शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

बहिणाबाई महोत्सव झाला ‘लोकोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:05 IST

सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सांस्कृतिक चळवळ बळकट करणे ही आता काळाची गरज

ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थितीसंस्कृती या शब्दात दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वत:चा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत. पण जसजसे आधुनिकीकरणाचे वारे ग्रामीण भागापर्यंत पोहचू लागले तेव्हा ग्रामीण संस्कृतीचा काही प्रमाणात लोप होऊ लागला. मात्र आपल्या मातीचे ऋण फेडण्याची, संस्कृतीचे जतन करण्याची गरज निर्माण होऊ लागली. याच उद्देशाने भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘बहिणाबाई महोत्सव’ ही संकल्पना दीपक परदेशी या तरुणाच्या डोक्यात आली आणि सुरू झाला खान्देशी मातीचे ऋण व्यक्त करणारा, खान्देशी संस्कृतीचे जतन करणारा ‘बहिणाबाई महोत्सव’. बघता बघता चार वर्षांच्या प्रवासात लोकांच्या उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादामुळे ‘बहिणाबाई महोत्सव’ लोकोत्सव होऊन जनसामान्यांच्या मनावर राज्य करू लागला. याचे द्योतक म्हणजे या महोत्सवाला असणारी लोकांची उपस्थिती.यंदाचे हे महोत्सवाचे चौथे वर्ष होते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांचा, स्थानिक कलावंतांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यक्रमांना असलेली प्रेक्षकांची उदंड उपस्थितीने हा लोकोत्सव यशस्वी ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जवळपास दीड हजार स्थानिक बाल कलावंतांनी बहिणाबाई महोत्सवाच्या रंगमंचावर आपली कला सादर केली. महिलांचे आर्थिक सबलीकरण हाही एक उद्देश या महोत्सवातून महिला बचत गटांच्या स्टॉलची वाढती संख्या पाहता साध्य होताना दिसत आहे.मान्यवरांची उपस्थिती

खान्देशी मातीच्या सुजलाम सुफलामतेने राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्राला अनेक माणिक मोती दिले आहेत. या क्षेत्रातील मान्यवरांनी या महोत्सवाला हजेरी लावून कलावंतांना प्रोत्साहन दिले. महिला सक्षमीकरण हा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेला हा महोत्सव लोकसहभागाच्या प्रचंड प्रतिसादामुळे आता लोकोत्सव झाला आहे. अनेक सामाजिक उत्सव वेळोवेळी होत असतात. पण एकच महोत्सव घेऊन त्यात विविध सामाजिक विषय हाताळून त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी अशाप्रकारे सांस्कृतिक चळवळ बळकट करणे ही आता काळाची गरज झाली आहे.सिनेतारकांची उपस्थिती : महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने अधिकाधिक महिला या महोत्सवात सहभागी होत असतानाच, सिनेतारका सई ताह्मणकर, सोनाली कुळकर्णी यांची उपस्थिती होय. बहिणाबाई महोत्सवाला त्यांनी दिलेल्या हजेरीने महोत्सवाच्या प्रतिसादात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एखाद्या स्त्रीने ठरविले तर ती कोणत्याही क्षेत्रात सफल होऊ शकते याचे उदाहरण असणाºया दोन्ही सिनेतारका. सई ताह्मणकर तर सांगलीसारख्या ग्रामीण भागातून संघर्ष करीत आज या पदाला पोहचली आहे. महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने व खान्देशी तरुणींमधील आत्मविश्वास वाढवून भविष्यातील कलावंत व उद्योजिका घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता या सिनेतारकांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरली. (पूर्वार्ध)- विनोद ढगे

टॅग्स :Jalgaonजळगाव