शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

‘मे हीट’चा तडाखा, उन्हामुळे केळी बागा करपत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:16 IST

हरताळा, ता.मुक्ताईनगर : हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी व वैशाखाच्या तीव्र उन्हामुळे अर्धवट सुकलेल्या केळीच्या बागा उपटून फेकण्यात येत आहेत. ...

हरताळा, ता.मुक्ताईनगर : हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी व वैशाखाच्या तीव्र उन्हामुळे अर्धवट सुकलेल्या केळीच्या बागा उपटून फेकण्यात येत आहेत. मे महिन्याच्या शेवटी आता काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असता, वैशाखाच्या वणव्यात भूजल पातळीही झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे संकट गंभीर बनत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतातील कूपनलिका बंद पडल्या आहेत. अतिशय कमी पाण्यावर केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

येथील सुलोचना रत्नाकर कुलकर्णी नामक शेतकऱ्याने गटनंबर ४७४/१ मधील शेतात तीन हजार केळी खोड पाणी नसल्याने उपटून फेकले आहेत. वर्षभर केळीची निगा राखली. आता संपूर्ण खर्च वाया गेला आहे. एवढेच नव्हे, तर केळीबागा वाचविण्यासाठी नवीन दुसऱ्या ठिकाणावरील केळी वाचविण्याची धडपड सुरू आहे. यंदाच्या हंगामाचा खर्च वाया गेला आहे. पाणी कमी असल्याने केळीच्या बागा उपटून भेटण्याची वेळ आली आहे.

बागा वाचविण्यासाठी धडपड

अनेक ठिकाणी शेताच्या बांधावर चारही बाजूंनी केळी व बचावासाठी कपड्यांचा आडोसा करण्यात आला आहे. अपूर्ण पाण्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. लागलेला पैसा व व्यापाऱ्याकडून घेतलेला कर्जाचा पैसा परतफेड करणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी केळी मे हीटच्या उन्हाच्या तडाख्यामुळे आणि वादळाच्या भीतीमुळे यंदाही शेतकरी केळी लागवडीसाठी धजावत नव्हता. कूपनलिकाही अर्ध्यावरच बंद पडल्या आहेत. केळीच्या बागा सोडाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच केळ्यालाही पाहिजे तसा भाव नसल्याने, शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

केळी गुरांच्या पुढे

सध्या केळ्याला कमी भाव मिळत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. केळ्याचा वापर गुरांचा चारा म्हणून उपयोगासाठी होत आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला, तरीही केळी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी अशा प्रकारे डझनभर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. काही शेतकऱ्यांनी ओझरखेडा येथील तलावातून स्वखर्चाने पाइपलाइन करून पाणी आणले आहे. मात्र, यंदा या ओझरखेडा तलावात हतनूर धरणाचे पुराचे पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यातही काही प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांच्या बागा धरून आहे, तर काहींकडे पाणी पातळी खोल गेल्याने व दुसरी कोणतीही सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने, केळी उपटून फेकण्याचे संकट शेतकऱ्यांवर येत आहे. यासाठी कायम सिंचनाची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.