शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

‘मे हीट’चा तडाखा, उन्हामुळे केळी बागा करपत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:16 IST

हरताळा, ता.मुक्ताईनगर : हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी व वैशाखाच्या तीव्र उन्हामुळे अर्धवट सुकलेल्या केळीच्या बागा उपटून फेकण्यात येत आहेत. ...

हरताळा, ता.मुक्ताईनगर : हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी व वैशाखाच्या तीव्र उन्हामुळे अर्धवट सुकलेल्या केळीच्या बागा उपटून फेकण्यात येत आहेत. मे महिन्याच्या शेवटी आता काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असता, वैशाखाच्या वणव्यात भूजल पातळीही झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे संकट गंभीर बनत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतातील कूपनलिका बंद पडल्या आहेत. अतिशय कमी पाण्यावर केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

येथील सुलोचना रत्नाकर कुलकर्णी नामक शेतकऱ्याने गटनंबर ४७४/१ मधील शेतात तीन हजार केळी खोड पाणी नसल्याने उपटून फेकले आहेत. वर्षभर केळीची निगा राखली. आता संपूर्ण खर्च वाया गेला आहे. एवढेच नव्हे, तर केळीबागा वाचविण्यासाठी नवीन दुसऱ्या ठिकाणावरील केळी वाचविण्याची धडपड सुरू आहे. यंदाच्या हंगामाचा खर्च वाया गेला आहे. पाणी कमी असल्याने केळीच्या बागा उपटून भेटण्याची वेळ आली आहे.

बागा वाचविण्यासाठी धडपड

अनेक ठिकाणी शेताच्या बांधावर चारही बाजूंनी केळी व बचावासाठी कपड्यांचा आडोसा करण्यात आला आहे. अपूर्ण पाण्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. लागलेला पैसा व व्यापाऱ्याकडून घेतलेला कर्जाचा पैसा परतफेड करणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी केळी मे हीटच्या उन्हाच्या तडाख्यामुळे आणि वादळाच्या भीतीमुळे यंदाही शेतकरी केळी लागवडीसाठी धजावत नव्हता. कूपनलिकाही अर्ध्यावरच बंद पडल्या आहेत. केळीच्या बागा सोडाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच केळ्यालाही पाहिजे तसा भाव नसल्याने, शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

केळी गुरांच्या पुढे

सध्या केळ्याला कमी भाव मिळत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. केळ्याचा वापर गुरांचा चारा म्हणून उपयोगासाठी होत आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला, तरीही केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी अशा प्रकारे डझनभर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. काही शेतकऱ्यांनी ओझरखेडा येथील तलावातून स्वखर्चाने पाइपलाइन करून पाणी आणले आहे. मात्र, यंदा या ओझरखेडा तलावात हतनूर धरणाचे पुराचे पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यातही काही प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांच्या बागा धरून आहे, तर काहींकडे पाणी पातळी खोल गेल्याने व दुसरी कोणतीही सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने, केळी उपटून फेकण्याचे संकट शेतकऱ्यांवर येत आहे. यासाठी कायम सिंचनाची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.