शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

अज्ञातांकडून जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. तसेच वृक्षारोपणासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. तसेच वृक्षारोपणासाठी देखील जनजागृती केली जाते. मात्र, दुसरीकडे शहरातील जुन्या आणि भल्यामोठ्या वृक्षांवर अज्ञांताकडून कुऱ्हाड टाकली जात आहे. गेल्या काही दिवसात शहरात अनेक ठिकाणी मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी शिवाजीनगर भागात देखील ५० वर्षे जुने निंबाचे झाड अज्ञातांनी तोडले, हा प्रकार शिवसेनेचे विभागप्रमुख विजय बांदल यांनी उघडकीस आणला असून, याबाबत मनपा प्रशासनाकडेदेखील तक्रार केली आहे.

मनपा प्रशासनाकडून ऑक्सिजन पार्कव्दारे हजारो वृक्षांची लागवड कोट्यवधी खर्च करून केली जात आहे. कोट्यवधी खर्चूनदेखील वृक्षांची देखभाल मनपाकडून व नियुक्त केलेल्या मक्तेदाराकडून होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन वृक्ष लागवड देखील मनपाला करता येत नसून, जुने वृक्षदेखील आता सांभाळता येत नसल्याचे दिसून येत आहे. मेहरूण तलाव परिसर, शिवाजीनगर, राजाराम नगर, दादावाडी, खेडी, सावखेडा परिसरात गेल्या काही दिवसात अनेक वृक्षांची कत्तल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महावितरण, मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगत तोडली जाताहेत वृक्ष

एखादे जुने वृक्ष तोडताना कुणी आक्षेप घेतल्यास वृक्ष तोडणाऱ्यांकडून महावितरण किंवा मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच वृक्ष तोडल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत ट्रकमध्ये भरून सर्व लाकूड उचलून नेले जात आहे. वृक्ष तोडताना चार ते पाच जण येतात, त्यामुळे नागरिकांनादेखील हे कर्मचारी मनपा किंवा महावितरणचेच असल्याचेच वाटते. त्यामुळे या वृक्षतोडीबाबत कुणी तक्रारदेखील करायला तयार नाही.

शिवाजी नगरात प्रकार आला उघडकीस

शिवाजीनगर भागातील काळे विहिरीजवळील सुमारे ५० वर्ष जुना वृक्ष अज्ञांताकडून तोडण्यात आले. झाडाचे लाकूड नेले जात असताना शिवसेनेचे शिवाजीनगर भागातील विभागप्रमुख विजय बांदल यांनी संबंधितांना मनपाची परवानगी घेतली आहे का ? असे विचारले. मात्र मनपाची परवानगी नसल्याने संबंधितांनी बांदल यांना विरोध केला. तसेच उर्वरित लाकूड भरून पळ काढला. एमएच १९- बीएम ०४२८ या क्रमांकाच्या वाहनातून सर्व लाकूड वाहून नेल्याची माहिती बांदल यांनी दिली. दरम्यान, याबाबत बांदल यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली असून, याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गणेश घाटाजवळील जुने वृक्ष कोसळले

शहरातील मेहरूण तलावातील गणेश घाटाला लागून असलेले एक जुने निंबाचे वृक्षदेखील बुधवारी कोसळले आहे. हे वृक्ष कोसळले की कोणी तोडले हे समोर आलेले नाही. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या भागात जाऊन पाहणी केली असता, वृक्ष उतारावर होते. त्यामुळे एकाच बाजूला वजन गेल्यामुळे हे वृक्ष कोसळले असल्याची शक्यता आहे. पर्यावरणप्रेमी बाळकृष्ण देवरे यांना याबाबत विचारले असता, निंबाचे वृक्ष जुने झाल्यानंतर आतून पोकळ होत जाते. त्यामुळे ते कोसळते, हे वृक्षदेखील यामुळे कोसळले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, एक वृक्ष जगविण्यासाठी अनेक वर्ष लागत असतात, मात्र अनेक वृक्ष हे कोसळत जात आहेत. सार्वजनिक वृक्षांची निगा राखणे, वाकलेल्या झाडाला आधार देणे, रहदारीला अडचणीच्या असलेल्या फांद्या कापणे, झाडांच्या योग्य वाढीसाठी खालच्या फांद्यांची कटिंग करण्याची गरज असून, याकडेही मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.