शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भर योजनेचा १० हजार लोकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:14 IST

जामनेर तालुका: रेशन कार्ड नसलेल्यांना तांदुळ वाटप

जामनेर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विस्थापित मजूर व रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाला शासनाच्या वतीने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ व प्रती कुटंब एक किलो हरभऱ्याचे वाटप सुरू केले आहे. याचा तालुक्यातील १० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे हातावर पोट असणाऱ्यांचे अधिक हाल होत आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. त्यात अनेकांचे रेशनकार्ड नसल्याने अन्नधान्यासाठीही त्यांची फरफट होत आहे. काही सामाजिक संस्थाकडून मदतीचा हात देण्यात आला, मात्र आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबियांच्या समस्या कायम आहेत. त्यात परजिल्ह्यातील व परराज्यातील विस्थापित मजुरांची संख्याही मोठी आहे. ही बाब पाहता शासनाच्या वतीने यापूर्वी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय कुटुंब लाभार्थी प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या वतीने आता आत्मनिर्भर भारत वित्तीय साहय्य पॅकेज अंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या गरजूंना प्रती किलो पाच किलो तांदूळ व प्रति कुटुंब एक किलो हरभरा वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन, जुलै, या दोन महिन्यांसाठी हे धान्य पुरवठा करण्यात येत आहे.या योजनेतील लाभार्थ्यांची महसूल प्रशासनाने निवड केली असून तालुक्यातील रेशनकार्ड नसलेले व विस्थापित मजूर असे जवळपास १० हजार नागरिकांना याचा लाभ दिला जात आहे. या योजनेचा फक्त तांदूळ महसूल प्रशासनाकडे उपलब्ध झालेला आहे. शहरातील दोन स्वस्त धान्य केंद्र व तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालयमार्फत हे वाटप सुरू करण्यात आलेले आहे. तांदूळ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी स्वस्तधान्य दुकानांना भेटी देत आहेत. धान्याच्या वितरणाचा आढावाही घेतला जात असून धान्याबाबत काही तक्रारी असतील तर संपर्क साधावा असे आवाहनही महसूल विभागाने केले आहे.आधारमुळे मिळणार खºया लाभार्थ्यांना धान्य...धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकानुसार थम घेतले जाणार आहे थम प्रक्रियेत ज्यांचा आधार क्रमांक रेशन कार्डशी संलग्न केलेला नाही किंवा ज्यांना यापूर्वी लाभ मिळालेला आहे अशा लाभार्थींची माहिती मिळणार आहे, आधार लिंकिंगमुळे खºया गरजू लाभार्थ्यांना या धान्याचे वाटप होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना वाटप करण्यासाठी अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला आहे आत्मनिर्भर योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. आत्मनिर्भर योजनेतील लाभार्थ्यांनी आपापल्या हद्दीतील दुकानांमधून तांदूळ घ्यावा.-अरुण शेवाळे, तहसीलदार जामनेर