शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण बाजार बंदमुळे बळीराजाही संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांदरम्यान सुवर्ण बाजार बंद असल्याने याचा फटका सुवर्ण व्यावसायिकांसह बळीराजालाही बसत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांदरम्यान सुवर्ण बाजार बंद असल्याने याचा फटका सुवर्ण व्यावसायिकांसह बळीराजालाही बसत आहे. शेती मशागतीसाठी घरातील दागिन्यांची मोड करणे अथवा ते तारण ठेवून पैसा उभा करण्याचे साधन असलेल्या सुवर्ण पेढ्याच बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.

कोरोनामुळे विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. त्यात देशाची अर्थव्यवस्था ज्यावर अवलंबून आहे, ती शेती देखील संकटात सापडली आहे. खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या काळातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने या कामांवर परिणाम होत आहे. या कामासह बी-बियाणे, खते यांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्ज घेऊन आपली कामे करीत असतो. या सोबतच मिळणाऱ्या कर्जात शेती कामांचा खर्च भागणे शक्य नसल्याने शेतकरी त्यांच्याकडे असलेले सोने-चांदीचे दागिने मोडून अथवा तारण ठेवून पैसा उभा करतो.

घरात कापूस असो की इतर रब्बी हंगामातील माल पडून आहे. दुसरीकडे सुवर्ण पेढ्या बंद असल्याने दागिन्यांची मोड करता येत नाही की ते तारण ठेवता येत नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

जास्त भाव असूनही मोड करता येईना

सोन्याचे भाव चांगलेच वाढले असल्याने शेतकऱ्यांना मोड करताना यंदा भावाचा अधिक फायदा होणार होता. यातून बळीराजाच्या हाती अधिक पैसा पडला असता. मात्र सुवर्ण पेढ्याच बंद असल्याने ना मोड, ना जास्त भावाचा फायदा करता आला नाही.

हंगामात बंद

एप्रिल, मे महिन्यात शेती मशागतीसह लग्नसराई देखील असते. त्यामुळे लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होते. या सोबतच शेतीसाठी बँकांकडून कर्ज मिळाले तरी ते हजारात असते व शेताला खर्च लाखात लागतो, त्यामुळे दागिने मोडसाठी शेतकरी सुवर्ण पेढ्यांकडे धाव घेतो. परिणामी सुवर्ण बाजारात दुहेरी उलाढाल या काळात होत असते.

दुकानांना वेळ ठरवून द्या

शेतकऱ्यांच्या हाती पैसा येण्यासाठी सुवर्णपेढ्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांसह सुवर्ण व्यावसायिक देखील करीत आहेत. यासाठी वेळा निश्चित करून दिल्या तरी शेतकऱ्यांना मोठा आधार होईल व शेतीचे अर्थकारण सुरू होईल, असाही सूर उमटत आहे.

-------------

आज शेतकऱ्यांच्या घरात कापूस तसेच इतर पिके पडून आहे. ते विकताही येत नाही. त्यात सुवर्ण पेढ्या बंद असल्याने शेतकऱ्यांना स्वत: जवळील दागिने विकता येत नाही की तारण ठेवता येत नाही. त्यामुळे शेती मशागतीसाठी पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

- किशोर चौधरी, शेतकरी, असोदा, ता. जळगाव.

एप्रिल व मे महिन्यात लग्नसराईमुळे सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी असतेच. सोबतच शेती मशागतीच्या कामासाठी देखील शेतकरी त्यांच्याकडील दागिने विक्रीसाठी आणतात. त्यामुळे या दिवसात ही दुहेरी उलाढाल होते. मात्र यंदा सुवर्ण पेढ्या बंद असल्याने हे सर्व व्यवहार ठप्प आहेत.

- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक