शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

जळगाव जिल्ह्यात १३ बसेसवर दगडफेक व चालकाला जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:45 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्'ात तीव्र पडसाद उमटले. जिल्ह्यात एकूण १३ बसेसवर दगडफेक झाली.जळगाव शहरात एस.टी.बसची तोडफोड करुन चालकासह बसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. जैनाबादमध्येही बसवर दगडफेक झाली. अमळनेर येथे सात एस.टी.बसेस व दोन ट्रक तर चाळीसगाव येथे चार बसेसवर दगडफेक झाली. अमळनेरच्या घटनेत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देभीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद  पोलिसांच्या सुट्टया रद्दजामनेर, भसावळ व पारोळा येथे रास्ता रोको 

आॅनलाईन लोकमतजळगाव दि २ : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्'ात तीव्र पडसाद उमटले. जिल्ह्यात एकूण १३ बसेसवर दगडफेक झाली.जळगाव शहरात एस.टी.बसची तोडफोड करुन चालकासह बसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. जैनाबादमध्येही बसवर दगडफेक झाली. अमळनेर येथे सात एस.टी.बसेस व दोन ट्रक तर चाळीसगाव येथे चार बसेसवर दगडफेक झाली. अमळनेरच्या घटनेत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.चोपडा आगाराच्या चोपडा-जळगाव या एस.टी.बसवर शिव कॉलनीनजीक रेल्वे उड्डाणपुलाजवळ दहा ते पंधरा जणांचा जमावाने दगडफेक केली. बस थांबताच चालक जगतराव लोटन पाटील (वय ५५ रा.चोपडा) यांच्या अंगावर व सीटवर पेट्रोल टाकले. त्यानंतर लागलीच पेटती काडी फेकली. सीटने पेट घेताच चालक जागेवरुन उठले. तर दुसरीकडे अन्य जणांकडून बसवर दगडफेक झाली. यात सखुबाई नाना भील (वय ६८,रा.किनगाव, ता.यावल) व डिंगबर महाजन (वय १७ रा.जळगाव) हा आयटीआयचा विद्यार्थी जखमी झाला. शहरातील जैनाबाद परिसरातही एस.टी.बसवर दगडफेक करण्यात आली.जामनेर, भसावळ व पारोळा येथे रास्ता रोको जामनेर, भुसावळ व पारोळा येथे एस.टी.बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन केले. या तिन्ही ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जळगाव शहरातून बसेसच्या फेºया थांबविण्यात आल्या होत्या. चाळीसगाव येथे दगडफेक करणारे तरुण पसार झाले आहेत तर जळगाव शहरातील तरुणांच्या शोधासाठी पथक रवाना झाली आहेत. या हल्लेखोरांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जीवंत ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी मालमत्तेचे नुकसान तसेच कामात अडथळा आणल्याचा १०ते१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरहून पोलीस,अधिकारी माघारी बोलविलेदरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात तणावाची स्थिती असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. अहमदनगर येथे पाठविण्यात आलेले १६९ कर्मचारी, १४ उपनिरीक्षक,दोन निरीक्षक यांना माघारी बोलावण्यात आले आहे तर अमरावती येथून राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय नियंत्रण कक्ष व गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाºयांनाही राखीव ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अफवा तसेच सोशल मीडियावरील पोस्टवर विश्वास ठेऊ नये. कोणीतीही माहिती मिळाली तर पोलिसांशी संपर्क साधावा. अफवा पसरविणाºयांविरुध्द गुन्हे दाखल केले जातील.-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक