शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
4
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
5
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
6
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
7
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
8
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
9
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
10
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
11
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
12
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
13
कष्टाचं फळ! २६ व्या वर्षी रोज १८ तासांची ड्युटी करून तरुणीने घेतलं तब्बल ७ कोटींचं घर
14
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
15
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
16
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
17
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
18
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
19
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
20
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘केळीला’ आले ‘सुगीचे दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

केऱ्हाळे, ता. रावेर : सतत कमी भावाच्या गर्तेत सापडत असलेला केळी उत्पादक यावर्षी समाधानकारक भाव हातात पडत असल्यामुळे बऱ्यापैकी ...

केऱ्हाळे, ता. रावेर : सतत कमी भावाच्या गर्तेत सापडत असलेला केळी उत्पादक यावर्षी समाधानकारक भाव हातात पडत असल्यामुळे बऱ्यापैकी खूश दिसत आहे . दिल्ली रेल्वे रॅक सुरू झाल्याने हे चांगले दिवस आले आहे. अन्यथा गत अनेक वर्षांपासून सुरू असलेली दराबाबतची घुसमट आतासुद्धा ‘जैसे थे’ राहिली असती.

रॅकमध्ये आठवड्याला जातो ११ हजार क्विंटल माल

रेल्वेद्वारे दिल्ली जाणारा माल कमी वेळेत चांगल्या दर्जाचा व कमी भाड्याने जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनासुद्धा पाठवलेल्या मालाचे पैसे करता येत आहेत. सहाजिकच परतावा जर चांगल्या प्रमाणात व ग्यारंटीने मिळत असेल तर योग्य भावात खरेदी करणे सहज शक्य होत असते. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरीही स्वतंत्र डबे भरून आपला माल दिल्लीत पाठवत असून स्वतः विक्री करून पैसे मिळवत आहे. याचाच परिणाम म्हणून केळीपट्ट्यात शेतकऱ्यांचा माल शेतात तुंबत नसून बागांची गरजेनुसार कापणी होऊन खाली होत आहेत.

मालाची सतत मागणी

मालाची सतत मागणी करण्यात येत असून मालाची उचल होत असल्याचे पाहता त्याला अनुसरून पुरवठा होत आहे. बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याचा ताळमेळ साधता आला तरच भावाचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत होत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

आठवड्यात भरले जातात दोन रॅक

एका आठवड्यात तीन दिवसांच्या अंतराने असे दोन रॅक भरले जातात यामध्ये सावादा व रावेर मिळून व्यापारी व शेतकरी सदस्य आहेत. २४ डब्यांच्या एका रॅकमध्ये ५५०० क्विंटल माल असा दोन रॅकमध्ये ११ हजार क्विंटल माल रेल्वे घेऊन जात असल्यामुळे उर्वरित माल हा ट्रकने लोंडिंग करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही बोर्ड भावाला अनुसरूनच द्यावा लागत आहे. अन्यथा शेतकरी साफ नकार देत असल्याचे चित्र आहे.

अत्यंत चांगल्या प्रतीच्या मालाला आजही १३५० पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. तर साधारण मालालासुद्धा १ हजारपेक्षा कमी भावाने मागणी केली जात नसल्याचे वास्तव आहे. अन्यथा शेतकऱ्यांकडून सरळ नकार दिला जात आहे.

मोठ्या कालखंडानंतर शेतकऱ्यांसाठी सचोटीने केंद्र सरकारकडे प्रयत्न करून वॅगन उपलब्ध करून देण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याचे फळ असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून यासंदर्भात बोलले जात आहे.

कमी दरात रेल्वेने वॅगन उपलब्ध झाल्यामुळेच केळी राजधानी दिल्लीत पोहोचवणे शक्य झाले. यामुळे केळी बागांमध्ये न तुंबता वेळीवेळी खाली होत आहे. त्यामुळे भावातील स्थिरता ठेवणे शक्य होत आहे.

- रामदास त्र्यंबक पाटील, अध्यक्ष, फळ बागायतदार शेतकरी मंडळ व केळी भाव समिती रावेर

फोटो : रावेर येथील रॅकमध्ये लोंडिंग करताना रामदास पाटील व काही शेतकरी. (छाया : रमेश पाटील)