शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

केळीच्या तेजीला लागले गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:17 IST

रावेर : उत्तर प्रदेशात वाढलेले केळीचे उत्पादन व आपल्या भागात करपाचा काही प्रमाणात असलेला प्रादुर्भाव यामुळे खान्देशी ...

रावेर : उत्तर प्रदेशात वाढलेले केळीचे उत्पादन व आपल्या भागात करपाचा काही प्रमाणात असलेला प्रादुर्भाव यामुळे खान्देशी केळी बाजारभावातील तेजीला गालबोट लागले आहे. व्यापारी केळीमालाची बऱ्यापैकी मागणी असतानाही जास्त नफेखोरीच्या हव्यासापोटी गुणात्मक दर्जाची प्रतवारी करून केळी भावात तडजोड करीत असल्याने घोषित बाजारभावात कपात करून केळी खरेदी करण्याचा व्यापाऱ्यांनी जणूकाही पायंडा पाडल्याची विदारक चित्र आहे. किंबहुना, रावेर व सावदा रेल्वे मालवाहतुकीने मात्र केळी बाजारपेठेतील होणाऱ्या घसरणीत संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

याव्यतिरिक्त दर्जेदार कंपनीच्या रोपविक्रीमुळे केळी उत्पादनात खान्देशची हुकूमत असताना देशभरात केळी उत्पादनाचा प्रसार होत आहे. यामुळे खान्देशची केळी उत्पादनातील सद्दी जणूकाही मोडीत निघाल्याचे चित्र आजमितीस पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशात केळी उत्पादन वाढीस लागल्याने खान्देशातून उत्तर प्रदेश तथा उत्तर भारतात होणाऱ्या केळीमालाच्या मागणीत घट झाली आहे. इतर ठिकाणाहून आणताना भाडेवाहतुकीपेक्षा स्थानिक केळी उत्पादन माफक ठरत असल्याने खान्देशी केळीला उत्तर प्रदेशातील बाजारपेठेची कवाडे जवळपास बंद झाल्याचे विदारक चित्र आहे.

किंबहुना, उत्तर प्रदेशातली नवती केळीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर दुसरीकडे खान्देशात प्रदीर्घ खंडात उंचावलेले तापमान, ढगाळ वातावरण व तडाखेबंद पाऊस यामुळे वातावरणातील आर्द्रता वाढून करप्याने केळी बागांवर विळखा घातल्याने स्थानिक व्यापारीवर्गाला आपसूकच बहाणा मिळाला. व्यापारी हे केळीमालाची गुणात्मक दर्जाची मुद्दाम प्रतवारी करून बाजार समितीने घोषित केलेल्या बाजारभावापेक्षा किमान २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल कमी भावाने केळी खरेदी करण्याचा जणूकाही पायंडाच पाडला आहे.

करपा निर्मूलन पॅकेज मिळावे !

तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या करपा निर्मूलन पॅकेजचा निधी महायुतीच्या काळात राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पदरात टाकला नसला तरी, महाविकास आघाडीच्या सरकारने करपा निर्मूलनाचा गत पाच -सहा वर्षांपासून शासनाच्या तिजोरीत धूळ खात पडलेला केंद्र सरकारचा निधी पुनर्जीवित करून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात टाकावा, अशी मागणी होत आहे.

तांदलवाडी येथून कांदेबाग केळीची प्रथमच होणार निर्यात

रावेर तालुक्यातील मृगबहार केळीची तांदलवाडी, कुंभारखेडा, अटवाडे, न्हावी येथून तथा जळगाव येथील जैन टिश्यू कंपनीने अद्यापपावेतो आखाती राष्ट्रांत निर्यातीसाठी भरारी घेतली असली तरी, यंदा अर्थात पुढील महिन्यापासून गुणात्मक व निर्यातक्षम दर्जाच्या कांदेबाग केळी निर्यातीसाठी तांदलवाडी येथील महाजन एक्स्पोर्ट कंपनीने आपले पहिले पाऊल टाकले आहे. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच कांदेबाग केळी निर्यातीचा शुभारंभ केला जात असल्याने या निर्यातीस प्रतिथयश मानले जात असल्याचे संचालक सदानंद महाजन यांनी स्पष्ट केले.