शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जागोजागी बोकाळले अवैध धंदे

By admin | Updated: January 30, 2017 00:52 IST

पाचो:यातील स्थिती : खुलेआम चालतो सट्टा, अवैध वाहतूक तर बेलगाम

पाचोरा : शहराच्या मध्यवर्ती भागात अवैध धंदे जोरात सुरू असून अवैध वाहतूकही वाढली आहे. याकडे प्रशासन मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संतापही व्यक्त होत आहे.शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजी चौकातील बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल परिसरात सट्टय़ाच्या दुकानांचे व टप:यांचे पेव फुटले आहे. पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. याच परिसरात लहान-मोठी व्यापारी संकुले असून मुख्य बाजारपेठही आहे.  भाजीमंडीदेखील  असून गर्दीच्या ठिकाणी राजीव गांधी टाऊन हॉलच्या बाजूला असलेल्या मिनी शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर मोठे पत्र्याचे शेड टाकून सट्टय़ाचे दुकान थाटले आहे. लहान लहान टप:यांपासून ते मोठय़ा दुकानांर्पयत सट्टय़ाच्या पेढय़ा शहरातील विविध भागातही  सर्रास सुरू आहेत. लहान मुलांवर विपरीत परिणामशहरातील सभ्य नागरिकांना या परिसरातून वावरताना अवैध धंद्याचे दर्शन घ्यावे लागत आहे. अगदी बाजारपेठेतदेखील ही दुकाने सजली असल्याने दुकानात चिकटलेल्या कागदांपासून  फळे व पाटीवर दिसणारे अंकगणित व बाराखडीचा अर्थपूर्ण अभ्यास लहान शाळाकरी मुलांपासून मोठय़ांर्पयत सगळ्यांना होत असतो. याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होत आहे.जीवघेणी वाहतूकयाव्यतिरिक्त जारगाव चौफुलीहून शेंदुर्णी, पहूर, भडगाव, जळगाव या अनेक शहरार्पयत आणि गावार्पयत होणारी जीवघेणी अवैध वाहतूक  सोयीस्करपणे दुर्लक्षित केली जात आहे.  लहान-मोठे टेम्पो, ट्रॅक्स व कालीपिलीच्या माध्यमातून ही वाहतूक सुरू असून प्रमाणापेक्षा  जास्त प्रवासी वाहनात बसवले जातात व लवकर पोहचण्याच्या अपेक्षेने प्रवासीदेखील दुर्घटनेचा विचार न करता धोका पत्करून या अवैध वाहतुकीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. अलीकडेच सावखेडा येथे झालेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या अपघाताची भीषण घटना ताजी असतानाही प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर अनेकदा प्रवासी भरताना रस्त्यावरच वाहन उभे केले जाते, यामुळे इतर वाहनधारकांची गैरसोय होत असते. काही वेळेस तर वाहतुकीची कोंडीही होताना दिसते. अशा प्रसंगी काही चालक अरेरावी करतात. परिणामी भांडणेही होत असतात. त्यामुळे वाहतुकीस शिस्तही लावण्याची गरज आहे. (वार्ताहर)दखल घेण्याची मागणीअवैध वाहतूक व अवैध धंदे इतके सर्रास सुरू आहेत की, प्रशासन हेतूपुरस्सर अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहे की काय हा संभ्रम व्हावा अशी स्थिती आहे. पाचोरा शहरातील  हे अवैध धंदे तत्काळ बंद व्हावेत अशी सामान्य आणि सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे. तर लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त आहे.