शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

जागोजागी बोकाळले अवैध धंदे

By admin | Updated: January 30, 2017 00:52 IST

पाचो:यातील स्थिती : खुलेआम चालतो सट्टा, अवैध वाहतूक तर बेलगाम

पाचोरा : शहराच्या मध्यवर्ती भागात अवैध धंदे जोरात सुरू असून अवैध वाहतूकही वाढली आहे. याकडे प्रशासन मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संतापही व्यक्त होत आहे.शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजी चौकातील बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल परिसरात सट्टय़ाच्या दुकानांचे व टप:यांचे पेव फुटले आहे. पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. याच परिसरात लहान-मोठी व्यापारी संकुले असून मुख्य बाजारपेठही आहे.  भाजीमंडीदेखील  असून गर्दीच्या ठिकाणी राजीव गांधी टाऊन हॉलच्या बाजूला असलेल्या मिनी शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर मोठे पत्र्याचे शेड टाकून सट्टय़ाचे दुकान थाटले आहे. लहान लहान टप:यांपासून ते मोठय़ा दुकानांर्पयत सट्टय़ाच्या पेढय़ा शहरातील विविध भागातही  सर्रास सुरू आहेत. लहान मुलांवर विपरीत परिणामशहरातील सभ्य नागरिकांना या परिसरातून वावरताना अवैध धंद्याचे दर्शन घ्यावे लागत आहे. अगदी बाजारपेठेतदेखील ही दुकाने सजली असल्याने दुकानात चिकटलेल्या कागदांपासून  फळे व पाटीवर दिसणारे अंकगणित व बाराखडीचा अर्थपूर्ण अभ्यास लहान शाळाकरी मुलांपासून मोठय़ांर्पयत सगळ्यांना होत असतो. याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होत आहे.जीवघेणी वाहतूकयाव्यतिरिक्त जारगाव चौफुलीहून शेंदुर्णी, पहूर, भडगाव, जळगाव या अनेक शहरार्पयत आणि गावार्पयत होणारी जीवघेणी अवैध वाहतूक  सोयीस्करपणे दुर्लक्षित केली जात आहे.  लहान-मोठे टेम्पो, ट्रॅक्स व कालीपिलीच्या माध्यमातून ही वाहतूक सुरू असून प्रमाणापेक्षा  जास्त प्रवासी वाहनात बसवले जातात व लवकर पोहचण्याच्या अपेक्षेने प्रवासीदेखील दुर्घटनेचा विचार न करता धोका पत्करून या अवैध वाहतुकीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. अलीकडेच सावखेडा येथे झालेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या अपघाताची भीषण घटना ताजी असतानाही प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर अनेकदा प्रवासी भरताना रस्त्यावरच वाहन उभे केले जाते, यामुळे इतर वाहनधारकांची गैरसोय होत असते. काही वेळेस तर वाहतुकीची कोंडीही होताना दिसते. अशा प्रसंगी काही चालक अरेरावी करतात. परिणामी भांडणेही होत असतात. त्यामुळे वाहतुकीस शिस्तही लावण्याची गरज आहे. (वार्ताहर)दखल घेण्याची मागणीअवैध वाहतूक व अवैध धंदे इतके सर्रास सुरू आहेत की, प्रशासन हेतूपुरस्सर अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहे की काय हा संभ्रम व्हावा अशी स्थिती आहे. पाचोरा शहरातील  हे अवैध धंदे तत्काळ बंद व्हावेत अशी सामान्य आणि सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे. तर लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त आहे.