शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

लाखो लीटर पाण्याची टळली नासाडी

By admin | Updated: January 25, 2017 00:40 IST

मन्याड : आवर्तनाच्या आत कॅनॉल लिकेज बंद केल्याने शेतक:यांना झाला लाभ

आडगाव ता. चाळीसगाव : मन्याडच्या  कॅनॉलचे मोठय़ा प्रमणावर असलेले लिकेज बंद झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबली आहे. आवर्ताच्या आत हे काम झाल्याने याचा फायदा परिसरातील शेतक:यांना मिळाला आहे.‘लिकेजचे ग्रहण’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ ने दोन वर्षापूर्वी प्रत्यक्ष सव्र्हे करुन वृत्तमालिका लावली होती. त्याची पाटबंधारे विभागाने दखल घेत शासनाकडे प्रस्ताव पाठवला. यासाठी  आमदार उन्मेष पाटील यांनी पाठपुरावा करुन शासनाकडून  99 लाख रुपये मंजूर करुन घेतले. त्यात पाटबंधारे विभागाने टप्प्याटप्प्याने  नांद्रे ते अलवाडीर्पयत सर्व लिकेज काँक्रीटीकरण करुन बंद केले तर काही मो:यांची तसेच गेटची दुरुस्ती करीत प्रत्येक चारीला क्रमांक किती, त्यावर भिजणारे क्षेत्र किती, तिची वहन क्षमता किती असा उल्लेख असणारे बोर्ड लावले. उर्वरित अलवाडीपासून ते तळोंदार्पयत  लहान मोठे लिकेज बंद केले तर अजून अधिक फायदा होईल.धरण निर्मितीपासून होती समस्यास्व.रामराव जिभाऊ यांच्या प्रयत्नाने मन्याड नदीवर नांद्रे गावाजवळ चाळीसगाव व नांदगाव तालुक्यातील सीमेवर 1973 मध्ये धरण कामास सुरुवत झाली. कमी खर्चात व कमी कालावधित  धरण पूर्ण झाले. 1974 मध्ये धरण कार्यान्वित झाले. मन्याड परिसरतील  22 गावांना अमृत संजीवनी मिळाली. धरण निर्मितीपासून ते आजर्पयत  42/43 वर्षाच्या कालावधीत कॅनॉलची स्थिती भक्कम होती. 20-22 वर्षापासून कॅनॉलची स्थिती बिघडली. त्यामुळे नांद्रे-अलवाडीर्पयत पाणी गळती होत राहिले. दोन वर्षापूर्वी लोकमतने प्रकाशझोत टाकल्यावर पाटबंधारे विभागाने सर्व पाणीगळती बंद केली.पूर्वी 50 टक्के पाणी वाया जायचेपूर्वी धरणातून 100 क्यूसेस पाणी सोडल्यास आडगाव-उंबरखेड-देवळी- चिंचखेडे या गावाना 50 टक्के म्हणजे 50 क्यूसेस् पाणी सिंचनासाठी मिळायचे.  लिकेज बंद केल्यामुळे पाटबंधारे विभागाने आता धरणातून 80 क्यूसेस पाणी सोडले तरी 5-10 टक्के वगळता जवळपास 70 ते 75 क्यूसेस पाणी वरील गावातील विशेष करुन आडगाव-उंबरखेड येथील शेतक:यांना मिळाल्याचा अनुभव आला. शिवाय पाण्याचा प्रवाहदेखील  15-20 कि.मी.र्पयत   प्रवाह  सारखा असल्याने शेतक:यांना पाणी घेणेही सोयीचे झाले.अनधिकृत पाणी वापरावर पाटबंधारे विभागाची नजरमन्याड धरणातून नुकतेच चारी क्र. 10 व 11 ला पाणी सोडले गेले. वरील दोन्ही चारीवरील  लाभधारक  शेतक:यांनी आपले पाण्याचे अर्ज थकबाकीसह भरुन पाटबंधारे विभागाला सहकार्य केले.  परंतु ज्यांनी वेळकाढूपणा करुन अनधिकृत पाणी वापर करण्याचा प्रकार केला त्या शेतक:यांच्या शेतीचा पंचनामा  पाणी अर्ज भरुन घेतले. हा निर्णय काही शेतक:यांना समाधानकारक वाटला तसेच अनेक शेतक:यांनी   कॅनॉल गळती बंद करण्यामागे लोकमतचा सिंहाचा वाटा असल्याने लोकमतचे आभार मानले.पाण्याचे नियोजन करावेपाटबंधारे विभागाने नुकतेच मन्याड धरणातून पहिले आवर्तन सोडले.  पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास एखादे आवर्तन वाढू शकते.  अशा रितीने पाटबंधारे विभागाने नियोजन केल्यास शेतक:यांना उन्हाळी बाजरी  मका ही पिके पूर्ण क्षमतेने घेता येतील.  यासाठी शेतक:यांनीदेखील पाटबंधारे विभागाला सहकार्य करुन पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)मन्याड धरणावर शेकडोच्या वर पाणी उपसा सिंचन  बसवले असून याद्वारे धरणाची जलपातळी लवकर  खालावत आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने नवीन लिफ्टला परवानगी देऊ नये, तसेच  ज्यांना परवानगी मिळाली आहे  त्यांच्या पाणी वापरावर निर्बंध  घालावे अशी मागणी जवळपास 18 गावातील शेतक:यांनी केली आहे.लिफ्टला (पाणी उपसा योजनेला) अशाच परवानगी मिळाल्या तर   बेसुमार पाणीउपसा होऊन भविष्यात अनेक गावांना यापुढे पाणी मिळणे कठीण होईल. यात आडगाव-शिरसगाव- टाकळी- देवळी-चिंचखेडे- डोणदिगर या गावाचे जास्त नुकसान होईल यासाठी  यापुढे पाटबंधारे विभागाने  तसेच जिल्हाधिकारी यांनी परवानगी देऊ नये अशी मागणी वरील गावातील शेतक:यांनी केली आहे.