शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचा प्रश्न सुटल्याने केळी कापणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:06 IST

आमदारद्वयींसह पालकमंत्र्यांचे प्रयत्न : जिल्हाभरातील केळी उत्पादकांना दिलासा

चिनावल, ता. रावेर : केळी वाहतुकीत येणारी अडचण दूर झाल्यामुळे गुरुवार पासून केळी कापणीला सुरुवात झाली असून हा माल ट्रकमध्येही भरला जाऊ लागला आहे. शासनाने या मालाच्या वाहतुकीस संचारबंदीतही परवानगी दिली असताना केवळ बाहेरील राज्यात ट्रक्स नेता येत नव्हते. मात्र आमदार शिरीष चौधरी आणि चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर हा प्रश्न सुटू शकला.कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे काढणी योग्य परिपक्व झालेले केळी काढून विक्रीस तयार असताना देशभर लोकडाऊन असल्यामुळे उत्तर भारतातील बाजारपेठा देखील बंद आहेत त्यामुळे केळी बाजारात नेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या शेतमालाची माती होते की काय अशी महाभयंकर परिस्थिती केळी उत्पादक शेतकरी राजावर ओढावली होती. त्यात तोंडावर असलेले हसू आता अश्रूत परिवर्तित होणार असताना केळी फळाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळून नियार्तीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी कोचुर येथील पंकज पाटील व कमलाकर पाटील यांचेसह मोठे वाघोदा, सावदा, उधळी, रणगाव, रायपुर , खिर्डी, निंबोल, ऐनपुर, तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील तर चिनावल खिरोदा, रोझोदा, सावखेडा, कुंभारखेडा, येथील शेतकऱ्यांनी आमदार शिरीष चौधरी यांना फोनवरून केली होती. दोघा आमदरांनी लागलीच अ‍ॅक्शन मोडमध्ये येत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शेतकºयांची कैफियत मांडली होती. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याने शेतकºयांबाबतीत संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच पंजाब , उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केल्याने केळी निर्यातीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.केळी मजुरांची सुरक्षा ही गरजेचीआजपासून केळी कापणी सुरुवात झाली असली तरी एका मालगाडीवर किमान वीस ते कमाल चाळीस केळी मजूर लागत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून त्यांना मास्क व हात मोजे याचे सह सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे असे मत केळी युनियनचे उपाध्यक्ष कमलाकर पाटील यांनी व्यक्त केले.