शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

करंज येथील शेतकऱ्याची केळी इराणला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे केळीला बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे केळीला बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच, दुसरीकडे या खडतर परिस्थितीवर मात करून जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप शांताराम पाटील या शेतकऱ्याने केळीचे पीक घेऊन थेट अरब देशांमधील इराणला आपली केळी रवाना केली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना विदेशामध्ये निर्यातीद्वारे नवा मार्ग सापडला आहे.

जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप शांताराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतातील केळी शुक्रवारी इराण येथे रवाना झाली. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी त्रस्त झाला असताना आता काही प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी निर्यातीचा पर्याय उपलब्ध झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी करंज येथे जाऊन प्रदीप पाटील यांचे कौतुक केले. त्यांचा आदर्श घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम केळीची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. गजानन ॲग्रो, पोलन ॲग्रो मिनरल व धर्ती कृषी संवर्धन यांच्या केळी विदेशात पाठविण्यात येणार आहेत. याप्रसंगी सौरभ चौगुले, योगेश जिंदमवर, संग्राम कुरणे, तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी रामदास पाटील, हिलाल पाटील, अनिल सपकाळे, ज्ञानेश्वर पाटील, संजय सपकाळे, सुनील सपकाळे, शरद पाटील, सुरेश सपकाळे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात जळगावच्या केळीला मागणी

जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून, काही वर्षांपर्यंत जिल्ह्यातील केळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात व उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये निर्यात केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये जळगावच्या केळीला नवी ओळख मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्येदेखील मोठी मागणी वाढली आहे. विशेष करून अरब देशांमध्ये केळीची मागणी वाढली आहे. सौदी अरब, इराण, अफगाणिस्तान, कुवेत, कतार या देशांमध्ये केळीला मोठी मागणी आहे. दरम्यान, भारतातील ईशान्येकडील राज्य जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येदेखील जिल्ह्यातील केळी मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. देशांतर्गत बाजार व आंतरराष्ट्रीय बाजारात केळीला मागणी असतानादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोर्ड भावानुसार भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.