तनिष्कला लहानपणापासूनच कलेची आवड आहे. त्यातूनच त्याने एकेक मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे साच्याचा वापर न करता फक्त मातीच्या सहाय्याने विविध सुबक व कोरीव तथा आकर्षक अशा शेकडो रेखीव मूर्ती बनविल्या आहेत. अगदी बालपणापासून मातीशी खेळणाऱ्या तनिष्कने अवघ्या १३-१४व्या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती व घोड्यावरचा पूर्णाकृती पुतळा, शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रमाबाई, जिजामाता, सरस्वती, दुर्गादेवी, प्रभू श्रीरामचंद्र, बालगणेश, भारताचा नकाशा, विद्येची देवी सरस्वती तसेच महापुरुषांच्या व अनेक देव देवतांच्या मूर्ती व त्यांचे हुबेहूब पोस्टर्स कुठलेही प्रशिक्षण न घेता तयार केले आहेत.
आमदारांनी केले कौतुक
त्याच्या या कलेचे आमदार संजय सावकारे यांनी कौतुक केले आहे. सावकारे म्हणाले की, हा बालकलाकार उद्याचा मोठा कलाकार होऊन आई-वडिलांसह वरणगावचे नाव उज्ज्वल करेल. यावेळी सरकार दरबारी त्याच्या कलेची नोंद घेण्यास भाग पाडणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तनिष्कचे वडील मिलिंद भैसे यांनी आमदारांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ए. जी. जंजाळे, सुनील माळी, हितेश चौधरी, आकाश निमकर, गोलू राणे, कमलाकर मराठे, कृष्णा माळी, संदीप माळी, डॉ. प्रवीण चंदने, डॉ. सादिक शेख, पप्पू ठाकरे, प्रणिता पाटील चौधरी आदी उपस्थित होते.
===Photopath===
010621\01jal_3_01062021_12.jpg
===Caption===
बालकलाकाराने मातीतून साकारल्या आकर्षक मूर्ती