शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकºयांचा ‘जागता पहारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:56 IST

कजगाव येथील शेतकºयांची व्यथा : सर्व्हर डाऊनच्या अडचणीमुळे त्रस्त ; दोन दिवस रांगेत उभे राहूनही पदरी निराशा

ठळक मुद्देसर्व्हर डाऊनचा शेतकºयांना सर्वाधिक त्रासएका अर्जासाठी लागतात १५ ते २० मिनिटे.शेतात आंतरमशागतीचे कामे सुरु असताना अर्ज भरण्यासाठी उभे रहावे लागत आहे

आॅनलाईन लोकमतकजगाव ता भडगाव,दि.२ - शासनाने शेतकºयांना घोषित केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी व कुटुंबातील सदस्यांना रात्रंदिवस ई-सेवा केंद्र व ग्रामपंचायती समोर रांग लावावी लागत आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व्हरडाऊनचा सर्वाधिक त्रास असल्याने शेतकºयांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गाव पातळीवर महा.ई-सेवा केंद्रातून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. कजगाव येथील एका केंद्रावर सकाळी ६ वाजेपर्यंत केंद्राबाहेर शेतकºयांना रांग लावावी लागत आहे. दोन-दोन दिवस रांगेतशेतकºयांनी या केंद्रावर सकाळी आठ वाजेपासून रांग लावली होती. अनेक शेतकरी दोन दिवसांपासून रांगेत उभे राहून आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रतिक्षेत आहेत. एका अर्जासाठी किमान १५ ते २० मिनीट लागत असल्याने तासन्तास शेतकºयांना रांगेत उभे रहावे लागते.सर्व्हर डाऊनमुळे खोळंबा केंद्रावर अर्ज भरत असताना सर्व्हर डाऊन होण्याची समस्या सर्वाधिक आहे. त्यातच बहुतांश वेळा सर्व्हरचा आवश्यक स्पीड नसणे, वीज पुरवठा खंडीत असणे, इंटरनेट सेवा बंद असणे यासारख्या अडचणी येत आहेत. रांगेत उभे राहून शेतकरी कंटाळलेले आहेत. त्यातच वयोवृद्ध शेतकरी असल्यास आधार कार्ड व बोटांचे ठसे उमटत नसल्याने अर्ज न भरता माघारी परत येण्याची वेळ येत असते.आंतरमशागतीचे दिवसकाही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्यानंतर आता उघडीप आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांकडून आंतरमशागीतचे कामे सुरु आहे. मात्र कर्जमाफीसाठी अर्ज भरत असताना काही प्रकरणांमध्ये शेतकºयांच्या वारसांना देखील उपस्थित रहावे लागत असल्याने कामांचा खोळंबा होत आहे. 

तांत्रिक अडचणींवर तोडगा कसा निघणार कर्ज माफी अर्ज भरताना पती किंवा पत्नीच्या बोटांचे ठसे घेण्यासाठी मोठी अडचण येत आहे.  बोटांचे ठसे येत नसल्यास बायोमेट्रिक करावे लागते. त्याच्या दुरुस्तीसाठी ७ ते ८ दिवस लागतात. मात्र २० ते २५ दिवस झाल्यानंतरही शेतकºयांच्या बोटांचे ठशांची बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कजगाव चे शेतकरी लालसिंग भिमसिग पाटील, अजबसिग राघो पाटील, रवींद्र प्रल्हाद पाटील, लालसिंग शंकर पाटील, प्रशांत कैलास पाटील, निळंसिंग अजबसिग पाटील या शेतकºयांनी बायोमेट्रिक साठी अर्ज केले आहेत. मात्र अजूनही ते आलेले नाहीत.