शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

खान्देशातील ११ साहित्यिकांचा खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:03 IST

महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे‘ओवी अनुभवावी अहिराणी’चे संमेलनात प्रकाशनभाषेच्या संवर्धनासाठी अहिराणीतून व्यवहार होण्याची गरज

अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (अमळनेर), सुनंदा वैद्य, प्रभा बैकर (धुळे), प्रा.डॉ.किसन पाटील (जळगाव), प्रा.वा. ना. आंधळे (धरणगाव), प्रा.तानसेन जगताप (चाळीसगाव), रामदास वाघ (धुळे), डॉ.रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) यांना खान्देशभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अहिराणी ही महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील बहुतांश भागात तसेच गुजरात प्रांतातील काही भागात बोलली जाणारी बोलीभाषा असून, या भाषेच्या संवर्धनासाठी लोकव्यवहार, शिक्षण व्यवहार, राजव्यवहार आणि ग्रंथव्यवहार या भाषेतून होण्याची गरज आहे किंबहुना अहिराणी भाषा टिकविण्यासाठी आणि जतन करण्यासाठी घरा-दारातून आणि सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व कीर्तनकार प्रा.चत्रभुज पाटील यांनी केले.व्यासपीठावर मुंबई येथील राजेंद्र गोसावी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी, डॉ.एस.के.पाटील, नाना महाजन, डॉ.कृष्णाभाई पटेल, अनिल राजपूत व विजय चव्हाण उपस्थित होते. ग्रंथदिंडी, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे गोंधळी नृत्य तसेच ग्रंथकानबाई मिरवणुकीने प्रथम सत्रास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. कमलाकर देसले यांच्या अहिराणीतील पसायदानाने प्रथम सत्राचा समारोप झाला.दुपारच्या सत्रात बापूसाहेब हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यात प्रा.रमेश सूर्यवंशी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन रमेश धनगर यांनी केले. त्यानंतर मान्यवर तसेच नवोदित कवींचे कविसंमेलन रंगले. खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक तर निकिता पवार यांनी सूत्रसंचालन केले.अहिराणी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या ‘ओवी अनुभवावी अहिराणी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर