शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील ११ साहित्यिकांचा खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:03 IST

महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे‘ओवी अनुभवावी अहिराणी’चे संमेलनात प्रकाशनभाषेच्या संवर्धनासाठी अहिराणीतून व्यवहार होण्याची गरज

अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (अमळनेर), सुनंदा वैद्य, प्रभा बैकर (धुळे), प्रा.डॉ.किसन पाटील (जळगाव), प्रा.वा. ना. आंधळे (धरणगाव), प्रा.तानसेन जगताप (चाळीसगाव), रामदास वाघ (धुळे), डॉ.रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) यांना खान्देशभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अहिराणी ही महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील बहुतांश भागात तसेच गुजरात प्रांतातील काही भागात बोलली जाणारी बोलीभाषा असून, या भाषेच्या संवर्धनासाठी लोकव्यवहार, शिक्षण व्यवहार, राजव्यवहार आणि ग्रंथव्यवहार या भाषेतून होण्याची गरज आहे किंबहुना अहिराणी भाषा टिकविण्यासाठी आणि जतन करण्यासाठी घरा-दारातून आणि सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व कीर्तनकार प्रा.चत्रभुज पाटील यांनी केले.व्यासपीठावर मुंबई येथील राजेंद्र गोसावी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी, डॉ.एस.के.पाटील, नाना महाजन, डॉ.कृष्णाभाई पटेल, अनिल राजपूत व विजय चव्हाण उपस्थित होते. ग्रंथदिंडी, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे गोंधळी नृत्य तसेच ग्रंथकानबाई मिरवणुकीने प्रथम सत्रास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. कमलाकर देसले यांच्या अहिराणीतील पसायदानाने प्रथम सत्राचा समारोप झाला.दुपारच्या सत्रात बापूसाहेब हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यात प्रा.रमेश सूर्यवंशी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन रमेश धनगर यांनी केले. त्यानंतर मान्यवर तसेच नवोदित कवींचे कविसंमेलन रंगले. खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक तर निकिता पवार यांनी सूत्रसंचालन केले.अहिराणी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या ‘ओवी अनुभवावी अहिराणी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर