शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

करंज येथील शेतकऱ्याची केळी इराणला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे केळीला बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे केळीला बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच, दुसरीकडे या खडतर परिस्थितीवर मात करून जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप शांताराम पाटील या शेतकऱ्याने केळीचे पीक घेऊन थेट अरब देशांमधील इराणला आपली केळी रवाना केली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना विदेशामध्ये निर्यातीद्वारे नवा मार्ग सापडला आहे.

जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप शांताराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतातील केळी शुक्रवारी इराण येथे रवाना झाली. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी त्रस्त झाला असताना आता काही प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी निर्यातीचा पर्याय उपलब्ध झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी करंज येथे जाऊन प्रदीप पाटील यांचे कौतुक केले. त्यांचा आदर्श घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम केळीची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. गजानन ॲग्रो, पोलन ॲग्रो मिनरल व धर्ती कृषी संवर्धन यांच्या केळी विदेशात पाठविण्यात येणार आहेत. याप्रसंगी सौरभ चौगुले, योगेश जिंदमवर, संग्राम कुरणे, तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी रामदास पाटील, हिलाल पाटील, अनिल सपकाळे, ज्ञानेश्वर पाटील, संजय सपकाळे, सुनील सपकाळे, शरद पाटील, सुरेश सपकाळे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात जळगावच्या केळीला मागणी

जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून, काही वर्षांपर्यंत जिल्ह्यातील केळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात व उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये निर्यात केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये जळगावच्या केळीला नवी ओळख मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्येदेखील मोठी मागणी वाढली आहे. विशेष करून अरब देशांमध्ये केळीची मागणी वाढली आहे. सौदी अरब, इराण, अफगाणिस्तान, कुवेत, कतार या देशांमध्ये केळीला मोठी मागणी आहे. दरम्यान, भारतातील ईशान्येकडील राज्य जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येदेखील जिल्ह्यातील केळी मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. देशांतर्गत बाजार व आंतरराष्ट्रीय बाजारात केळीला मागणी असतानादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोर्ड भावानुसार भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.