शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

हरिभाऊंच्या नियुक्तीने सत्तासंतुलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:23 IST

मिलिंद कुलकर्णी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांची महाराष्टÑ कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन राज्य शासनाने शेती ...

मिलिंद कुलकर्णीभाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांची महाराष्टÑ कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन राज्य शासनाने शेती आणि मातीशी प्रामाणिक राहणाऱ्या एका नेत्याचा गौरव केला आहे. दोनवेळा खासदार, दोन वेळा आमदार राहिलेल्या जावळे यांना कधी गर्व, अहंकाराने स्पर्श केला नाही. पक्षसंघटनेच्या शिस्तीत राहून त्यांनी पक्ष जो आदेश देईल, त्याचे पालन केले. आणि बहुदा निष्ठावंत, शिस्तबध्द नेता म्हणून त्यांना कॅबिनेट दर्जाचे पद देऊन रास्त न्याय दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या मार्गावर असताना ही नियुक्ती झाल्याने जावळे यांना इच्छा असूनही फार काही करता येईल, असे नाही. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असली तरी दोन महिन्यानंतरच्या निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाची सत्ता येते त्यावर या परिषदेच्या उपाध्यक्षपदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा नियुक्तया का होतात, हे न उलगडणारे कोडे आहे. काँग्रेस-राष्टÑवादी असो की, भाजप-शिवसेना , प्रत्येकाने असे निर्णय घेतलेले आहेत. शिवसेना-भाजपच्या पहिल्या युती सरकारच्या काळात नुकतेच दिवंगत झालेले जिल्हाप्रमुख स्व.गणेश राणा यांना असेच शेवटच्या टप्प्यात राज्य साक्षरता आयोगाचे अध्यक्षपद दिले गेले. निष्ठावंत शिवसैनिकाला मिळालेल्या पहिल्या लाल दिव्याच्या गाडीचे मोठे अप्रुप तेव्हा होते. पण पुढे सत्तांतर झाल्याने राणा यांना अधिक काही करता आले नाही.जावळे यांच्या नियुक्तीने पक्षांतर्गत सत्तासंतुलन राखले गेले आहे. जळगाव जिल्ह्यातील निम्म्या भागात लेवा समाजाचे मोठे प्राबल्य आहे. एक खासदार आणि तीन आमदार या समाजाकडून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे या समाजाचा चेहरा आहेत. तीन वर्षांपासून ते मंत्रिमंडळाबाहेर आहेत. त्यामुळे समाजात नाराजीची भावना असणे स्वाभाविक आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. खडसे मंत्रिमंडळात नसले तरी त्यांच्या कुटुंबातील सून रक्षा खडसे यांना दुसऱ्यांदा खासदारकीचे तिकीट, पत्नी मंदाकिनी यांना महानंद आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद, कन्या रोहिणी यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद ही पदे कायम आहेत. समाजातील दुसरे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा यांना जळगावचे महापौरपद दिले गेले आणि हरिभाऊ जावळे यांना कृषी परिषदेचे उपाध्यक्षपद देण्यात आले. लेवा समाजाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संदेश या निमित्ताने भाजपने दिला आहे.लेवा समाजात एकनाथराव खडसे यांना मोठा मान आहे. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे त्यांची आणि समाजाची नाराजी राहू नये, असा प्रयत्न सत्तासंतुलनाचा माध्यमातून केला जात आहे. रावेर येथे गेल्या पंधरवड्यात झालेल्या भाजप मेळाव्यातील दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. भाजपने तिकीट नाकारले तरी मी पक्षाचे काम करीत राहणार असे खडसे यांनी केलेल्या विधानातून तर्कवितर्काला जागा करुन दिली आहे. खडसे यांना राज्यपालपद किंवा राज्यसभेचे सदस्यत्व देऊन कन्या रोहिणी यांना मुक्ताईनगर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येणार असल्याची पक्षांतर्गत चर्चेच्या पार्श्वभूमीवर या विधानाला महत्त्व प्राप्त होते. दुसरे विधान म्हणजे, रावेर मतदारसंघात उपºयांना स्थान नाही, हरिभाऊ जावळे हेच भाजपचे उमेदवार राहतील, असा स्पष्ट निर्वाळा खडसे यांनी दिला. खडसे यांचा अंगुलीनिर्देश अनिल चौधरी यांच्याकडे होता. गेल्या वर्षभरापासून ते रावेरमध्ये सक्रीय आहेत. अमळनेरची पुनरावृत्ती रावेरमध्ये करण्याचा त्यांचा मानस दिसतोय. चौधरी हे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय आहेत, त्याचसोबत भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू आहेत. हरिभाऊ जावळे यांना पाठिंबा देऊन खडसे यांनी महाजन यांच्या कथित प्रयत्नांना विरोध आणि जावळे यांच्या उमेदवारीचे सुतोवाच करीत समाजाला महत्त्व देण्याची कृती केली आहे. असाच एक मुद्दा अलिकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघात उपस्थित झाला होता. खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रेल्वेत नृत्य करुन आनंदोत्सव साजरा करणाºयाला तुम्ही मते देणार का, असा संदेश व्हायरल झाला होता. समाजातील अस्वस्थता वाढविण्याच्या प्रयत्नाचा हा भाग असला तरी पक्षश्रेष्ठींनी अचूक वेळी निर्णय घेऊन जावळेंना संधी दिली आणि सत्तासंतुलन राखले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव