अडावद, ता. चोपडा : अडावद-चोपडा दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तरी संबंधितांनी याची दखल घेऊन महामार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बऱ्हाणपूर-अकंलेश्वर महामार्गावर यावल ते चोपडादरम्यान ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच पाऊस पडण्याआधी बांधकाम खात्याकडून ते बुजविले गेले नसल्याने सध्याच्या पावसाने त्यात आणखीन भर पडली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे दिसून येत आहेत. यामुळे चालकांना वाहन चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात लहान मोठे अपघात घडत आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
या महामार्गावरील प्रचंड वाहतूक बघता मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या गंभीर समस्येकडे बांधकाम खात्याने त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांना केली आहे.
210821\21jal_7_21082021_12.jpg
अडावद-चोपडा रस्त्यावर खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. (छाया : नरेंद्र खंबायत, अडावद )