शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

पाण्याच्या नियोजनावरच ठरते केळी लागवडीचे तंत्र

By admin | Updated: April 7, 2017 17:11 IST

केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ रावेर तालुक्याने व्यापले आहे. मात्र किरकोळ ठिकाणी नवीन लागवड करण्याचा

ऑनलाइन लोकमतकेऱ्हाळे,ता.रावेर, दि. 07 -  केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ रावेर तालुक्याने व्यापले आहे. मात्र किरकोळ ठिकाणी नवीन लागवड करण्याचा अपवाद वगळता क्षेत्रफळाच्या तुलनेत लागवड शून्य आहे. भूगर्भातील पाण्याचा स्त्रोतावर आधारीत कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीच्या नियोजनावर नवीन लागवड करण्याचे तंत्र अवलंबून आहे.जिल्ह्यातील केळी लागवडीचे एकूण क्षेत्रफळ सन २०१५-२०१६ मध्ये ४८ हजार २८० हेक्टर एवढे होते. २०१६-२०१७ मध्ये त्यात वाढ होऊन ते सुमारे ५१ हजार हेक्टर क्षेत्रफळ इतके झाले आहे. यात सर्वाधिक क्षेत्रफळ व्यापणारा रावेर तालुक्याची व्याप्ती १९ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रफळ सर्वसाधारण केळीने व्यापले आहे. एवढ्या क्षेत्रफळातील केळी आता पुढे कापणीस सज्ज झाली असून पाणीपुरवठा व उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची रंगीत तालीम सुरू झाली आहे.एप्रिल महिन्यात नवीन केळी लागवड करण्यास फारसा शेतकरी धजावत नाही. कारण पावसाळा व हिवाळा या ऋतुमध्ये नवीन केळी व जुनारीमधील रब्बीचे आंतर पीक मका, गहू व हळद,तूर या पिकांचे पाणी भरण्याचे नियोजन करून पाणी देणे शक्य होते. हिवाळ्यातील चार महिन्यांमध्ये केळी बागेला सतत पाण्याची गरज नसते. यामुळे इतर पिकांना पाणी देवून उत्पादन घेणे शक्य होते. मार्च पर्यंत रब्बीतील सर्व हंगाम आटोपून एप्रिल, मे व जून या महिन्यांमध्ये केळी पिकांना सतत पाणी द्यावे लागते. यामुळे नवीन लागवड करण्याकडे लक्ष दिले जात नाही. कारण महिना दीड महिन्यात केळी कापणीतून हातात येणारा पैसा सोडून भविष्यात येणारी केळी खोडी लांब ठेवूनच लागवड केली जाते. याला दुसरे कारण म्हणजे तप्त उन्हाच्या कडक लाटांमध्ये नवीन केळी लागवडची खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा लवकर लागवड करून सुद्धा निम्मे केळी कुजून फेकून द्यावी लागते. जमिनीचे क्षेत्रफळ आज रोजीही अनेक शेतकऱ्यांचे तयार आहे. परंतु पाण्याचे नियोजना अभावी लागवड उशिरा केली जात आहे. रामनवमीला केली जाते लागवड रावेर व यावल तालुक्यात काही भागात रामनवमीनंतर केळी लागवडीचा मुहूर्त काही शेतकरी साधतात याला शेतकरी भाषेत (रामबाग) म्हणून ओळखले जाते. यात बहुतांश तांदलवाडी, वाघोदा, न्हावी या भागात काही प्रमाणात लागवड केली जाते. देशी बियाणे झाले हद्दपार...केळी लागवडीत सध्या टिश्युकल्चर ग्रॅडनेन या जातीने शेतकऱ्यांना भुरळ घातली आहे. टिश्युच्या प्रथम कापणीनंतर निघणाऱ्या कंद लागवडवर आजही सामान्यत ७० टक्के शेतकरी अवलंबून आहे. या विदेशी जातीने अक्षरश: कहर माजवला आहे. यापूर्वीचे देशी वाण श्रीमंती, अर्धापुरी, वसई, सातमासी श्रीमंती या देशी वाणांची उत्पादक क्षमता कमी असल्याची केवळ ओरड केली जाते. मात्र दर्जा, गोडवी व कोणत्या तरी वातावरणात उन्हामध्ये कमी-अधिक पाण्याचा ताण सहन करणाऱ्या देशी वाणांच्या जाती विकसीत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न दिसून आले नाहीत. यामुळे अत्यंत तकलादू व विविध रोगांना बळी पडणाऱ्या टिश्युकल्चर ग्रॅडनेन या विदेशी जातीला प्राधान्य दिले जात आहे.- केळी लागवडीसाठी रामनवमीचा मुहूर्त. - दर्जा,गोडवी व कमी-अधिक पाण्याचा ताण सहन करणाऱ्या देशी वाणांच्या जाती विकसीत करण्याची गरज.- टिश्युकल्चर ग्रॅडनेन जातीची शेतकऱ्यांना पडली भूरळ.- श्रीमंती,अर्धापुरी,सातमासी या देशी वाणांचा वापर व्हावा.