शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

बाजार समितीत किरकोळ ग्राहक व विक्रेत्यांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी किरकोळ ग्राहकांना व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी किरकोळ ग्राहकांना व विक्रेत्यांना बाजार समितीत प्रवेश बंद करण्याचे आदेश उपायुक्त संतोष वाहुळे यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत. केवळ परवानाधारक विक्रेत्यांनाच बाजार समितीत प्रवेश देण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी आता भाजीपाला व फळ बाजार तीन वेगवेगळ्या ठिकाणावर भरणार असल्याची ही माहिती उपायुक्तांनी दिली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये दररोज सकाळी लिलावादरम्यान हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच या गर्दीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालनदेखील याठिकाणी होताना दिसून येत नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजता उपायुक्त संतोष वाहुळे यांनी बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये पाहणी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत भाजीपाला बाजार मार्केटमधील तीन ठिकाणी भरण्याचा निर्णय घेण्यात आला, तर फळ बाजार हा बाजार समितीच्या आवारात असलेल्या गुरांचा बाजाराच्या ठिकाणी भरण्यात यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच बाजार समिती परिसरात लहान रिक्षांना बंदी घालून, मुख्य प्रवेशद्वारात केवळ येण्यासाठी, तर दुसऱ्या प्रवेशद्वाराचा वापर जाण्यासाठी करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. तसेच लिलावादरम्यान बाजार समितीचे पथक व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहेत.

नेरी नाका परिसरातील अनधिकृत हॉकर्सवर कारवाई

मंगळवारी नेरी नाका परिसरात अनेक हॉकर्सने दुकाने थाटली होती. तसेच या ठिकाणी दुपारी बारा वाजेनंतर देखील नागरिकांची गर्दी असल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जोरदार कारवाई करत २० विक्रेत्यांचा माल जप्त केला. तसेच काशीबाई उखाजी कोल्हे शाळा परिसरात देखील मंगळवारी मोठा बाजार भरला होता. या ठिकाणी देखील मनपाच्या पथकाने जाऊन हा बाजार उठवला. तसेच या ठिकाणी १६ विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान मनपा कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये किरकोळ वाददेखील झाला होता.