शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

लाखो लीटर पाण्याची टळली नासाडी

By admin | Updated: January 25, 2017 00:40 IST

मन्याड : आवर्तनाच्या आत कॅनॉल लिकेज बंद केल्याने शेतक:यांना झाला लाभ

आडगाव ता. चाळीसगाव : मन्याडच्या  कॅनॉलचे मोठय़ा प्रमणावर असलेले लिकेज बंद झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबली आहे. आवर्ताच्या आत हे काम झाल्याने याचा फायदा परिसरातील शेतक:यांना मिळाला आहे.‘लिकेजचे ग्रहण’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ ने दोन वर्षापूर्वी प्रत्यक्ष सव्र्हे करुन वृत्तमालिका लावली होती. त्याची पाटबंधारे विभागाने दखल घेत शासनाकडे प्रस्ताव पाठवला. यासाठी  आमदार उन्मेष पाटील यांनी पाठपुरावा करुन शासनाकडून  99 लाख रुपये मंजूर करुन घेतले. त्यात पाटबंधारे विभागाने टप्प्याटप्प्याने  नांद्रे ते अलवाडीर्पयत सर्व लिकेज काँक्रीटीकरण करुन बंद केले तर काही मो:यांची तसेच गेटची दुरुस्ती करीत प्रत्येक चारीला क्रमांक किती, त्यावर भिजणारे क्षेत्र किती, तिची वहन क्षमता किती असा उल्लेख असणारे बोर्ड लावले. उर्वरित अलवाडीपासून ते तळोंदार्पयत  लहान मोठे लिकेज बंद केले तर अजून अधिक फायदा होईल.धरण निर्मितीपासून होती समस्यास्व.रामराव जिभाऊ यांच्या प्रयत्नाने मन्याड नदीवर नांद्रे गावाजवळ चाळीसगाव व नांदगाव तालुक्यातील सीमेवर 1973 मध्ये धरण कामास सुरुवत झाली. कमी खर्चात व कमी कालावधित  धरण पूर्ण झाले. 1974 मध्ये धरण कार्यान्वित झाले. मन्याड परिसरतील  22 गावांना अमृत संजीवनी मिळाली. धरण निर्मितीपासून ते आजर्पयत  42/43 वर्षाच्या कालावधीत कॅनॉलची स्थिती भक्कम होती. 20-22 वर्षापासून कॅनॉलची स्थिती बिघडली. त्यामुळे नांद्रे-अलवाडीर्पयत पाणी गळती होत राहिले. दोन वर्षापूर्वी लोकमतने प्रकाशझोत टाकल्यावर पाटबंधारे विभागाने सर्व पाणीगळती बंद केली.पूर्वी 50 टक्के पाणी वाया जायचेपूर्वी धरणातून 100 क्यूसेस पाणी सोडल्यास आडगाव-उंबरखेड-देवळी- चिंचखेडे या गावाना 50 टक्के म्हणजे 50 क्यूसेस् पाणी सिंचनासाठी मिळायचे.  लिकेज बंद केल्यामुळे पाटबंधारे विभागाने आता धरणातून 80 क्यूसेस पाणी सोडले तरी 5-10 टक्के वगळता जवळपास 70 ते 75 क्यूसेस पाणी वरील गावातील विशेष करुन आडगाव-उंबरखेड येथील शेतक:यांना मिळाल्याचा अनुभव आला. शिवाय पाण्याचा प्रवाहदेखील  15-20 कि.मी.र्पयत   प्रवाह  सारखा असल्याने शेतक:यांना पाणी घेणेही सोयीचे झाले.अनधिकृत पाणी वापरावर पाटबंधारे विभागाची नजरमन्याड धरणातून नुकतेच चारी क्र. 10 व 11 ला पाणी सोडले गेले. वरील दोन्ही चारीवरील  लाभधारक  शेतक:यांनी आपले पाण्याचे अर्ज थकबाकीसह भरुन पाटबंधारे विभागाला सहकार्य केले.  परंतु ज्यांनी वेळकाढूपणा करुन अनधिकृत पाणी वापर करण्याचा प्रकार केला त्या शेतक:यांच्या शेतीचा पंचनामा  पाणी अर्ज भरुन घेतले. हा निर्णय काही शेतक:यांना समाधानकारक वाटला तसेच अनेक शेतक:यांनी   कॅनॉल गळती बंद करण्यामागे लोकमतचा सिंहाचा वाटा असल्याने लोकमतचे आभार मानले.पाण्याचे नियोजन करावेपाटबंधारे विभागाने नुकतेच मन्याड धरणातून पहिले आवर्तन सोडले.  पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास एखादे आवर्तन वाढू शकते.  अशा रितीने पाटबंधारे विभागाने नियोजन केल्यास शेतक:यांना उन्हाळी बाजरी  मका ही पिके पूर्ण क्षमतेने घेता येतील.  यासाठी शेतक:यांनीदेखील पाटबंधारे विभागाला सहकार्य करुन पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)मन्याड धरणावर शेकडोच्या वर पाणी उपसा सिंचन  बसवले असून याद्वारे धरणाची जलपातळी लवकर  खालावत आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने नवीन लिफ्टला परवानगी देऊ नये, तसेच  ज्यांना परवानगी मिळाली आहे  त्यांच्या पाणी वापरावर निर्बंध  घालावे अशी मागणी जवळपास 18 गावातील शेतक:यांनी केली आहे.लिफ्टला (पाणी उपसा योजनेला) अशाच परवानगी मिळाल्या तर   बेसुमार पाणीउपसा होऊन भविष्यात अनेक गावांना यापुढे पाणी मिळणे कठीण होईल. यात आडगाव-शिरसगाव- टाकळी- देवळी-चिंचखेडे- डोणदिगर या गावाचे जास्त नुकसान होईल यासाठी  यापुढे पाटबंधारे विभागाने  तसेच जिल्हाधिकारी यांनी परवानगी देऊ नये अशी मागणी वरील गावातील शेतक:यांनी केली आहे.