शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या चौकशीस पतसंस्थांचे प्रस्ताव पाठविण्यात टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 10:16 IST

लेखापरिक्षकांना नोटीस

ठळक मुद्दे तातडीने कार्यवाहीचे विभाग निबंधकांचे आदेश

जळगाव : जिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्था या मनीलाँड्रींगसारखे प्रकार झाल्याने अडचणीत आल्या आहेत. अशा टॉप २० पतसंस्थांची चौकशी करून प्रकरणे ‘ईडी’कडे कारवाईसाठी पाठविण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांनी १० जुलै २०१७ रोजी जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. त्याची जबाबदारी जिल्हा विश्ोष लेखापरिक्षक रावसाहेब जंगले यांच्यावर सोपविण्यात आलेली असतानाही गेल्या दीड-पावणेदोन वर्षात त्यांनी एकही प्रकरण न पाठविल्याने सहविभागीय निबंधक मिलिंद भालेराव यांनी त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. तसेच प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश दिले आहेत.प्रमुख अधिकारी बैठकीस अनुपस्थितअडचणीतील पतसंस्था व करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी अपर निबंधक, नाशिक यांनी बुधवार, २३ जानेवारी रोजी नाशिक येथे बैठकीचे आयोजन केले होते. त्यास जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हा विश्ोष लेखा परिक्षक यांनाही बोलविण्यात आले असताना ते बैठकीस मात्र अनुपस्थित होते. तर उपनिबंधक बैठकीस उपस्थित होते.जंगले यांना कारणे दाखवाजिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्था या मनीलाँड्रींगसारखे प्रकार झाल्याने अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे अशा पतसंस्था अडचणीत येण्यास कारणीभूत असलेल्या संबंधीत संस्थेचे तत्कालीन संचालक व अधिकारी तसेच सहकार विभागातील अधिकारी यांच्या प्रकरणांची छाननी करून टॉप २० प्रकरणे, नावांची यादी तातडीने सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) चौकशीसाठी पाठविण्याकरीता देण्याचे आदेश दि.१० जुलै २०१७ रोजी झालेल्या विभागीय लोकशाहीदिनात विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांनी दिलेहोते.त्यानुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांनी जिल्हा उपनिबंधकांना आदेशदिले होते. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी जिल्हा विशेष लेखा परिक्षक रावसाहेब जंगले यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती. मात्र दीड-पावणेदोन वर्षांचा कालावधी उलटूनही जंगले यांच्याकडून एकाही पतसंस्थेचे प्रकरण सादर केले नाही. वरिष्ठांनी सूचनाकरूनही टाळाटाळ करीत असल्याने सहविभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी बुधवार, २३ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत जंगले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तातडीने चौकशी करून प्रकरणे ‘ईडी’कडे सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भालेराव यांनी दिली.१ हजार कोटींचे पॅकेज द्याशासनाने पतसंस्थांमधील ठेवीदारांना १ हजार कोटींचे पॅकेज देण्याची मागणी या बैठकीत खान्देश ठेवीदार कृती समितीतर्फे प्रविणसिंग पाटील यांनी या बैठकीत केली.लेखापरिक्षण न करणाऱ्या संस्थांवर कारवाईया आढावा बैठकीत लेखापरिक्षण न करणाºया संस्थांवर १४६ (अ) नुसार कारवाई करण्यात यावी. कर्ज मॅचिंगला पतसंस्थांची प्राथमिकता असते. त्यामुळे ठेवीदारांना रक्कम मिळत नाही. त्यामुळे कर्जमॅचींग हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या प्रकरणांची चौकशी करून प्रकरणे ‘ईडी’कडे पाठविण्याचे आदेश देऊनही त्यास जिल्हा विशेष लेखापरिक्षकांकडून टाळाटाळ झाल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. -मिलिंद भालेराव, सहविभागीय सहनिबंधक, नाशिक