शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

‘केळीला’ आले ‘सुगीचे दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

केऱ्हाळे, ता. रावेर : सतत कमी भावाच्या गर्तेत सापडत असलेला केळी उत्पादक यावर्षी समाधानकारक भाव हातात पडत असल्यामुळे बऱ्यापैकी ...

केऱ्हाळे, ता. रावेर : सतत कमी भावाच्या गर्तेत सापडत असलेला केळी उत्पादक यावर्षी समाधानकारक भाव हातात पडत असल्यामुळे बऱ्यापैकी खूश दिसत आहे . दिल्ली रेल्वे रॅक सुरू झाल्याने हे चांगले दिवस आले आहे. अन्यथा गत अनेक वर्षांपासून सुरू असलेली दराबाबतची घुसमट आतासुद्धा ‘जैसे थे’ राहिली असती.

रॅकमध्ये आठवड्याला जातो ११ हजार क्विंटल माल

रेल्वेद्वारे दिल्ली जाणारा माल कमी वेळेत चांगल्या दर्जाचा व कमी भाड्याने जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनासुद्धा पाठवलेल्या मालाचे पैसे करता येत आहेत. सहाजिकच परतावा जर चांगल्या प्रमाणात व ग्यारंटीने मिळत असेल तर योग्य भावात खरेदी करणे सहज शक्य होत असते. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरीही स्वतंत्र डबे भरून आपला माल दिल्लीत पाठवत असून स्वतः विक्री करून पैसे मिळवत आहे. याचाच परिणाम म्हणून केळीपट्ट्यात शेतकऱ्यांचा माल शेतात तुंबत नसून बागांची गरजेनुसार कापणी होऊन खाली होत आहेत.

मालाची सतत मागणी

मालाची सतत मागणी करण्यात येत असून मालाची उचल होत असल्याचे पाहता त्याला अनुसरून पुरवठा होत आहे. बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याचा ताळमेळ साधता आला तरच भावाचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत होत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

आठवड्यात भरले जातात दोन रॅक

एका आठवड्यात तीन दिवसांच्या अंतराने असे दोन रॅक भरले जातात यामध्ये सावादा व रावेर मिळून व्यापारी व शेतकरी सदस्य आहेत. २४ डब्यांच्या एका रॅकमध्ये ५५०० क्विंटल माल असा दोन रॅकमध्ये ११ हजार क्विंटल माल रेल्वे घेऊन जात असल्यामुळे उर्वरित माल हा ट्रकने लोंडिंग करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही बोर्ड भावाला अनुसरूनच द्यावा लागत आहे. अन्यथा शेतकरी साफ नकार देत असल्याचे चित्र आहे.

अत्यंत चांगल्या प्रतीच्या मालाला आजही १३५० पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. तर साधारण मालालासुद्धा १ हजारपेक्षा कमी भावाने मागणी केली जात नसल्याचे वास्तव आहे. अन्यथा शेतकऱ्यांकडून सरळ नकार दिला जात आहे.

मोठ्या कालखंडानंतर शेतकऱ्यांसाठी सचोटीने केंद्र सरकारकडे प्रयत्न करून वॅगन उपलब्ध करून देण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याचे फळ असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून यासंदर्भात बोलले जात आहे.

कमी दरात रेल्वेने वॅगन उपलब्ध झाल्यामुळेच केळी राजधानी दिल्लीत पोहोचवणे शक्य झाले. यामुळे केळी बागांमध्ये न तुंबता वेळीवेळी खाली होत आहे. त्यामुळे भावातील स्थिरता ठेवणे शक्य होत आहे.

- रामदास त्र्यंबक पाटील, अध्यक्ष, फळ बागायतदार शेतकरी मंडळ व केळी भाव समिती रावेर

फोटो : रावेर येथील रॅकमध्ये लोंडिंग करताना रामदास पाटील व काही शेतकरी. (छाया : रमेश पाटील)