शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पगार मिळत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पगार थकले आहे. त्यामुळे कर्मचारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नशिराबाद : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पगार थकले आहे. त्यामुळे कर्मचारी उदरनिर्वाह करणार कसा? असा प्रश्न उपस्थित करीत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात पगार द्या पगार द्या अन्यथा काम बंद करू अशी घोषणा देत ग्रामविकास अधिकाऱ्यांना जाब विचारत घेराव घातला. यात एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला.

कोटींचे उत्पन्न असलेल्या नशिराबाद ग्रामपंचायतींचा कारभार वसुली अभावी ठप्प होत आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.

संतप्त कर्मचारी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात आले. फक्त कामेच करायची का? पगार देणार केव्हा? असा सवाल करीत विनोद प्रेमचंद चिरावंडे यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले. या वेळी अन्य कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रसंगी विकास वाघुळदे,भास्कर माळी, सुनील पाटील, जयेश मर्दाने, उखर्डू बि-हाडे, अमोल राजपूत, अशोक कावळे, कमलाकर रोटे, बळीराम बोंडे, दुर्गादास माळी, सुरेश कावळे, संतोष रगडे, पराग ब-हाटे यांच्यासह असंख्य महिला व पुरुष ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद रंधे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून समजूत काढली. मात्र कर्मचाऱ्यांनी पगार द्या, आता आश्वासने नको अशी मागणी केली.

अधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देत संप

१६ जानेवारी रोजी थकीत पगार मिळण्याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत त्याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. थकीत पगारासाठी वारंवार व लेखी अर्ज देऊन सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप कर्मचाऱ्यांनी निवेदनात केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत, नशिराबाद पोलीस स्टेशन येथे याबाबत निवेदन देण्यात आले असून स्वच्छता, पाणीपुरवठासह कार्यालयीन कर्मचारी असे कायमस्वरूपी ३९ व रोजंदारीवरील ४८ अशा एकूण ८७ कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काम बंद केले आहे.

घरात मंगल कार्य, हाती पैसा नाही काय करावे

काम करून सुद्धा पगार मिळत नाही ही विवंचना आहे. कुटुंबात दोन दिवसांवर मंगल कार्य येवून ठेपले आहे. त्यामुळे पैशाची नितांत गरज असून वारंवार मागणी करुनसुद्धा पगार मिळत नसल्याची कैफियत एका कर्मचाऱ्याने यावेळी मांडली.

वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक समस्या आहे. त्यात गावाचा कारभार, दैनंदिन कामे मोठ्या प्रमाणावर असतात. त्यातच कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहे. एक ते दोन पगार देण्यासाठी काहीतरी तोडगा काढू, कर्मचाऱ्यांनीही सहकार्य करावे, आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये.

बी.एस. पाटील, ग्रामविकास अधिकारी, नशिराबाद