शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त गावातील शाळांची घंटा खणखणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST

जळगाव : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. मागील वर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष ...

जळगाव : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. मागील वर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण आता कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, अनेक ठिकाणी लाट निवळत असल्याने कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तसे परिपत्रक सरकारने सोमवारी जाहीर केले आहे.

राज्यातील कोरोनामुक्त गावांमधील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने सशर्त मान्यता दिली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी तेथील ग्रामपंचायत वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसा ठराव मंजूर करावयाचा आहे. हा ठराव पालकांशी चर्चा करून नंतरच करायचा आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे, असे शासनाच्या पत्रकात म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात १ हजार १७९ गावे ही कोरोनामुक्त आहेत. दरम्यान, आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शाळांना हे नियम असतील बंधनकारक

- एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी असावेत.

- विद्यार्थ्यांनी सतत हात धुवावेत, मास्कचा वापर करावा. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवावे आणि त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, आदी बाबींचे शाळांनी काटेकोर पालन करायचे आहे.

- शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने मुलांना शाळेत बोलावण्यात यावे. विविध सत्रांत वर्ग भरवावेत.

- शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषक काळजी घ्यावी.

- पालकांनी आजारी किंवा लक्षण असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये.

- संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.

- विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

- शाळेचा परिसर दररोज नियमित स्वच्छ केला जावा.

- वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारे जिने, स्वच्छतागृहे आदी भाग यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम

शाळा बंद आणि मुले घरी राहण्याने मुलांवर विविध प्रकारचे दुष्परिणाम होत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने या परिपत्रकात नमूद केले आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होत आहेत. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचे सोशलायझेशन होत नसल्याने त्यांच्या सामाजिक कौशल्यांचे नुकसान होत आहे. इंटरनेट, मोबाइलचा गैरवापर, गेम्सचे व्यसन, मानसिक तणाव, बालविवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉप आऊट अशा विविध प्रकारे मुलांचे नुकसान होत असल्याने त्यांना नियमित शिक्षण मिळावे म्हणून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असे या पत्रकात म्हटले आहे.

शिक्षकांना करावी लागणार चाचणी

संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तसेच शाळेच्या दर्शनी भागावर फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर आदी संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रदर्शित करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

शाळेच्या कार्यक्रमांवर निर्बंध

परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम, ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनांवर कडक निर्बंध असणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी पालकांनीदेखील शक्यतो स्वत:च्या वैयक्तिक वाहनाने पाल्यास शाळेत सोडण्याचेही पत्रात म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यात १ हजार १७९ गावे कोरोनामुक्त

जळगाव जिल्ह्यातील १ हजार १७९ गावे ही कोरोनामुक्त झाली आहेत. ७० गावांमध्ये तर एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ तसेच शाळा सुरू व्हाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडूनसुद्धा होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांनीदेखील विशेष काळजी घ्यावी, असेही पालकांचे म्हणणे आहे.