शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
5
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
6
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
7
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
8
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
9
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
10
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
11
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
12
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
13
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
14
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
15
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
16
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
17
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
18
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
19
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
20
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना प्रतिहेक्टरी फक्त १८ हजाराची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 19:59 IST

जून महिन्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या केळी बागांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्त केळी उत्पादकांना प्रतिहेक्टरी अठरा हजार रुपये शासनाने मदत जाहीर केली असून मध्य प्रदेश राज्याच्या तुलनेत अत्यंत तुटपूंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांची टिंगल केल्याचा संतप्त सूर व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे केळी उत्पादकांचे ११४ कोटी रुपयांचे झाले होते नुकसान मंत्री आणि पथकाने केली होती पहाणी अनेकदा बैठका, विधीमंडळात चर्चा होऊनही तुटपूंजी मदतीची भावना

आॅनलाईन लोकमतरावेर, दि.२१ : गेल्या जून महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील बहुतांश केळी बागा जमिनदोस्त झाल्या होत्या. याबाबत केळी उत्पादकांना मदत देण्याची मागणी होत असतांना अनेक बैठका आणि पाहणीअंती सरकारने प्रति हेक्टरी १८ हजार रुपये एवढी मदत जाहीर केली आहे. शेजारच्या मध्य प्रदेश सरकारने प्रति हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर केली असतांना महाराष्टÑातील सरकारने तुटपूंजी मदत जाहीर करून आपद्ग्रस्त केळी उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केळीचे साधे बेणेही खरेदी करता न येऊ शकणाºया चार रुपयांची प्रतिखोडामागे किरकोळ मदत करून सरकारने एकप्रकारे केळी उत्पादकांची टिंगल उडविल्याचा संतप्त सूर उमटत आहे.रावेर तालुक्यात जूनच्या पुर्वार्धातच वादळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात सुमारे अडीच हजार हेक्टर मधील ११४. ०५ कोटी रुपयांची केळी जमीनदोस्त झाली होती. तसे पंचनामे महसूल व कृषी विभागाने केले होते.दरम्यान, नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन केळी उत्पादकांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी खासदार रक्षा खडसे व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेवून प्रतिहेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली होती. तसेच आमदार हरिभाऊ जावळे यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रतिहेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदतीची मागणी केली होती. शासनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकºयांना दिलासा देण्याबाबत केंद्रीय मदत व पुनर्वसन समितीसमोर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले होते. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॅबीनेटच्या बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय घेण्याचे घोषित केले होते. या सर्व आश्वासनानंतर कॅबिनेटच्या बैठकांवर बैठका झाल्या तरी मंत्रीमंडळाला आपद्ग्रस्त केळी उत्पादकांना सुयोग्य मदत देण्यात आली नसल्याची शोकांतिका समोर आली आहे. किंबहुना जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गोटातील अत्यंत निकटचे मंत्री मानले जात असतांना त्यांच्याकडूनही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या पदरात काही भरीव मदत पडेल अशी असलेली आशा फोल ठरल्याने या सरकारला केळी उत्पादकांबाबत संवेदना नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना