शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

आत्मनिर्भर योजनेचा १० हजार लोकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:14 IST

जामनेर तालुका: रेशन कार्ड नसलेल्यांना तांदुळ वाटप

जामनेर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विस्थापित मजूर व रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाला शासनाच्या वतीने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ व प्रती कुटंब एक किलो हरभऱ्याचे वाटप सुरू केले आहे. याचा तालुक्यातील १० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे हातावर पोट असणाऱ्यांचे अधिक हाल होत आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. त्यात अनेकांचे रेशनकार्ड नसल्याने अन्नधान्यासाठीही त्यांची फरफट होत आहे. काही सामाजिक संस्थाकडून मदतीचा हात देण्यात आला, मात्र आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबियांच्या समस्या कायम आहेत. त्यात परजिल्ह्यातील व परराज्यातील विस्थापित मजुरांची संख्याही मोठी आहे. ही बाब पाहता शासनाच्या वतीने यापूर्वी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय कुटुंब लाभार्थी प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या वतीने आता आत्मनिर्भर भारत वित्तीय साहय्य पॅकेज अंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या गरजूंना प्रती किलो पाच किलो तांदूळ व प्रति कुटुंब एक किलो हरभरा वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन, जुलै, या दोन महिन्यांसाठी हे धान्य पुरवठा करण्यात येत आहे.या योजनेतील लाभार्थ्यांची महसूल प्रशासनाने निवड केली असून तालुक्यातील रेशनकार्ड नसलेले व विस्थापित मजूर असे जवळपास १० हजार नागरिकांना याचा लाभ दिला जात आहे. या योजनेचा फक्त तांदूळ महसूल प्रशासनाकडे उपलब्ध झालेला आहे. शहरातील दोन स्वस्त धान्य केंद्र व तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालयमार्फत हे वाटप सुरू करण्यात आलेले आहे. तांदूळ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी स्वस्तधान्य दुकानांना भेटी देत आहेत. धान्याच्या वितरणाचा आढावाही घेतला जात असून धान्याबाबत काही तक्रारी असतील तर संपर्क साधावा असे आवाहनही महसूल विभागाने केले आहे.आधारमुळे मिळणार खºया लाभार्थ्यांना धान्य...धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकानुसार थम घेतले जाणार आहे थम प्रक्रियेत ज्यांचा आधार क्रमांक रेशन कार्डशी संलग्न केलेला नाही किंवा ज्यांना यापूर्वी लाभ मिळालेला आहे अशा लाभार्थींची माहिती मिळणार आहे, आधार लिंकिंगमुळे खºया गरजू लाभार्थ्यांना या धान्याचे वाटप होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना वाटप करण्यासाठी अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला आहे आत्मनिर्भर योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. आत्मनिर्भर योजनेतील लाभार्थ्यांनी आपापल्या हद्दीतील दुकानांमधून तांदूळ घ्यावा.-अरुण शेवाळे, तहसीलदार जामनेर