शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

'रिफाइंड' असो की लाकडी घाणा...तेल कमीच आणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रिफाइंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रिफाइंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत आहे. मात्र, अशा जाहिरातींना भुलून तेलाची निवड करण्यापेक्षा आपली जनुके, वास्तव्याचे ठिकाण, परंपरा लक्षात घेऊन तेलाची निवड करणे आवश्यक असते. तेल घाण्याचे असो की रिफाइंड ते कमीच वापरावे, याकडे हृदयरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

आहारात तेलाचा जास्त वापर केल्याने रक्तदाब, स्थूलता, हृदयरोग आदी विकारांना आमंत्रण मिळते. अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी रिफाइंड तेलावर मोठी रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाशी संबंधित विकारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढली आहे. शहरात लाकडी घाण्याची दुकाने पाहायला मिळत आहेत. घाण्यावर काढलेल्या तेलात गुड कोलेस्टेरॉल अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, जाहिराती आणि ट्रेंडला न भुलता योग्य तेलाची निवड करणे आवश्यक ठरते.

०००००००००००

रिफाइंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे त्याचा अधिक वापर हा शरीरासाठी घातक आहे. घाण्याच्या तेलात कुठलीही रासायनिक प्रक्रिया होत नाही. मात्र, ते कमी दिवस टिकणारे असते़ त्यामुळे नागरिक रिफाइंड तेलाकडे वळले. परंतु, तेल हे कुठलेही असो त्याचे प्रमाण कमी असणेचं गरजेचे आहे. ज्यांना हृदयाचे आजार आहे तसेच कॉलेस्टेरॉल वाढलेले आहे, अशांनी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. शरिरातील प्रोटीन मिळणे गरजचे आहे. त्यासाठी पालेभाज्यांचा वापर आहारात करणे आवश्यक आहे. तेलाच्या अतिवापरामुळे शरिरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात.

- डॉ. विवेक चौधरी, हृदयरोगतज्ज्ञ

००००००००००

शरीरिला प्रोटीन मिळणे गरजेचे आहे़ नियमित व्यक्तीला १.१ किंवा १.२ ग्रॅम तर खेळाडूंना १.५ ते २ ग्रॅम पर्यंत प्रोटीन मिळायला हवे. त्यातच शरीराच्या वजनानुसार ०.५ ते ०.७ ग्रॅम तेल शरीराला आवश्यक असते. दुसरीकडे पाणी अधिक पिणे हे शरीरिरासाठी सर्वाधिक चांगले असते. कुठलेही तेल घेतले त्यात कॅलरी सारखीच असते़ त्यामुळे संतुलित आहार असणे आवश्यक आहे. प्रोटीनसाठी पनीर, सोयाबिन, अंडी, राजमा, मुग, मटकी, चना आदींचा आहारात वापर करू शकता. तसेच दिवसभरात दोनशे ग्रॅम पालेभाज्या खायला हवे.

- डॉ. सुयोग चोपडे, आहारतज्ज्ञ

००००००००००

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

वाढत्या विविध आजारांच्या दृष्टीने आता नागरिकांकडून सुध्दा आहाराबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. रिफाइंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केली जात असल्यामुळे आता नागरिकांनी लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे आता शहरांमध्ये लाकडी घाण्याचे तेलाचे दुकाने पहायला मिळत आहे.