शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खान्देशातील ११ साहित्यिकांचा खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:03 IST

महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे‘ओवी अनुभवावी अहिराणी’चे संमेलनात प्रकाशनभाषेच्या संवर्धनासाठी अहिराणीतून व्यवहार होण्याची गरज

अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (अमळनेर), सुनंदा वैद्य, प्रभा बैकर (धुळे), प्रा.डॉ.किसन पाटील (जळगाव), प्रा.वा. ना. आंधळे (धरणगाव), प्रा.तानसेन जगताप (चाळीसगाव), रामदास वाघ (धुळे), डॉ.रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) यांना खान्देशभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अहिराणी ही महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील बहुतांश भागात तसेच गुजरात प्रांतातील काही भागात बोलली जाणारी बोलीभाषा असून, या भाषेच्या संवर्धनासाठी लोकव्यवहार, शिक्षण व्यवहार, राजव्यवहार आणि ग्रंथव्यवहार या भाषेतून होण्याची गरज आहे किंबहुना अहिराणी भाषा टिकविण्यासाठी आणि जतन करण्यासाठी घरा-दारातून आणि सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व कीर्तनकार प्रा.चत्रभुज पाटील यांनी केले.व्यासपीठावर मुंबई येथील राजेंद्र गोसावी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी, डॉ.एस.के.पाटील, नाना महाजन, डॉ.कृष्णाभाई पटेल, अनिल राजपूत व विजय चव्हाण उपस्थित होते. ग्रंथदिंडी, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे गोंधळी नृत्य तसेच ग्रंथकानबाई मिरवणुकीने प्रथम सत्रास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. कमलाकर देसले यांच्या अहिराणीतील पसायदानाने प्रथम सत्राचा समारोप झाला.दुपारच्या सत्रात बापूसाहेब हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यात प्रा.रमेश सूर्यवंशी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन रमेश धनगर यांनी केले. त्यानंतर मान्यवर तसेच नवोदित कवींचे कविसंमेलन रंगले. खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक तर निकिता पवार यांनी सूत्रसंचालन केले.अहिराणी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या ‘ओवी अनुभवावी अहिराणी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर