शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

लाखो लीटर पाण्याची टळली नासाडी

By admin | Updated: January 25, 2017 00:40 IST

मन्याड : आवर्तनाच्या आत कॅनॉल लिकेज बंद केल्याने शेतक:यांना झाला लाभ

आडगाव ता. चाळीसगाव : मन्याडच्या  कॅनॉलचे मोठय़ा प्रमणावर असलेले लिकेज बंद झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबली आहे. आवर्ताच्या आत हे काम झाल्याने याचा फायदा परिसरातील शेतक:यांना मिळाला आहे.‘लिकेजचे ग्रहण’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ ने दोन वर्षापूर्वी प्रत्यक्ष सव्र्हे करुन वृत्तमालिका लावली होती. त्याची पाटबंधारे विभागाने दखल घेत शासनाकडे प्रस्ताव पाठवला. यासाठी  आमदार उन्मेष पाटील यांनी पाठपुरावा करुन शासनाकडून  99 लाख रुपये मंजूर करुन घेतले. त्यात पाटबंधारे विभागाने टप्प्याटप्प्याने  नांद्रे ते अलवाडीर्पयत सर्व लिकेज काँक्रीटीकरण करुन बंद केले तर काही मो:यांची तसेच गेटची दुरुस्ती करीत प्रत्येक चारीला क्रमांक किती, त्यावर भिजणारे क्षेत्र किती, तिची वहन क्षमता किती असा उल्लेख असणारे बोर्ड लावले. उर्वरित अलवाडीपासून ते तळोंदार्पयत  लहान मोठे लिकेज बंद केले तर अजून अधिक फायदा होईल.धरण निर्मितीपासून होती समस्यास्व.रामराव जिभाऊ यांच्या प्रयत्नाने मन्याड नदीवर नांद्रे गावाजवळ चाळीसगाव व नांदगाव तालुक्यातील सीमेवर 1973 मध्ये धरण कामास सुरुवत झाली. कमी खर्चात व कमी कालावधित  धरण पूर्ण झाले. 1974 मध्ये धरण कार्यान्वित झाले. मन्याड परिसरतील  22 गावांना अमृत संजीवनी मिळाली. धरण निर्मितीपासून ते आजर्पयत  42/43 वर्षाच्या कालावधीत कॅनॉलची स्थिती भक्कम होती. 20-22 वर्षापासून कॅनॉलची स्थिती बिघडली. त्यामुळे नांद्रे-अलवाडीर्पयत पाणी गळती होत राहिले. दोन वर्षापूर्वी लोकमतने प्रकाशझोत टाकल्यावर पाटबंधारे विभागाने सर्व पाणीगळती बंद केली.पूर्वी 50 टक्के पाणी वाया जायचेपूर्वी धरणातून 100 क्यूसेस पाणी सोडल्यास आडगाव-उंबरखेड-देवळी- चिंचखेडे या गावाना 50 टक्के म्हणजे 50 क्यूसेस् पाणी सिंचनासाठी मिळायचे.  लिकेज बंद केल्यामुळे पाटबंधारे विभागाने आता धरणातून 80 क्यूसेस पाणी सोडले तरी 5-10 टक्के वगळता जवळपास 70 ते 75 क्यूसेस पाणी वरील गावातील विशेष करुन आडगाव-उंबरखेड येथील शेतक:यांना मिळाल्याचा अनुभव आला. शिवाय पाण्याचा प्रवाहदेखील  15-20 कि.मी.र्पयत   प्रवाह  सारखा असल्याने शेतक:यांना पाणी घेणेही सोयीचे झाले.अनधिकृत पाणी वापरावर पाटबंधारे विभागाची नजरमन्याड धरणातून नुकतेच चारी क्र. 10 व 11 ला पाणी सोडले गेले. वरील दोन्ही चारीवरील  लाभधारक  शेतक:यांनी आपले पाण्याचे अर्ज थकबाकीसह भरुन पाटबंधारे विभागाला सहकार्य केले.  परंतु ज्यांनी वेळकाढूपणा करुन अनधिकृत पाणी वापर करण्याचा प्रकार केला त्या शेतक:यांच्या शेतीचा पंचनामा  पाणी अर्ज भरुन घेतले. हा निर्णय काही शेतक:यांना समाधानकारक वाटला तसेच अनेक शेतक:यांनी   कॅनॉल गळती बंद करण्यामागे लोकमतचा सिंहाचा वाटा असल्याने लोकमतचे आभार मानले.पाण्याचे नियोजन करावेपाटबंधारे विभागाने नुकतेच मन्याड धरणातून पहिले आवर्तन सोडले.  पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास एखादे आवर्तन वाढू शकते.  अशा रितीने पाटबंधारे विभागाने नियोजन केल्यास शेतक:यांना उन्हाळी बाजरी  मका ही पिके पूर्ण क्षमतेने घेता येतील.  यासाठी शेतक:यांनीदेखील पाटबंधारे विभागाला सहकार्य करुन पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)मन्याड धरणावर शेकडोच्या वर पाणी उपसा सिंचन  बसवले असून याद्वारे धरणाची जलपातळी लवकर  खालावत आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने नवीन लिफ्टला परवानगी देऊ नये, तसेच  ज्यांना परवानगी मिळाली आहे  त्यांच्या पाणी वापरावर निर्बंध  घालावे अशी मागणी जवळपास 18 गावातील शेतक:यांनी केली आहे.लिफ्टला (पाणी उपसा योजनेला) अशाच परवानगी मिळाल्या तर   बेसुमार पाणीउपसा होऊन भविष्यात अनेक गावांना यापुढे पाणी मिळणे कठीण होईल. यात आडगाव-शिरसगाव- टाकळी- देवळी-चिंचखेडे- डोणदिगर या गावाचे जास्त नुकसान होईल यासाठी  यापुढे पाटबंधारे विभागाने  तसेच जिल्हाधिकारी यांनी परवानगी देऊ नये अशी मागणी वरील गावातील शेतक:यांनी केली आहे.