनी भाजपच्या आमदाराला पुन्हा निवडून दिले. पण भाजपने विश्वासघाताशिवाय काय केले?
टॅग्स :Jalgaonजळगाव