शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बहिणाबाई महोत्सव झाला ‘लोकोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:05 IST

सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सांस्कृतिक चळवळ बळकट करणे ही आता काळाची गरज

ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थितीसंस्कृती या शब्दात दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वत:चा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत. पण जसजसे आधुनिकीकरणाचे वारे ग्रामीण भागापर्यंत पोहचू लागले तेव्हा ग्रामीण संस्कृतीचा काही प्रमाणात लोप होऊ लागला. मात्र आपल्या मातीचे ऋण फेडण्याची, संस्कृतीचे जतन करण्याची गरज निर्माण होऊ लागली. याच उद्देशाने भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘बहिणाबाई महोत्सव’ ही संकल्पना दीपक परदेशी या तरुणाच्या डोक्यात आली आणि सुरू झाला खान्देशी मातीचे ऋण व्यक्त करणारा, खान्देशी संस्कृतीचे जतन करणारा ‘बहिणाबाई महोत्सव’. बघता बघता चार वर्षांच्या प्रवासात लोकांच्या उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादामुळे ‘बहिणाबाई महोत्सव’ लोकोत्सव होऊन जनसामान्यांच्या मनावर राज्य करू लागला. याचे द्योतक म्हणजे या महोत्सवाला असणारी लोकांची उपस्थिती.यंदाचे हे महोत्सवाचे चौथे वर्ष होते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांचा, स्थानिक कलावंतांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यक्रमांना असलेली प्रेक्षकांची उदंड उपस्थितीने हा लोकोत्सव यशस्वी ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जवळपास दीड हजार स्थानिक बाल कलावंतांनी बहिणाबाई महोत्सवाच्या रंगमंचावर आपली कला सादर केली. महिलांचे आर्थिक सबलीकरण हाही एक उद्देश या महोत्सवातून महिला बचत गटांच्या स्टॉलची वाढती संख्या पाहता साध्य होताना दिसत आहे.मान्यवरांची उपस्थिती

खान्देशी मातीच्या सुजलाम सुफलामतेने राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्राला अनेक माणिक मोती दिले आहेत. या क्षेत्रातील मान्यवरांनी या महोत्सवाला हजेरी लावून कलावंतांना प्रोत्साहन दिले. महिला सक्षमीकरण हा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेला हा महोत्सव लोकसहभागाच्या प्रचंड प्रतिसादामुळे आता लोकोत्सव झाला आहे. अनेक सामाजिक उत्सव वेळोवेळी होत असतात. पण एकच महोत्सव घेऊन त्यात विविध सामाजिक विषय हाताळून त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी अशाप्रकारे सांस्कृतिक चळवळ बळकट करणे ही आता काळाची गरज झाली आहे.सिनेतारकांची उपस्थिती : महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने अधिकाधिक महिला या महोत्सवात सहभागी होत असतानाच, सिनेतारका सई ताह्मणकर, सोनाली कुळकर्णी यांची उपस्थिती होय. बहिणाबाई महोत्सवाला त्यांनी दिलेल्या हजेरीने महोत्सवाच्या प्रतिसादात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एखाद्या स्त्रीने ठरविले तर ती कोणत्याही क्षेत्रात सफल होऊ शकते याचे उदाहरण असणाºया दोन्ही सिनेतारका. सई ताह्मणकर तर सांगलीसारख्या ग्रामीण भागातून संघर्ष करीत आज या पदाला पोहचली आहे. महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने व खान्देशी तरुणींमधील आत्मविश्वास वाढवून भविष्यातील कलावंत व उद्योजिका घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता या सिनेतारकांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरली. (पूर्वार्ध)- विनोद ढगे

टॅग्स :Jalgaonजळगाव