शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रस्ते, रेल्वे, पाणी प्रश्नासाठी प्रयत्न

By admin | Updated: May 26, 2017 12:58 IST

केंद्रातील आघाडी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर खासदार ए.टी. पाटील यांच्याशी साधलेला संवाद.

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२६- मतदारसंघातील रस्ते, रेल्वे व पाणी प्रश्नाची अनेक कामे केली. प्रलंबित पुलांचे विषय मार्गी लावल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार ए.टी. पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. केंद्रातील आघाडी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार ए.टी. पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, तीन वर्षात रेल्वेशी संबंधित विविध कामांना गती दिली. 
भुसावळ - मनमाड तिसरी रेल्वे लाईन व जळगाव-भुसावळ चौथी लाईन केली जात आहे. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. असोदा, पिंप्राळा, दूध फेडरेशन, अमळनेर जळोद रस्ता, अमळनेर -धरणगाव, कजगाव या सहा रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळविली आहे. पिंप्राळा व कजगावची निविदा प्रक्रिया सुरू आहे. असोदा पुलाचे नकाशे तयार झाले आहेत. दूध फेडरेशन, अमळनेर-जळोद पुलांचे काम राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामात केले जातील. उधना-जळगाव दुहेरी करणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. चाळीसगाव - शिदवाडी बोगद्याला १ कोटी २५ लाख मंजूर करून घेतले हे कामही पूर्णत्वास आले आहे. जळगाव शहरास मॉडेल स्टेशनचा दर्जा मिळाला मात्र विविध सुविधा अपूर्ण होत्या. त्यासाठी पाठपुरावा करून लिफ्टचे काम सुरू केले आहे. तसेच जळगाव व चाळीसगाला सरकता जिना बसविण्याचा निर्णय झाला आहे. सचखंड एक्सप्रेसला चाळीसगाव येथे थांबा, नव्याने सुरू झालेली लोकमान्य टिळक टर्मिनस लखनौ एक्सप्रेसला जळगावी थांबा मिळाला.