शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कोरोनामुक्त गावातील शाळांची घंटा खणखणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST

जळगाव : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. मागील वर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष ...

जळगाव : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. मागील वर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण आता कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, अनेक ठिकाणी लाट निवळत असल्याने कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तसे परिपत्रक सरकारने सोमवारी जाहीर केले आहे.

राज्यातील कोरोनामुक्त गावांमधील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने सशर्त मान्यता दिली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी तेथील ग्रामपंचायत वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसा ठराव मंजूर करावयाचा आहे. हा ठराव पालकांशी चर्चा करून नंतरच करायचा आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे, असे शासनाच्या पत्रकात म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात १ हजार १७९ गावे ही कोरोनामुक्त आहेत. दरम्यान, आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शाळांना हे नियम असतील बंधनकारक

- एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी असावेत.

- विद्यार्थ्यांनी सतत हात धुवावेत, मास्कचा वापर करावा. कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवावे आणि त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, आदी बाबींचे शाळांनी काटेकोर पालन करायचे आहे.

- शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने मुलांना शाळेत बोलावण्यात यावे. विविध सत्रांत वर्ग भरवावेत.

- शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषक काळजी घ्यावी.

- पालकांनी आजारी किंवा लक्षण असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये.

- संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.

- विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

- शाळेचा परिसर दररोज नियमित स्वच्छ केला जावा.

- वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारे जिने, स्वच्छतागृहे आदी भाग यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम

शाळा बंद आणि मुले घरी राहण्याने मुलांवर विविध प्रकारचे दुष्परिणाम होत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने या परिपत्रकात नमूद केले आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होत आहेत. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचे सोशलायझेशन होत नसल्याने त्यांच्या सामाजिक कौशल्यांचे नुकसान होत आहे. इंटरनेट, मोबाइलचा गैरवापर, गेम्सचे व्यसन, मानसिक तणाव, बालविवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉप आऊट अशा विविध प्रकारे मुलांचे नुकसान होत असल्याने त्यांना नियमित शिक्षण मिळावे म्हणून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असे या पत्रकात म्हटले आहे.

शिक्षकांना करावी लागणार चाचणी

संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तसेच शाळेच्या दर्शनी भागावर फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर आदी संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रदर्शित करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

शाळेच्या कार्यक्रमांवर निर्बंध

परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम, ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनांवर कडक निर्बंध असणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी पालकांनीदेखील शक्यतो स्वत:च्या वैयक्तिक वाहनाने पाल्यास शाळेत सोडण्याचेही पत्रात म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यात १ हजार १७९ गावे कोरोनामुक्त

जळगाव जिल्ह्यातील १ हजार १७९ गावे ही कोरोनामुक्त झाली आहेत. ७० गावांमध्ये तर एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ तसेच शाळा सुरू व्हाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडूनसुद्धा होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांनीदेखील विशेष काळजी घ्यावी, असेही पालकांचे म्हणणे आहे.