शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अज्ञातांकडून जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. तसेच वृक्षारोपणासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. तसेच वृक्षारोपणासाठी देखील जनजागृती केली जाते. मात्र, दुसरीकडे शहरातील जुन्या आणि भल्यामोठ्या वृक्षांवर अज्ञांताकडून कुऱ्हाड टाकली जात आहे. गेल्या काही दिवसात शहरात अनेक ठिकाणी मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी शिवाजीनगर भागात देखील ५० वर्षे जुने निंबाचे झाड अज्ञातांनी तोडले, हा प्रकार शिवसेनेचे विभागप्रमुख विजय बांदल यांनी उघडकीस आणला असून, याबाबत मनपा प्रशासनाकडेदेखील तक्रार केली आहे.

मनपा प्रशासनाकडून ऑक्सिजन पार्कव्दारे हजारो वृक्षांची लागवड कोट्यवधी खर्च करून केली जात आहे. कोट्यवधी खर्चूनदेखील वृक्षांची देखभाल मनपाकडून व नियुक्त केलेल्या मक्तेदाराकडून होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन वृक्ष लागवड देखील मनपाला करता येत नसून, जुने वृक्षदेखील आता सांभाळता येत नसल्याचे दिसून येत आहे. मेहरूण तलाव परिसर, शिवाजीनगर, राजाराम नगर, दादावाडी, खेडी, सावखेडा परिसरात गेल्या काही दिवसात अनेक वृक्षांची कत्तल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महावितरण, मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगत तोडली जाताहेत वृक्ष

एखादे जुने वृक्ष तोडताना कुणी आक्षेप घेतल्यास वृक्ष तोडणाऱ्यांकडून महावितरण किंवा मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच वृक्ष तोडल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत ट्रकमध्ये भरून सर्व लाकूड उचलून नेले जात आहे. वृक्ष तोडताना चार ते पाच जण येतात, त्यामुळे नागरिकांनादेखील हे कर्मचारी मनपा किंवा महावितरणचेच असल्याचेच वाटते. त्यामुळे या वृक्षतोडीबाबत कुणी तक्रारदेखील करायला तयार नाही.

शिवाजी नगरात प्रकार आला उघडकीस

शिवाजीनगर भागातील काळे विहिरीजवळील सुमारे ५० वर्ष जुना वृक्ष अज्ञांताकडून तोडण्यात आले. झाडाचे लाकूड नेले जात असताना शिवसेनेचे शिवाजीनगर भागातील विभागप्रमुख विजय बांदल यांनी संबंधितांना मनपाची परवानगी घेतली आहे का ? असे विचारले. मात्र मनपाची परवानगी नसल्याने संबंधितांनी बांदल यांना विरोध केला. तसेच उर्वरित लाकूड भरून पळ काढला. एमएच १९- बीएम ०४२८ या क्रमांकाच्या वाहनातून सर्व लाकूड वाहून नेल्याची माहिती बांदल यांनी दिली. दरम्यान, याबाबत बांदल यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली असून, याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गणेश घाटाजवळील जुने वृक्ष कोसळले

शहरातील मेहरूण तलावातील गणेश घाटाला लागून असलेले एक जुने निंबाचे वृक्षदेखील बुधवारी कोसळले आहे. हे वृक्ष कोसळले की कोणी तोडले हे समोर आलेले नाही. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या भागात जाऊन पाहणी केली असता, वृक्ष उतारावर होते. त्यामुळे एकाच बाजूला वजन गेल्यामुळे हे वृक्ष कोसळले असल्याची शक्यता आहे. पर्यावरणप्रेमी बाळकृष्ण देवरे यांना याबाबत विचारले असता, निंबाचे वृक्ष जुने झाल्यानंतर आतून पोकळ होत जाते. त्यामुळे ते कोसळते, हे वृक्षदेखील यामुळे कोसळले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, एक वृक्ष जगविण्यासाठी अनेक वर्ष लागत असतात, मात्र अनेक वृक्ष हे कोसळत जात आहेत. सार्वजनिक वृक्षांची निगा राखणे, वाकलेल्या झाडाला आधार देणे, रहदारीला अडचणीच्या असलेल्या फांद्या कापणे, झाडांच्या योग्य वाढीसाठी खालच्या फांद्यांची कटिंग करण्याची गरज असून, याकडेही मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.