शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

केळीच्या तेजीला लागले गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:17 IST

रावेर : उत्तर प्रदेशात वाढलेले केळीचे उत्पादन व आपल्या भागात करपाचा काही प्रमाणात असलेला प्रादुर्भाव यामुळे खान्देशी ...

रावेर : उत्तर प्रदेशात वाढलेले केळीचे उत्पादन व आपल्या भागात करपाचा काही प्रमाणात असलेला प्रादुर्भाव यामुळे खान्देशी केळी बाजारभावातील तेजीला गालबोट लागले आहे. व्यापारी केळीमालाची बऱ्यापैकी मागणी असतानाही जास्त नफेखोरीच्या हव्यासापोटी गुणात्मक दर्जाची प्रतवारी करून केळी भावात तडजोड करीत असल्याने घोषित बाजारभावात कपात करून केळी खरेदी करण्याचा व्यापाऱ्यांनी जणूकाही पायंडा पाडल्याची विदारक चित्र आहे. किंबहुना, रावेर व सावदा रेल्वे मालवाहतुकीने मात्र केळी बाजारपेठेतील होणाऱ्या घसरणीत संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

याव्यतिरिक्त दर्जेदार कंपनीच्या रोपविक्रीमुळे केळी उत्पादनात खान्देशची हुकूमत असताना देशभरात केळी उत्पादनाचा प्रसार होत आहे. यामुळे खान्देशची केळी उत्पादनातील सद्दी जणूकाही मोडीत निघाल्याचे चित्र आजमितीस पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशात केळी उत्पादन वाढीस लागल्याने खान्देशातून उत्तर प्रदेश तथा उत्तर भारतात होणाऱ्या केळीमालाच्या मागणीत घट झाली आहे. इतर ठिकाणाहून आणताना भाडेवाहतुकीपेक्षा स्थानिक केळी उत्पादन माफक ठरत असल्याने खान्देशी केळीला उत्तर प्रदेशातील बाजारपेठेची कवाडे जवळपास बंद झाल्याचे विदारक चित्र आहे.

किंबहुना, उत्तर प्रदेशातली नवती केळीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर दुसरीकडे खान्देशात प्रदीर्घ खंडात उंचावलेले तापमान, ढगाळ वातावरण व तडाखेबंद पाऊस यामुळे वातावरणातील आर्द्रता वाढून करप्याने केळी बागांवर विळखा घातल्याने स्थानिक व्यापारीवर्गाला आपसूकच बहाणा मिळाला. व्यापारी हे केळीमालाची गुणात्मक दर्जाची मुद्दाम प्रतवारी करून बाजार समितीने घोषित केलेल्या बाजारभावापेक्षा किमान २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल कमी भावाने केळी खरेदी करण्याचा जणूकाही पायंडाच पाडला आहे.

करपा निर्मूलन पॅकेज मिळावे !

तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या करपा निर्मूलन पॅकेजचा निधी महायुतीच्या काळात राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पदरात टाकला नसला तरी, महाविकास आघाडीच्या सरकारने करपा निर्मूलनाचा गत पाच -सहा वर्षांपासून शासनाच्या तिजोरीत धूळ खात पडलेला केंद्र सरकारचा निधी पुनर्जीवित करून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात टाकावा, अशी मागणी होत आहे.

तांदलवाडी येथून कांदेबाग केळीची प्रथमच होणार निर्यात

रावेर तालुक्यातील मृगबहार केळीची तांदलवाडी, कुंभारखेडा, अटवाडे, न्हावी येथून तथा जळगाव येथील जैन टिश्यू कंपनीने अद्यापपावेतो आखाती राष्ट्रांत निर्यातीसाठी भरारी घेतली असली तरी, यंदा अर्थात पुढील महिन्यापासून गुणात्मक व निर्यातक्षम दर्जाच्या कांदेबाग केळी निर्यातीसाठी तांदलवाडी येथील महाजन एक्स्पोर्ट कंपनीने आपले पहिले पाऊल टाकले आहे. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच कांदेबाग केळी निर्यातीचा शुभारंभ केला जात असल्याने या निर्यातीस प्रतिथयश मानले जात असल्याचे संचालक सदानंद महाजन यांनी स्पष्ट केले.