शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

बहिणाबाईंचे काव्य म्हणजे चिंतनशीलतेचा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 20:39 IST

अमळनेर येथे व्याख्यानात प्रा सत्यजीत साळवे यांचे प्रतिपादन

अमळनेर, जि.जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यानिमित्ताने प्रताप महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे व्यक्तित्व आणि काव्य’ या विषयावर जळगाव येथील डॉ.जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.सत्यजीत साळवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थिर्नींकडून बहिणाबाईंच्या निवडक कवितांचे अभिवाचन व गायन करण्यात आले. यात तनया चौधरी हिने (मी कोन?), भाग्यश्री कासार (विठ्ठल मंदिर), दर्शना ठाकूर (संसार), मीनल पाटील (मन), महानंदा पाटील (धरत्रीले दंडवत), जयश्री पाटील (खोप्यामधी खोपा), मानसी भावसार (मानूस), सोनाली बाविस्कर (लपे करमाची रेखा) अशा विविधांगी कवितांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्याख्याते प्रा.सत्यजीत साळवे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या व्यक्तिमत्वावर व त्यांच्या काव्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, ‘बहिणाबाईंची कविता ही साध्या-सोप्या भाषेतून मानवी जीवनाचे तत्वज्ञान मांडते. बहिणाबाईंच्या ‘बहिणाबाईची गाणी’ या पुस्तकातून पानोपानी चिंतन प्रकटले आहे. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, अफाट प्रतिभाशक्ती, वास्तव दर्शन, शिवाय ग्रामीण आणि कृषि जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन ती आपल्या बोलीतून जिवंत करते.म्हणून तिची कविता लोकमुखी झाली आहे, असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एल.एल.मोमाया होते. सोबत मराठी विभागप्रमुख प्रा.एम.बी.निकम, प्रा.आर.पी.पाटील, प्रा.संदीप नेरकर, प्रा.नितीन पाटील, प्रा.नीलेश चित्ते, प्रा.धनंजय चौधरी, प्रा.ज्ञानेश्वर मराठे, प्रा.किरण भागवत आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगेश पाटील, प्रास्ताविक ज्ञानेश्वर कांबळे, पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. रमेश माने, तर आभार प्रा.विलास गावीत यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर